Headlines

शिलांगण रोडवरील पुलाचे काम चार महिन्यांपासून रखडले:नागरिक आणि वाहनधारक वाहतूक कोंडीने त्रस्त

अमरावती शहरातील शिलांगण रोडवरील (पालखी मार्ग) एका पुलाचे बांधकाम गेल्या चार महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. यामुळे हा पूल अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून, स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिलांगण रस्ता हा परिसरातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. पुलाचे काम रखडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वळण रस्त्याची रुंदी कमी असल्याने येथे…

Read More

लाचखोर अधिकाऱ्याचे सीलबंद घर फोडले:नातेवाईकांसह दोघांना रंगेहात अटक, एसीबीच्या कारवाईनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

जळगावातील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेले सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या या सीलबंद घरात शिडीच्या साहाय्याने प्रवेश करणाऱ्या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे. लाचखोर अधिकाऱ्याच्या सीलबंद घरातून संशयास्पद आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी…

Read More

RBI ची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस:गैरकारभाराचा ठपका; आमदार गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर निशाणा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून संचालकांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले कर्ज, नियमबाह्य कर्जमाफी आणि एकंदर गैरकारभारावर ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयकडून बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 35 ‘अ’ आणि 47 ‘अ’ अन्वये ही कठोर कारवाई करण्यात आली असून, या नोटीसमुळे सहकार वर्तुळात…

Read More

एकत्र विमान प्रवासावरून राजकीय कलगीतुरा:मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण?, उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका विमान प्रवासातील भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज मिश्किल पण ठाम प्रत्युत्तर दिले आहे. “मला पंखच नाहीत, तर छाटणार कोण?” अशा शब्दांत फडणवीसांनी या वादावर भाष्य केले आहे. परभणी येथील सभेत…

Read More

पोलिओमुक्त भारताचे यश टिकवणे ही सर्वांची जबाबदारी:राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांचे प्रतिपादन, लासीना येथे कार्यक्रम

पोलिओ निर्मुलनामध्ये देशाने मोठे यश मिळविले असून मागील काही वर्षात एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. हे यश टिकविण्यासाठी पालकांनी त्यांच्या पाच वर्षाच्या आतील पाल्यांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी रविवारी ता. २८ लासीना (ता. हिंगोली) येथे केले. लासीना येथे पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेचे काटकर यांच्या हस्ते उदघाटन झाले….

Read More

विश्वास नांगरे पाटील आज नागपूर पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार:व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वाद, समर्थकांकडून केंद्राचा निर्णय शेअर

विश्वास नांगरे पाटील आज नागपूरचे नवे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, पदभार स्वीकारण्यापूर्वीच एका कथित व्हायरल व्हिडिओमुळे ते राजकीय वादात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारचा एक जुना निर्णय व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. नांगरे पाटील यांच्या एका कथित व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या व्हिडिओमध्ये ते…

Read More

हिंगोली जिल्ह्यात बोगस किटकनाशकांचा सुळसुळाट:कृषिमंत्री भरणेंच्या प्रतिमेला पैशांचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

हिंगोली जिल्ह्यात बोगस खते व किटकनाशकांचा सुळसुळाट झाला असून याकडे कृषी खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ता. 28 गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या छायाचित्राला पैशांचा हार घालून आंदोलन केले. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस पेस्टिसाइड व कीटकनाशक औषधांची विक्री होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात…

Read More

आरोग्य सेवा देतांना रुग्णांच्या समाधानाला सर्वोच्य प्राधान्य द्या:आयुक्त संजय काटकर, हिंगोलीत अधिकाऱ्यांची बैठक, दोन ठिकाणी दिल्या भेटी

आरोग्य सेवा केवळ उपचारापुरती मर्यादित न ठेवता रुग्णांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारी असावी तसेच त्यांच्या समाधानाला सर्वोच्य प्राधान्य द्यावे अशा सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी शनिवारी ता. 27 दिल्या आहेत. जिल्हा परिषद हिंगोली येथील नक्षत्र सभागृहामध्ये जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य सेवा ही केवळ…

Read More

उद्धव ठाकरेंना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच लोक सोडून गेले:त्यांनी काँग्रेसचे पाय धरले, त्यामुळे शिवसैनिकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला- श्रीकांत शिंदे

उद्धव ठाकरे यांना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच आज त्यांच्यावर कुठल्यातरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे आत्ता कुठे घराबाहेर पडले आहेत आणि बाहेर पडून लोकांना ‘गद्दार-गद्दार’ म्हणून हिणवत आहेत. मात्र, कालपर्यंत हेच लोक जेव्हा तुमच्यासोबत होते, तेव्हा ते चांगले होते आणि आता अचानक गद्दार कसे झाले? असा सवाल करत शिवसेना खासदार…

Read More

कोपरगावात मोफत आरोग्य शिबिरात 256 रुग्णांची तपासणी:आईच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्योगपती कैलास ठोळे यांचा उपक्रम‎

आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु, पहिली वैद्य आणि पहिली देवता असते. तिच्या मायेचे ऋण कधीही फेडता येत नाही, मात्र तिच्या स्मृतींना समाजसेवेची जोड दिली, तर त्या स्मृती खऱ्या अर्थाने अमर होतात. अशीच मातृभक्ती, समाजसेवेची जाणीव आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम एस. जे. एस. हॉस्पिटल’ येथे अनुभवायला मिळाला. उद्योगपती कैलास ठोळे यांनी मातोश्रींच्या स्मृतींना अभिवादन करत,…

Read More