Headlines

ब्लिंकरने ड्युटीवर दृश्यमानतेत वाढ:पोलिस ठाण्यांसह वाहतूक शाखेला सोलर व शोल्डर ब्लिंकर लाइट्स‎

“मॉडर्न, व्हिजिबल, टेक सॅव्ही आणि स्मार्ट पोलिसिंग’ संकल्पनेनुसार अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या व पोलिस अंमलदारांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस स्टेशन व वाहतूक शाखेला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित २५० शोल्डर ब्लिंकर लाइट्स व १०० सोलर रिफ्लेक्टर ब्लिंकर लाइट्सचे वाटप करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात या…

Read More

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती:तिवसा प्रकल्पाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट‎

स्वच्छतेच्या क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या तिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावासुद्धा घेतला. जिल्हाधिकारी येरेकर यांनी प्रकल्प परिसरात करण्यात आलेल्या विकासकामांचे, स्वच्छतेचे तसेच सौंदर्यीकरणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा वि द्यार्थ्यांसाठी अभ्यासदौऱ्याचे केंद्र बनू शकतो, या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना…

Read More

पवार म्हणाले, चर्चा नको, मागणी मान्य करा‎:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोनवर दोनदा चर्चेचे आवाहन, आ. रोहित पवारांचा नकार‎

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज (शनिवार) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. विविध संघटना, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची गर्दी आंदोलनस्थळी पाहायला मिळाली. आ. रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशी किसान सभेचे अजित नवले, खा. निलेश लंके,…

Read More

भगवंत सेवेसाठी अंत:करणातील भक्तिभावाला सर्वाधिक महत्व:हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रतिपादन, भाविकांची गर्दी‎

भगवंताच्या सेवेत भाव सर्वात महत्त्वाचा असून भावपूर्वक केलेली सेवाच भगवंताला प्रिय असते, असे प्रतिपादन हभप महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासे बुद्रूक येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम येथे वद्य एकादशी व श्री पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज व सकल देवतांच्या पूजा-आरतीने झाली. त्यानंतर…

Read More

हिट अँड रन:हायवाची महाविद्यालयीन तरूणींच्या मोपेडला धडक; एक ठार, दोघी जखमी, चालक पसार, सातारा परिसरातील घटना

हायवाने 3 मैत्रिणी जात असलेल्या मोपेडला धडक दिली. यात अंगावरून चाक गेल्याने एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 मैत्रिणी जखमी झाल्या. घटना घडूनही हायवाचालक घटनास्थळी थांबला नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत कुणीही चालक ठाण्यात आला नसल्याची माहिती आहे. हा प्रकार 13 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर हायवेवरील आयआरबी पेट्रोल पंपाजवळ घडला. प्रतीक्षा…

Read More

200 हून अधिक तरुणांना थेट नोकरी:अभोणा महाविद्यालयात नामांकित कंपन्यांनी घेतल्या मुलाखती‎

डांग सेवा मंडळ, नाशिक आणि रेसोनन्स एंटरप्रेन्युअरशिप अँड एम्प्लॉयबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभोणा येथील डॉ. विजय बीडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात ग्रामीण भागातील २०० हून अधिक युवक-युवतींची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रोजगार मेळाव्यात पियाजिओ, टाटा मोटर्स, महिंद्रा…

Read More

पाणीटंचाई:तोडणीच्या तोंडावर विहिरींनी गाठला तळ; मिरची उत्पादक शेतकरी संकटात

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अनाड, पिंपळदरी, बाळापूर, मुकपाठ, गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवना, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई व जळकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक पिकांना फाटा देत मोठ्या आशेने मिरची व आले पिकांची लागवड केली. मात्र, विहिरींनी तळ गाठल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत. एप्रिल-मे महिन्याच्या सुरुवातीला लागवड केलेले मिरची पीक आता काही…

Read More

मान्सूनचा ‘पॅटर्न’:5 वर्षांत जूनमध्ये कधी 7 तर कधी 22 दिवस पावसाने जलसंकट, कमी दिवसांत जास्त पावसाने पिकांचे नुकसान

महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न गेल्या पाच वर्षांत (2021 ते 2025) बदलत आहे. 5 वर्षांत जून महिन्यात पावसाचे दिवस कमी-अधिक ( 7 ते 22) होत आहेत. त्यातच ‘कमी दिवसांत अतिवृष्टी’ म्हणजे ‘इंटेन्स स्पेल’ होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र सरकारचा ‘महावेध’ प्रकल्प स्कायमेटच्या सहकार्याने 2,335 स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे अचूक हवामान माहिती पुरवतो. या प्रकल्पाच्या ‘महारेन’ प्रणालीतून…

Read More

हिंगोलीत पहिल्याच जोरदार पावसाने दाणादाण:कळमनुरी-वसमत तालुक्यात केळी पिकाचे नुकसान, पहेणीत 60 ते 70 घरांवरील पत्रे उडाली

हिंगोली जिल्ह्यांमध्ये शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे चांगली दाणादाण उडाली असून कळंबोली व वसमत तालुक्यातील अनेक भागांमध्ये केळी पिकाची प्रचंड नुकसान झाले आहे तर हिंगोली तालुक्यातील पहिली गावांमध्ये 70 ते 80 घरावरील टीन पत्रे उडून गेल्यामुळे अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे हिंगोली शहरामध्ये तसेच जिल्ह्यात आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते….

Read More

आरपीएफ नांदेडकडून रेल्वे आग प्रकरणाचा 15 दिवसांत उलगडा:आरोपीला वाशीममधून अटक; 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी

हिंगोली रेल्वे स्थानकावर २७ मे २०२६ रोजी नरखेड–काचेगुडा इंटरसिटी एक्सप्रेसच्या एका डब्यातील शौचालयात आग लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सखोल चौकशी करून वाशिम येथे एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याची चौकशी चालवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरखेड काचिगुडा इंटरसिटी एक्सप्रेस हिंगोली येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आल्यानंतर रेल्वेच्या डी 5 कोचमधील…

Read More