Headlines

एकनाथ शिंदे स्वत:च्या ताफ्यातील गाड्या करणार कमी:पीएम मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय, विरोधकांचाही घेतला समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संकट आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “देशाचे हित लक्षात घेऊन मी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून, आता केवळ सुरक्षेसाठी आवश्यक तितक्याच गाड्या माझ्यासोबत असतील,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, इंधन बचतीचा वस्तुपाठ…

Read More

कालव्यातून पाईप ओढताना पाय दोरीत अडकला:तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील घटना

वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात कालव्यातून पाईप नेतांना हात अन पाय दोरीत अडकल्याने तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात बाभणाजी वाघमारे (38) यांचे शेत…

Read More

पदासाठी तिसरा मुलगा लपवला; संभाजीनगर एमआयएम नगरसेवकाला अटक:मुलाला दाखवले पुतण्या; नगरसेवक मेहराज खान यांच्यासह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

महापालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी स्वतःच्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाइड सर्टिफिकेट तयार करून शासनाची, मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दिकी यांना अटक करण्यात आली असून, त्याशिवाय नगरसेवकाची पत्नी निलोफर मेहराज खान, मिनाज खान जलील…

Read More

कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी सहा शेळ्या-दोन बोकड पळविले:हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कारदेखील चोरीची असल्याचा संशय

हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी तीन शेतकऱ्यांच्या मालकिच्या सहा शेळ्या व दोन बोकड पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. तर चोरट्यांनी वापरलेली कार देखील चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत जनावरे चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये जनावरांना…

Read More

कोल्हे कुटुंबातील तिसऱ्या पिढीचा विधिमंडळात प्रवेश:आ. कोल्हेंमुळे प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची कार्यकर्त्यांना विश्वास‎

कोपरगाव मतदारसंघाच्या जडणघडणीत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे २७ वर्षांचे मोठे योगदान आहे. आता त्यांचे नातू आणि संजीवनी कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या रूपाने कोल्हे कुटुंबातील तिसऱ्या पिढीने विधिमंडळाचा वारसा सुरू केला आहे, याचा . विधान परिषदेवर भाजपच्या वतीने विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने संजीवनी कारखाना कार्यस्थळावर त्यांचा नागरी…

Read More

भोंदू मनोहरमामावर चौथा गुन्हा, 41 हजार रूपयांची फसवणूक:करमाळ्यातील घटना, चमत्कारी उपचाराचा गुन्हा‎

करमाळा तालुक्यातील घोटी येथील स्वतःला चमत्कारी उपचार करणारा म्हणून मिरवणाऱ्या भोंदू मनोहर मामा भोसले याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जुन्या प्रकरणात आजच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती, मात्र तोच त्याच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर मामावर आतापर्यंतचा हा चौथा, तर करमाळ्यातील तिसरा गुन्हा आहे. तक्रारीनुसार,…

Read More

राज ठाकरे आज पुन्हा न्यायालयात हजर राहणार:18 वर्षांपूर्वीच्या रेल्वे आंदोलन प्रकरणात गुन्हा मान्य नसल्याचे स्पष्ट सांगितले होते

मनसेप्रमुख राज ठाकरे आज 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. 18 वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू असून, आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. याआधी डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांनी न्यायालयासमोर मला गुन्हा मान्य नाही, असे स्पष्ट सांगितले होते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेला…

Read More

नियोजनाचा निधी तातडीने खर्च होण्यासाठी प्रयत्न करा:प्राप्त निधीच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देणार‎

चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजनाला ६०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्यस्थितीत प्राप्त निधीच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येतील. त्यामुळे यंत्रणांनी जिल्हा नियोजनाचा निधी तातडीने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. महसूल भवनातील बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी येरेकर यांनी सुरुवातीला…

Read More

महात्मा फुले विद्यापीठाचा बियाणे पॅटर्न; 8 हजार क्विंटलचा टप्पा पार:बियाणे उत्पादनातून बळीराजाची प्रगती हेच आमचे उद्दिष्ट- डॉ. खर्चे‎

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बियाणे निर्मितीत मोठी झेप घेतली असून, २०२५-२६ या वर्षात विविध पिकांचे तब्बल ८,४५६ क्विंटल बियाणे तयार करण्याचा विक्रम केला आहे. आगामी वर्षासाठी विद्यापीठाने ८,६३७ क्विंटल बियाणे निर्मितीचे महत्त्वाकांक्षी उ . विद्यापीठात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ‘बियाणे उत्पादन आढावा बैठक’ पार पडली. या बैठकीच्या उपाध्यक्षपदी…

Read More

कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात रंगला सत्कार सोहळा‎:विद्यार्थ्यांनी स्वतःला पैलू पाडत सिद्ध करणे हीच खरी गुणवत्ता- सागर जाधव

यश मिळवणे म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांनी अभ्यासाला ओझे न समजता सातत्य ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडून स्वतःला सिद्ध करणे, हीच खरी गुणवत्ता आहे, असे प्रतिपादन जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांनी केले. येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता १० वी) आपल्या उज्ज्वल यशाची…

Read More