Headlines

शेतकऱ्यांचे कापूस, धान आणि हरभऱ्याचे पैसे व्याजासहित परत करा!:बच्चू कडू आक्रमक, राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी आज (30 जून) मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थेवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे अद्याप न मिळाल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच ऑनलाईन परीक्षांमधील गोंधळ, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मग्रुरी आणि राजकीय घडामोडींवरही त्यांनी रोखठोक भाष्य केले. शेतकऱ्यांचे पैसे व्याजासहित परत करा! बच्चू कडू यांनी…

Read More

फडणवीसांचे वागणे 'घटनाद्रोही' अन् 'रामद्रोही; म्हणूनच 'ऑपरेशन देवेंद्र' सुरू झालं:शिंदे गटामुळे फडणवीस महाराष्ट्रात पदावर राहतील की नाही, अशी परिस्थिती– संजय राऊत

ओमराजे निंबाळकर हा माणूस सोंगाड्या आहे. त्यांनी खरे बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना ज्या खासदारांना भेटी देत नाहीत, निधी देत नाहीत पण पक्षांतर करताच त्यांचे कामे मंजूर करतात हा घटनेशी द्रोह आहे हे फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वागणार असतील तर ते घटना द्रोही आणि रामद्रोही आहेत. यामुळेच ऑपरेशन देवेंद्र…

Read More

आढावा बैठक:इतके निष्क्रिय अधिकारी प्रथमच पाहतोय, काम शासनासाठी करता की ठेकेदारांसाठी

अकोले तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकासकामांवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी प्रशासनाचे वाभाडे काढले. “इतके निष्क्रिय अधिकारी मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तरी प्रशासनाला फरक पडत नाही. अधिकारी सरकारसाठी काम करतात की ठेकेदारांसाठी?” अशा शब्दांत विखे पाटलांनी आपला संताप व्यक्त केला. येथील विठ्ठल लॉन्सवर आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते…

Read More

मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत वाढली:मच्छिमारांना 50 हजारांच्या मदतीचा राज्य सरकारचा विचार, नितेश राणेंची विधानसभेत मोठी घोषणा

राज्यातील मच्छिमारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पावसाळा उशिराने सुरू झाल्याने आणि समुद्री परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे आर्थिक फटका बसणाऱ्या मच्छिमारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत…

Read More

जालन्यात पोलिसांचा 'अँटी-ड्रग्ज' पॅटर्न:3 हजार नशेच्या गोळ्या जप्त, महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगार न करता पालकांना केले सतर्क!

जालना शहरात नशेच्या बटण गोळ्या ‎विक्री व बाळगणाऱ्यांवर कारवाया ‎केल्या जात आहे. वर्षभरात 3 हजार ‎‎नशेच्या गोळ्या जप्त करून 16 ‎आरोपी निष्पन्न केले.‎दहशतवादविरोधी पथकाने दोन ‎‎दिवसांपूर्वीच 1 हजार 80 गोळ्यांचा‎ साठा जप्त केला. या नशेच्या गोळ्या ‎‎गुन्हेगारच नव्हे, महाविद्यालयीन ‎तरुणही घेत असल्याचे पुढे आले‎ आहे. आरोपींच्या संपर्कात काही ‎‎महाविद्यालयीन तरुण असल्याचेही ‎पुढे आले आहे. पोलिसांनी…

Read More

निवासी प्रशिक्षणातून पं.स. सदस्यांना मिळाली नवी दिशा:प्रशिक्षण नियमितपणे आयोजित करण्यात यावे‎‎

पंचायत समिती सदस्यांसाठी पुणे येथील यशदा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले तीन दिवसीय निवासी मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात ग्रामविकास, प्रशासन, नेतृत्व विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी सर्व पंचायत समिती सदस्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण…

Read More

…तर 2022 मध्ये 200 कोटींची ऑफर मी नाकारली असती का‎:मी मंत्रिपदासाठी गेलो नाही, धाराशिवचा मागासलेपणाचा डाग पुसायचा आहे‎- ओमराजे

मंत्रीपदाची अपेक्षा ठेवून किंवा अट्टहास करून शिंदेसेनेत प्रवेश केलेला नाही. माझ्यासाठी मंत्रीपदापेक्षा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेची कामे आणि विकास अधिक महत्त्वाचा आहे, अशा शब्दांत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धाराशिव जिल्ह्याचा मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची मदत मिळवणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. खा. ओमराजे म्हणाले, धाराशिव…

Read More

समाधानकारक पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या:शेतकरी तयारीत व्यस्त, मूर्तिजापूर तालुक्यात तुरळक पावसावर कपाशीची टोचणी सुरू‎

मृग नक्षत्र संपले तरी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. दोन दिवस आलेल्या पावसाने सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण झालेला नाही. परिणामी अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग देत आहेत.शेतांमध्ये ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साहाय्याने वखरणी,पट्टीपास, सऱ्या पाडणे, बांध दुरुस्ती आदी…

Read More

जिल्हा परिषदेच्या 137 शाळा जर्जर, तर 230 वर्गखोल्या धोकादायक यादीमध्ये:उन्हाळ्याची सुटी संपली तरी इमारतींची दुरवस्था कायमच‎

. शिक्षण विभागाने बऱ्यापैकी गाजावाजा करीत मंगळवारी ३० जून रोजी निवडक शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे समारंभ आयोजित केले आहेत. परंतु व्यापक प्रमाणातील वास्तविक चित्र मात्र काही वेगळेच आहे. ग्रामीण तसेच शहरी भागांतील अनेक शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती अत्यंत नादुरुस्त व जर्जर अवस्थेत पोहोचल्या आहेत. अनेक ठिकाणी वर्गांची छते गळत असून, भिंतींना मोठे तडे गेले आहेत….

Read More

महसूल अधिकारी थेट बांधावर; आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन:सेलू येथील बीबीएफ पद्धतीने पेरणीचे प्रात्यक्षिक‎

वाशी तालुक्यातील सेलू येथील ग्राम महसूल अधिकारी डी. व्ही. सिरसावाड पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट बांधावर जाऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना बीबीएफ (ब्रॉड बेड अँड फरो) अर्थात रुंद वरंबा-सरी पद्धतीने सोयाबीन पेरणी करण्याचे आवाहन केले. सिरसावाड पाटील यांनी केवळ…

Read More