Headlines

लाडसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी:प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

लाडसावंगी | येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्य झामसिंग बाम्हणावत यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ​या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य ​रमेश शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष…

Read More

महानिबंध स्पर्धा म्हणजे महापुरुषांचे‎विचार मनामध्ये रुजवण्याचा उपक्रम‎:मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन, कन्नडला विजेत्यांचा गौरव‎

प्रतिनिधी | कन्नड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने महानिबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामुळे महापुरुषांचे विचार डोक्यात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्टेट फायनान्सचे संचालक मिलिंग पाटील यांनी येथे केले. कन्नड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती व जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित…

Read More

मुंबईच्या राजकारणात ‘ठाणे पॅटर्न’ची एन्ट्री:22 जिल्ह्यांत दौरा; उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात 100 मतदारसंघांवर शिंदेसेनेचे लक्ष

ठाणे जिल्ह्यात शिंदेसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आता मुंबईच्या रणांगणात “मुख्य समन्वयक’ म्हणून उतरले आहेत. १६ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या या दोन महिन्यांच्या विशेष मोहिमेत मुंबईचा “रिमोट कंट्रोल’ त्यांच्या हाती असणार आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे २२ जिल्ह्यांतील ७० विधानसभा मतदारसंघांत जाऊन थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. राजकीय वर्तुळात याला “ठाणे…

Read More

एनसीआरबी रिपाेर्ट:गृहिणींच्या आत्महत्या दुप्पट; दर तासाला 5 जणींचा शेवट, आत्महत्येचे सर्वात माेठे कारण काैटुंबिक वाद, विवाहित महिलांचे प्रमाण अधिक

देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर शासनासह सर्वत्रच चर्चा केली जाते. मात्र, ‘एनसीआरबी’च्या ताज्या अहवालातून एक अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे वास्तव समोर आले आहे. देशात शेतकऱ्यांच्या (६.२%) तुलनेत गृहिणींच्या (१३%) आत्महत्यांचे प्रमाण दुप्पट झाले आहे. २०२४ मध्ये तब्बल २२,११३ गृहिणींनी जीवन संपवले असून, दर तासाला ५ विवाहिता मृत्यूला कवटाळत आहेत. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या या…

Read More

प्रगतिशील शेतकरी:दुष्काळी माळरानावर केशर आंब्याची बाग; 35 एकरांतून 1 कोटी उत्पन्न, लातूरच्या शेतकऱ्याचा जिद्दी प्रयोग

मराठवाडा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो पाचवीला पुजलेला दुष्काळ. पण याच मातीत जिद्द असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या एका तरुण शेतकऱ्याने घालून दिले. निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे या शेतकऱ्याने आपल्या 35 एकर खडकाळ माळरानावर 12 हजार केशर आंब्यांची लागवड केली. विशेष म्हणजे, या वर्षी केवळ 6 हजार झाडांतून…

Read More

शेजारील देशांत पेट्रोल 450 रुपये, आपण वेळीच सावध व्हायला हवे:पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा मोठा फटका आता भारतीय जनजीवनाला बसू लागला आहे. राज्यात एकीकडे पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत असतानाच, दुसरीकडे घरगुती गॅससाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेतून देशाला अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले असून, अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी ‘संयम आणि बचतीचा’ मार्ग…

Read More

चिखलदरा अंध विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के:सर्व 17 दृष्टीबाधित विद्यार्थी उत्तीर्ण, यशाची परंपरा कायम

चिखलदरा येथील राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) संचालित निवासी अंध विद्यालयाने यावर्षीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवला आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व १७ दृष्टीबाधित विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. आकाश वाघमारे याने ८५.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, ऋतुजा नांदुरकर आणि आरती गायकवाड यांनी प्रत्येकी ८३.८० टक्के गुण मिळवले….

Read More

अमरावती जिल्हा परिषदेत बदली सत्र सुरू:चार विभागांतील 38 कर्मचाऱ्यांचे स्थानांतर; आरोग्य विभागाचा टप्पा बाकी

अमरावती: जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण बदली प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सत्रात चार विभागांतील ३८ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने अत्यंत पारदर्शक वातावरणात पूर्ण झाली. आरोग्य विभागातील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बदल्या सोमवारी केल्या जाणार आहेत. बदली सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात समुपदेशन आयोजित…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरण:रूपाली चाकणकरांची एसआयटीकडून 6 तास चौकशी; आर्थिक व्यवहार आणि पूजा-विधींबाबत विचारले प्रश्न

राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तास चाकणकरांना प्रश्नांच्या फेऱ्यात पकडले होते. अशोक खरात प्रकरणात…

Read More

Usha Chavan Protests Pune Municipal Corporation TDR Property Dispute

मराठी सिनेसृष्टीचे सुवर्णयुग गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात अत्यंत आक्रमक आणि वेदनादायी भूमिका मांडली आहे. आपल्या हक्काच्या जमिनीबाबत उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही पुणे महानगरपालिकेने बिल्डरच्या . पुण्यातील धनकवडी परिसरात उषा चव्हाण यांची खाजगी मालकीची जमीन आहे. या मालमत्तेचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाने संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित…

Read More