धावत्या कारने अचानक घेतला पेट, चौघांनी मृत्यूला दिला चकवा:10 सेकंदात होत्याचं नव्हतं; वाढत्या उष्णतेचा कहर? हादरवणारी घटना
राज्यात वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. शहाड पूर्व परिसरातील रिलायन्स डिजिटलसमोर धावत्या टोयोटा क्रिस्टा कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सर्वांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या…