Headlines

वनक्षेत्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल:ट्रॅक्टर जप्त, कन्नड येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई‎

तालुक्यातील प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पेडकवाडी नियतक्षेत्रातील बिबखेडा येथील राखीव वनकक्ष क्रमांक १३० मध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई केली आहे. १ हेक्टर वनक्षेत्रावर ताबा मिळवून ट्रॅक्टरने नांगरणी करत असल्याची गुप्त माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने २८ जुनला तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भारतीय वन अधिनियम, १९२७ नुसार कारवाई करत अतिक्रमण रोखण्यात आले आणि घटनास्थळावरून ट्रॅक्टर जप्त केला….

Read More

उमराणेत महामार्गालगत 80 फूट खोल उघडी विहीर:विहिरीला संरक्षक भींत किंवा जाळीही नाही; देवळा पोलिसांकडून टोल प्रशासनाची कानउघाडणी

रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरींमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असतानाच, उमराणेजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक ८० फूट खोल उघडी विहीर आहे. ही विहीर थेट जमिनीच्या समतल पातळीवर असून, तिच्याभोवती कोणतीही संरक्षक भिंत किंवा जाळी नाही. एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट टोल प्रशासन पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दिंडोरी येथील भीषण विहीर…

Read More

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान:दळवटमध्ये शेतकऱ्यांना शेती साहित्य वाटप; 100 टक्के अनुदानावर तूर बियाणे, 150 खतांच्या गोण्यांचे वितरण‎

दळवट येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला आणि कडधान्य उत्पादनाला गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य योजनेतंर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात परिसरातील निवडक शेतकऱ्यांना नाममात्र दरात अथवा १०० टक्के अनुदानावर तूर बियाणे मिनी किट आणि खतांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व साहित्याचे वाटप आमदार नितीन…

Read More

गंगापूर येथील शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जाधव बिनविरोध:निवड होताच पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला

तालुक्यातील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या गंगापूर तालुका सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जगन्नाथराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत व्हाईस चेअरमनपदी सौ. सुनीता कोटुवार, सचिवपदी संदीप शिरकुले, तर कोषाध्यक्षपदी मीरा गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. शिक्षकनेते मधुकरराव वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजेश हिवाळे आणि मावळते…

Read More

वैजापूरमध्ये कृषी विभागाला नियंत्रण कक्षाचाच विसर:शेतकऱ्यांना मनस्ताप, गावांतील शेतकरी राज्यस्तरीय तक्रार व्यवस्थेवर अवलंबून‎

खरीप हंगामात शेतकऱ्याला एखादी गंभीर अडचण आली किंवा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला, की त्याच्यासमोर पहिला प्रश्न उभा राहतो, आता मार्गदर्शनासाठी कोणाला फोन करायचा? वैजापूर तालुक्यात या प्रश्नाचे कोणतेही स्थानिक उत्तर मात्र कृषी विभागाकडे मिळत नाही. तब्बल १६४ गावांचा विस्तार असलेल्या या तालुक्यात कृषी विभागाची स्वतःची स्वतंत्र हेल्पलाईन किंवा नियंत्रण कक्ष नसल्याची बाब समोर आली आहे….

Read More

जायकवाडी धरणामध्ये 1986 नंतर मत्स्यबीज सोडण्यास मुहूर्तच मिळेना:50 हजार मच्छीमार 40 वर्षांपासून वन, मत्स्यव्यवसाय विभागात समन्वयाचा अभाव‎

जायकवाडी धरणातील मत्स्यसंपदा घटत चालली असून १९८६ नंतर धरणात एकदाही शासकीय पातळीवर नियोजनबद्ध रीतीने नवीन मत्स्यबीज सोडण्यात आलेले नाही. तब्बल ४० वर्षांपासून नव्या मत्स्यबीज संचयनाला मुहूर्त न मिळाल्यामुळे जलाशयातील गोड्या पाण्यातील अनेक पारंपरिक माशांच्या प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रशासकीय अनास्थेमुळे धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे ५० हजार पारंपरिक मच्छीमारांचा रोजगार संकटात सापडला आहे….

Read More

आज वटपौर्णिमा, पूजेचा मुहूर्त 6 ‎तास, भद्रा काळातही नाही अडथळा‎:सकाळी 9: 12 ते 10: 52 तर दुपारी 3:52 ते 7:12 वाजेपर्यंत शुभमुहूर्त‎

पतीच्या दीर्घायुष्यासाठी महत्त्वाची मानली‎जाणारी वटसावित्री पौर्णिमा सोमवारी साजरी‎होणार आहे. यंदा पहाटे ३.०७ पासून दुपारी‎४.१७ वाजेपर्यंत भद्रा काळ आहे. तरी‎ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेला येणारा भद्रा‎दोष मानला जात नाही. हा काळ वर्ज्य नाही.‎त्यामुळे पूजेसाठी सकाळी तीन तास आणि‎सायंकाळी साडेतीन तास असा साडेसहा‎तासांचा विशेष पुण्यपर्वकाळ आहे.‎ हिंदू धर्मात वटवृक्षाला शिवस्वरूप मानून‎ब्रह्म, सावित्री आणि वटवृक्षाच्या पूजनाची‎प्राचीन परंपरा आहे. वटवृक्ष हा‎पर्यावरणाचा समतोल…

Read More

प्रगतिशील शेतकरी:संत्रा बागेत मोरिंगा, लक्ष्मीतरूची लागवड; अमरावतीच्या शेतकऱ्याला दरमहा 40 हजारांचे अतिरिक्त उत्पन्न

पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने संत्राबाग कायम ठेवत त्यामध्ये मोरिंगा (शेवगा) आणि लक्ष्मीतरू यासारख्या आंतरपिकांची लागवड केली. या प्रयोगामुळे त्यांना दरमहा किमान 40 हजारांचा अतिरिक्त नफा मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी अजिंक्य खेरडे (35) यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत शिक्षण…

Read More

अमरावतीत 1.45 लाख बालकांना पोलिओ डोस:देशव्यापी मोहिमेत 4787 अधिकारी-कर्मचारी, 1912 पथके तैनात

अमरावती जिल्ह्यात रविवारी देशव्यापी पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत १ लाख ४५ हजार ५४० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना ‘दो बूंद जिंदगी के’ पाजण्यात आले. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात एकूण १ हजार ९९८ बूथ कार्यान्वित करण्यात आले होते. यामध्ये ४ हजार ७८७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली…

Read More

नेरपिंगळाईत वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू:दुसरा शेतकरी गंभीर जखमी, अमरावती रुग्णालयात दाखल

नेरपिंगळाई परिसरात रविवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यावेळी वीज कोसळून अशोक जगजीवनराम भोजने (वय ६५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी अनुप वासुदेव कोकाटे (वय ३२) गंभीर जखमी झाले. ही घटना धानोरा शेतशिवारात घडली. अशोक भोजने आणि अनुप कोकाटे हे दोघेही कापूस पेरणीच्या कामासाठी शेतात गेले होते. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू…

Read More