Headlines

नेपाळच्या महापुरातून नाशिकचे 200 भाविक सुखरूप बचावले:स्थानिक प्रशासनाच्या मदतीने भाविकांना सुरक्षित स्थळी हलवले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरात चिंतेचे वातावरण असताना, नाशिककरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. नेपाळ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे 200 यात्रेकरू सुखरूप असून, 1 सप्टेंबर रोजी ते नाशिकमध्ये परतणार आहेत. श्री औदुंबर भक्त मंडळ ट्रस्टच्या चोख नियोजनामुळे आणि सेवेकऱ्यांच्या तत्परतेमुळे या भाविकांची सुखरूप सुटका झाली आहे. श्री औदुंबर भक्त…

Read More

हिंगोली जिल्ह्यातील 85 हजार 316 मतदार वगळले:नवीन 23 मतदान केंद्रांची निर्मिती, उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर यांची माहिती

हिंगोली जिल्ह्यात मतदार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून तब्बल 85 हजार 316 मतदार वगळण्यात आले आहेत. गणनापत्रक न जमा केल्यामुळे किंवा इतर विसंगतींमुळे ही नावे प्रारूप मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत. तसेच 23 नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रगती…

Read More

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची अचानक एन्ट्री:नेत्यांच्या जेवणाचे नमुने घेतले, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यात सध्या भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंत्रालयातील खानावळीपासून हॉटेल्स आणि विविध खाद्य आस्थापनांवर तपासण्या करत FDA कडून नमुने घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणी FDA पथकाने अचानक भेट देत नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी विविध अन्नपदार्थांचे नमुने…

Read More

‘विकास हवा, पण निसर्गाच्या किंमतीवर नको’:पर्यावरण संवर्धनासाठी शासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही गरजेचा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नसून, दोन्हींची सांगड घालून शाश्वत विकास साधणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून, येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. भामला फाउंडेशन आणि पंचशील रिअॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

Amit Thackeray Objects to Modi Photo at Pune Polytechnic

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देऊन तेथील गैरसोयींवरून प्रशासनाला धारेवर धरले. वसतिगृहातील निकृष्ट जेवण आणि अस्वच्छतेवरून त्यांनी वसतिगृह अधीक्षकांना चांगलेच झापले. तसेच, महाविद्यालया . जेवणात अळ्या, पाण्यात किडे महाविद्यालयात मनसे शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव वसतिगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि कॅन्टीनची पाहणी केली. या पाहणीदरम्यान…

Read More

पैठण नगर परिषदेत अखेर स्वीकृत नगरसेवकाची निवड:राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जितू परदेशी बिनविरोध

पैठण नगर परिषदेत गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीला अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. विशेष सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर आणि मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. यावेळी नगर परिषदेतील सर्व नगरसेवक उपस्थित…

Read More

पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक:दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जाणार, युवकांच्या प्रश्नांवरही चर्चा

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ही रविंद्र चव्हाण यांची पहिलीच प्रदेश कार्यकारिणी बैठक असल्याने या बैठकीकडे पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. बैठकीच्या सुरुवातीला…

Read More

पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर भीषण अपघात:पीएमपी बसच्या धडकेत सायकलस्वार 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे शहरातील गणेशखिंड रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चतु:शृंगी पोलिसांनी पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोहेल नूर अन्सारी (वय 21, रा. जनवाडी, गोखलेनगर, मूळ रा. बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र रेहान इक्रम अन्सारी (वय 19) याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी…

Read More

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य:पुणे पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी समाज माध्यमांवर अवमानकारक चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय 56, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष पंडित याच्यासह अन्य एका व्यक्तीविरुद्ध हा…

Read More

Vijay Wadettiwar Slams Govt Over UPSC OBC Students IAS IPS Selection Row

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ओबीसी समाजावर प्रचंड मोठा अन्याय होत आहे. 2016 मधील यूपीएससी परीक्षेत मेरिटवर उत्तीर्ण झालेल्या तब्बल 314 ओबीसी विद्यार्थ्यांना नॉन-क्रिमीलेअरच्या अटीचे कारण दाखवून आयएएस आणि आयपीएस होण्यापासून रोखण्यात आले, . विजय वडेट्टीवार म्हणाले की, 2016 मध्ये युपीएससीची परीक्षा झाली आणि जवळपास 314 विद्यार्थ्यी ओबीसीमधून पास झाले त्यांना तुम्ही क्रिमिनेअरच्या अटीमध्ये बसत…

Read More