Headlines

पुणे खून प्रकरण:केतनचे वडील विशाल अग्रवाल यांच्याकडून दिव्य मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रथमच पर्दाफाश

आम्ही केतनच्या मृत्यूबद्दल सियाला प्रश्न विचारत होतो आणि हे लग्न जुळवणारी तिची आत्या तिला ओढत घेऊन गेली… आमचा संशय बळावला- विशाल अग्रवाल पोलिस मृतदेह घेऊन आले तेव्हा महिला पोलिस गर्दी कमी करण्यासाठी म्हणाल्या, ‘अरे, आहे जीव. जाऊ द्या लवकर हॉस्पिटलला’ हे ऐकून सियाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले होते. १८ जूनला सियाच्या आईने आम्हाला फोन केला की…

Read More

आराखडा:"स्वयंमूल्यांकन’ न केल्याने 2 हजार 96 शाळा रडारवर, 1 लाख 8 हजार 92 शाळांपैकी 98.15% शाळांचे मूल्यांकन पूर्ण

राज्यातील शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा उंचावण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा’ अंतर्गत स्वयंमूल्यांकन प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या २ हजार ९६ शाळा आता शासनाच्या रडारवर आल्या आहेत. वारंवार मुदतवाढ देऊनही ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत या सर्व शाळांना कारणे दाखवा खुलासा सादर…

Read More

संतापजनक:दफनविधीसाठी बेवारस मृतदेह नेला घंटागाडीतून!, अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील असंवेदनशील कारभारावर व्यक्त होतोय संताप

एखाद्या शहराची ओळख केवळ रस्ते किंवा इमारतींवरून होत नाही, तर तेथील प्रशासन मानवी मूल्यांशी किती संवेदनशीलतेने वागते यावरून ठरते. मात्र, अमळनेर शहरात मानवता काळवंडणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरात आढळलेल्या एका बेवारस मृतदेहाची शवविच्छेदनानंतर दफनविधीसाठी चक्क कचरा वाहणाऱ्या “घंटागाडी’तून वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण रुग्णालयात घडला. नियमानुसार, शहरातील बेवारस मृतदेहांची सन्मानाने…

Read More

'सारथी'चे कार्य उल्लेखनीय: मुख्यमंत्री फडणवीस:मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. ‘सारथी’ (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या…

Read More

देवदर्शनासाठी गेलेल्या व्यापाऱ्याचे घर लुटले:नागपुरात 64 लाखांच्या मुद्देमालासह 2 चोरट्यांना अटक

नागपूरमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या एका किराणा व्यापाऱ्याच्या बंद घरावर डल्ला मारणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ६३,९९,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यश उर्फ बाबा संजय बनसोड (वय २५, रा. जरीपटका, नागपूर) आणि अंशुल उर्फ अनुप देवाजी वाकडे (वय २०, रा. घसीयारीपुरा, पाचपावली,…

Read More

हिंगोलीत धक्कादायक प्रकार!:परवानगीशिवाय उभारले 2 रोहित्र, 500 मीटर वीजवाहिनी; दोन जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात वीज वितरण व्यवस्थेतील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. उमरदरी आणि आडोळ शिवारात कोणतीही अधिकृत मंजुरी नसताना 63 केव्हीए क्षमतेचे दोन रोहित्र आणि सुमारे 500 मीटर लांबीची वीजवाहिनी उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महावितरणच्या तपासणीत हा प्रकार उघड झाल्यानंतर एका शेतकऱ्यासह एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या…

Read More

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास 'जेल भरो':रोहित पवारांचा सरकारला इशारा

जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार गट) त्यांनी दिला आहे. हिंगोली येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेतकरी व सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभारले जात आहे. आंदोलनाला लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून सरकारकडून…

Read More

Anjali Damani Alleges Shell Companies; Praveen Darekars Devbhau Taxi Scam?

विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबई बँकेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या ‘देवाभाऊ टॅक्सी’ योजनेमागे मोठा भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग असल्याचा दावा दमानिया . ‘देवदत्त सहकारी संस्था’ ही केवळ एक ‘शेल’ संस्था दमानिया यांच्या म्हणण्यानुसार, ‘देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्था मर्यादित’ ही…

Read More

केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय:मुख्यमंत्र्यांचा सुशिक्षित तरुणांच्या मानसिकतेवर सवाल, नसरापूर खटल्याच्या वेगवान निकालाचे केले कौतुक

लोहगड किल्ल्यावरून ढकलून करण्यात आलेली केतन अग्रवालची हत्या खरोखरच अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. समाज म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चांगल्या घरच्या आणि सुशिक्षित मुलांमध्ये अशी सूडबुद्धी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती का निर्माण होते, याचा केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक अँगलनेही तपास झाला पाहिजे, असे…

Read More

पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलू शकतं, तर बीडमध्ये का नाही?:गरळ ओकणारे लोक नकोत, आता 'शतप्रतिशत भाजप' हवा- प्रीतम मुंडे

पश्चिम बंगालसारख्या आव्हानात्मक राज्यात जर आपण भाजपचे कमळ फुलवू शकतो, तर बीड जिल्ह्यात ते का शक्य नाही? येथील कार्यकर्त्यांची परिस्थिती बंगालपेक्षा वेगळी आहे का? तुम्हालाही तिथे मिळणारा त्रास सहन करावा लागतोच आहे ना? जर आपल्याला ‘शतप्रतिशत भाजप’ हा नारा घेऊन पुढे चालायचे असेल, तर पंकजा मुंडे यांच्या जीवावर निवडून येऊन, तीन वर्षे आमदारकी पचवून त्यांच्यावरच…

Read More