Headlines

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई:18 महिन्यांनंतर अंगरक्षक सेवेतून बडतर्फ; बिश्नोई कनेक्शन असलेल्या प्रकरणात मोठी ॲक्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात दीड वर्षानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हल्ल्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस हवालदार श्याम सोनवणे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. श्याम सोनवणे हे मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात कार्यरत होते….

Read More

'राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते':नूमवी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात विवेक सावंत यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या हस्ते नू.म. वि. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यावसायिक विठ्ठल मणियार आणि ज्येष्ठ उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना सावंत यांनी ‘राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते’ असे मत व्यक्त केले. सावंत म्हणाले की, आयुष्याच्या वाटचालीतील विद्यार्थी दशा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात पालक आणि गुरूजनांकडून…

Read More

मेफेड्रोन कारखाना सुरू करण्याच्या तयारीत तिघे जेरबंद:कुरकुंभ प्रकरणातील आरोपीची मदत घेतल्याचे उघडकीस

पुणे पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) निर्मितीचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. आरोपींनी कुरकुंभ अमली पदार्थ प्रकरणात जामिनावर असलेल्या एका आरोपीची मदत घेतल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ४५ लाख रुपयांचे एमडी आणि महागड्या मोटारी असा एकूण एक कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वाघोली परिसरात…

Read More

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून:पुणे, कात्रजमधील आंबेगाव भागात घडली घटना

कात्रजमधील आंबेगाव भागात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. दीपक क्षीरसागर (वय ३८, रा. समर्थ हाईट्स, इंद्रायणीनगर, टेल्को कॉलनी, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक क्षीरसागर हे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा…

Read More

लाडकी बहीण योजनेतील 4500 रुपये एकाचवेळी खात्यात जमा:ई-केवायसी करणाऱ्यांना दिलासा?

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम राबवण्यात आल्यानंतर लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये पात्र महिलांसाठी आता एक महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर येत आहे. ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणाऱ्या महिलांच्या खात्यात गेल्या तीन महिन्यांचे रखडलेले अनुदान एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन स्तरावर…

Read More

अंजली दमानिया यांचाही सरकारवर निशाणा:तुम्ही विमानाने फिरायचे, ताफा मिरवायचा अन् आम्हाला इंधन वाचवण्यास सांगायचे हे चालणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधनाची काटकसर करण्याचा सल्ला देण्यापेक्षा त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून व आपल्या नेत्यांपासून करावी, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधानांच्या जनतेला काटकसर करण्याच्या आवाहनाचा समाचार घेतला आहे. पंतप्रधानांनी आपण जे बोलतो ते स्वतः करावे. तुम्ही व तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी स्वतः विमानाने फिरायचे, रॅली घ्यायच्या, गाड्यांचा ताफा मिरवायचा आणि…

Read More

महासाधना सप्ताहात जि. प. ला राज्यात बहुमान‎:उत्कृष्ट कामगिरीबद्दल सीईओ मेश्राम यांचा सन्मानचिन्ह देऊन गाैरव‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या ‘महासाधना सप्ताह’ उपक्रमात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अकोला जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सन्मानाने गौरवण्यात आले. मुंबईत मंत्रालयात पार पडलेल्या सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनिता मेश्राम यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. २ ते १० एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘महासाधना सप्ताह’ अंतर्गत आयजीओटी…

Read More

मराठवाडा-विदर्भावर पुढील 24 तास संकटाचे:अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा; राज्यातील हवामानात मोठा बदल

राज्यात सध्या हवामानाचा विचित्र खेळ सुरू असून नागरिकांसह शेतकरीही मोठ्या चिंतेत सापडले आहेत. एका बाजूला कडक उन्हामुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे पोहोचला आहे, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तास मराठवाडा आणि विदर्भासाठी धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची…

Read More

धावत्या कारने अचानक घेतला पेट, चौघांनी मृत्यूला दिला चकवा:10 सेकंदात होत्याचं नव्हतं; वाढत्या उष्णतेचा कहर? हादरवणारी घटना

राज्यात वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. शहाड पूर्व परिसरातील रिलायन्स डिजिटलसमोर धावत्या टोयोटा क्रिस्टा कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सर्वांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या…

Read More

नाले स्वच्छता, अतिक्रमण हटवण्यासह काटेकोरपणे उद्यान देखभालीचे निर्देश:झोन २ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त नाईकांकडून पाहणी‎

प्रतिनिधी । अमरावती शहरातील नाले स्वच्छता, अतिक्रमण हटवण्यासह काटेकोरपणे उद्यान देखभाल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील विविध परिसरांची पाहणी केल्यानंतर दिले. शहरात सध्या नाले व लहान नाल्यांची स्वच्छता तसेच उद्यानांची देखभाल, दुरुस्ती, अतिक्रमणाची समस्या आ वासून उभी आहे. नागरिक सातत्याने याबाबत तक्रारी करीत…

Read More