Headlines

'मिसिंग लिंक'ची एक मार्गिका बंदच:मुंबई ते पुणे मार्गिका सुरू, पण पुणे ते मुंबई मार्गिका अद्याप बंद; काम सुरू असल्याची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे उद्घाटन केले. त्यानंतर हा मार्ग लगेचच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता होती. पण या मिसिंग लिंकवरील एक मार्गिका अर्धवट कामांमुळे अद्याप बंद असल्याचे आज समोर आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील 2-3 दिवसांत ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल, असे सांगण्यात येत आहे. मुंबई…

Read More

प्रतिभा चाकणकरांना ED चे समन्स:भोंदू अशोक खरात प्रकरणात होणार कसून चौकशी; प्रतिभा ह्या रुपाली चाकणकरांच्या भगिनी

भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंमलबजावणी संचालयाने (ईडी) आता चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावले आहे. समता पतसंस्थेशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात ईडीने त्यांना हा समन्स बजावल्याची माहिती आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातवर राज्यातील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याविषयी त्याच्यावर 10…

Read More

भाजपची गाडी 'फुल', अजित पवार-शिंदेंना डच्चू देण्याची तयारी:उद्या एकनाथ शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील, ठाकरे गटाचा दावा

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून आमदार बच्चू कडू यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर प्रहार करतानाच महायुतीतील भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू यांनी आमदारकीसाठी घेतलेली जिवंत समाधी म्हणजे केवळ सत्तेसाठी रचलेले ‘मंबाजीचे ढोंग’ असून, घसरलेल्या राजकीय पातळीचे हे विदारक चित्र असल्याची टीका ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून केली आहे. तर…

Read More

देवदेवतांच्या नावाखाली उद्योगपतींसमोर लोटांगण:सुपीक जमिनींवरून 'शक्तीपीठ' नेण्यास राजू शेट्टींचा विरोध

नागपूर ते गोवा हा प्रस्तावित ‘शक्तिपीठ‎ महामार्ग” म्हणजे सर्वसामान्यांचा ‎विकास नसून उद्योगपतीच्या ‎फायद्यासाठी आखलेला एक स्वतंत्र ‎रस्ता आहे, असा आरोप स्वाभिमानी‎ संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू‎ शेट्टी यांनी केला आहे.नागपुरातील ‎कोळसा गोव्यातील मडगाव बंदरापर्यंत‎ पोहोचवण्यासाठी आणि आगामी‎ निवडणुकीसाठी कोट्यवधींचा निधी‎ उभारण्यासाठी जनतेच्या करातून हा‎ अट्टाहास सुरू असल्याची टीका त्यांनी‎ केली. देव-धर्म आणि विकासाचा ‎मुलामा देऊन…

Read More

बारावीचा आज निकाल:दुपारी 1 वाजता ऑनलाईन होणार जाहीर; 'असा' पाहा तुमचा निकाल अन् डाऊनलोड करा मार्कशीट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, 2 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी ठीक 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येतील. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. यंदा राजभरातून एकूण 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी…

Read More

विज्ञानाची सृष्टी लाभली, पण 'दृष्टी' कधी मिळणार?:संतांची भूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा सुळसुळाट का? तज्ञांचे काय आहे म्हणणे?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारीच्या सकाळी दुर्दैवी निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर एकच शोककळा पसरली. कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या या आपल्या लाडक्या अजितदादाचे निधन झाले यावर सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नव्हता. मात्र हळूहळू त्यांचे कार्यकर्ते व त्यांनी घडवलेल्या नेत्यांनी तसेच त्यांना मानणाऱ्या लाखो जनतेने हे कटू सत्य पचवले. अजित पवारांचे…

Read More

व्हायरल होण्याचा नादखुळा:रील्समुळे तरुणाईची हरवली 'रिअल लाईफ', काय आहे मेंदूचा ताबा घेणाऱ्या या 'कल्चर'ची मेख!

हातातील स्मार्टफोन, समोर असलेला कॅमेरा आणि बॅकग्राउंडला वाजणारं एखादं ट्रेंडी म्युझिक… सध्याच्या तरुणाईसाठी हेच सर्वस्व बनलं आहे. पण या 15 ते 20 सेकंदांच्या ‘रील्स’च्या नादात आपण आपलं खरं आयुष्य (रिअल लाईफ) हरवून बसलो आहोत का? एखादं रील व्हायरल व्हावं म्हणून जिवाचा सौदा करणाऱ्या तरुणाईला नेमकं कसलं व्यसन लागलं आहे? या ‘रील कल्चर’ची मेख आणि त्यामागचं…

Read More

जगातील सर्वात रुंद बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे नवयुगा इंजिनिअरिंगचा पराक्रम

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा निर्माण करून कंपनीने दुसऱ्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’वर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवयुगा इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक केले. सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांमधून जाणारा हा…

Read More

मावळमध्ये धरण, नदीत बुडून 4 पर्यटकांचा मृत्यू:महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त घडली घटना

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. जाधववाडी धरण आणि पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिली हृदयद्रावक घटना नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरण परिसरात घडली. अजय गारुडे, संतोष एडके…

Read More

साडीला इस्त्री करण्याच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीचा विनयभंग:गोंदियातील सेवानिवृत्त प्राचार्याचे संतापजनक कृत्य; आरोपी फरार

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे एका सेवानिवृत्त प्राचार्याने त्याच्याच घरी भाड्याने असलेल्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. एका सेवानिवृत्त प्राचार्याने असे कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पत्नीच्या साडीला इस्त्री करून देण्याची बहाण्याने आरोपीने मुलीला घरी बोलावले व गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. “माझ्या पत्नीच्या साडीला प्रेस…

Read More