Headlines

चिमुकलीने घेतली थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत!:शाळेच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांचा विद्यार्थ्यांसोबत खास संवाद, VIDEO

महिनाभराच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आजपासून राज्यातील शाळा अधिकृतपणे पुन्हा सुरू झाल्या असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी राज्यभरातील विविध शाळांमध्ये मंत्री, लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांकडून पहिल्याच दिवशी त्यांचे अत्यंत आनंदात स्वागत करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल तालुक्यातील…

Read More

Ghati MBBS Internship Orders Distributed; Dr. Sukre Urges Patient Service

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे एमबीबीएसच्या यशस्वी विद्यार्थ्यांना सक्तीच्या फिरत्या आंतरवासिता (Compulsory Rotatory Internship) आदेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी विद्यार्थ . महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) जाहीर केलेल्या ‘बीपीएस’ च्या निकालात घाटीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले आहे. महाविद्यालयातून परीक्षेला बसलेल्या १९४ विद्यार्थ्यांपैकी १७६ विद्यार्थी उत्तीर्ण…

Read More

पुण्यात प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन:ह.भ.प. परेश बुवा देवळणकर: गोमातेशी मानवाचे जन्मजन्मांतराचे नाते

ग्रंथ पारायण दिंडी, पुणे आणि गीताधर्म मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिव पेठेतील गीताधर्म मंडळ येथे प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या गोकथेचे निरूपण ह.भ.प. परेश बुवा देवळणकर करत आहेत. गोमातेशी मानवाचे जन्मजन्मांतराचे नाते असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कथेच्या पहिल्या दिवशी कपिला गायीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र…

Read More

सातारकरांचा नादखुळा!:चिमुकल्यांची बैलगाडीतून शाळेत एंट्री; सारथी झाले मंत्री शंभूराज देसाई, स्वागतासाठी अवघे गाव आणि वाजंत्री

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे अनोख्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा…

Read More

IAS तुकाराम मुंढेंचा धसका!:'साहेब येणार'च्या नुसत्या अफवेनेच राज्यातील बाजारपेठांना कुलूप, गुटखा माफियांचे धाबे दणाणले

राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच धडक कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यांच्या या कठोर कार्यपद्धतीचा राज्यभर एवढा धसका घेण्यात आला आहे की, केवळ ते तपासणीसाठी येणार असल्याच्या अफवेनेच मोठ्या बाजारपेठा काही मिनिटांत कुलूपबंद होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे….

Read More

रोहिणी खडसेंचा राम शिंदेंवर पलटवार:अहिल्यानगरच्या एका धोंड्याला फार मिरची लागली, कुंडली काढली तर राजकारणाला रामराम करावा लागेल!

अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘धोंडे जेवण’ कार्यक्रमावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. रोजगाराच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादात आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांची भर पडली आहे. रोहिणी खडसे यांनी सोशल…

Read More

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा…

Read More

एआयसाठी नियामक पद्धत निर्माण करा – विवेक सावंत:मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये अशी मागणी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मेंटॉर विवेक सावंत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) नियामक पद्धत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली आहे. पुणे येथे आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जमान्यातील सत्यशोधन’ या संवाद सत्रात ते बोलत होते. एआयने मानवजातीची सेवा करावी, तिची जागा घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकेसह जगभरात एआय आणि डेटा सेंटरला विरोध होत असून, भारतातही नागरी समाजाने…

Read More

राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा एल्गार:16 जूनपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता; वाचा काय आहेत मागण्या

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत, राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. उद्यापासून (16 जून) राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील वाहन परवाने, गाड्यांचे पासिंग, आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना फटका बसणार…

Read More

वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण:अधिकारी म्हणतात – शेतकऱ्याचे नुकसान नाही, जास्तीत जास्त विमा मिळविण्यासाठी प्रयत्न

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाच्या गोदामातील हरभरा भिजल्याचे प्रकरण चांगलेच तापू लागले असून या प्रकरणात आता उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात अधिकारी मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसल्याचे सांगत असून शासनाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहोत. जास्तीत जास्त विमा मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे गोदाम भाडेतत्वावर घेतांना योग्य…

Read More