Headlines

राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह:राजकीय नेत्यांच्या घरीही लगबग, सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी; पाहा फोटोज

राज्यभरात आज बहीण-भावाच्या अतुट प्रेमाचा आणि विश्वासाचा सण असलेला ‘रक्षाबंधन’ मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि रक्षणाची प्रार्थना करते. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत घराघरांत या सणाचा गोडवा पाहायला मिळत असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही रक्षाबंधनाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी रक्षाबंधन साजरे केले…

Read More

बहिणीकडून राखीऐवजी अंत्यसंस्काराची भावांवर दुर्दैवी वेळ!:पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणावर वडेट्टीवार आक्रमक, मारेकऱ्यांना फाशीची मागणी

वाकड येथील 42 वर्षीय विवाहित शिल्पा सचिन गवारे यांच्या मृत्यूच्या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. शिल्पा गवारे यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, आरोपींना जामीन देऊ नये आणि खटला जलदगती न्यायालयात चालवून…

Read More

मार्केटयार्डमध्ये 25 लाखांचे मेफेड्रॉन जप्त:पुण्यात तरुणाला अटक, घरातून भावाच्या मदतीने करत होता विक्री

पुणे, प्रतिनिधी: मार्केटयार्ड पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका तरुणाच्या घरावर छापा टाकून 25 लाख 18 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 125 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), देशी-विदेशी दारू, शस्त्रे आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. या प्रकरणी ओम कुंडलिक गायकवाड (वय 25, रा. आनंदनगर वसाहत, मार्केट यार्ड, पुणे) याला अटक करण्यात आली आहे….

Read More

डोंगरकडात जुन्या वादातून कुटुंबावर प्राणघातक हल्ला:4 जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथे गाडीची काच फोडल्याच्या कारणावरून तसेच जुन्या वादातून एकाच कुटुंबातील तीन सदस्यांवर लोखंडी रॉड, टॉमी, वीट आणि काठीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुरुवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला…

Read More

BJP Attacks Congress Over Tribal Student Protest in Maharashtra

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फा . सरकारने मागण्या मान्य केल्या, लेखी आश्वासनही दिले नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आतापर्यंत तीन ते चार वेळा…

Read More

उपचारांच्या वेदनेतही राखीचा आनंद:माहीममध्ये कर्करोगग्रस्त चिमुकल्यांचे अनोखे रक्षाबंधन, महापौर रितू तावडेंचाही सहभाग

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील माहीम येथे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या लहान मुलांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत अनोख्या आणि भावनिक पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. उपचारांच्या वेदनेतही काही काळ विरंगुळा मिळावा आणि मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही हजेरी लावली आणि चिमुकल्यांसोबत हा उत्सव साजरा…

Read More

रिक्षाचालकांच्या मुदतवाढीवरून संजय राऊतांचा घणाघात:म्हणाले- हा निर्णय मराठी माणसासाठी नाही, तर हिंदी भाषिकांसाठी, अमित शाहांनी मोहीम केराच्या टोपलीत टाकली

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने एक वर्षाची मुदत दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी सरकारच्या मराठी भाषा धोरणावर प्रश्न…

Read More

एकाच कामाला दोन योजनांचा ‘मुलामा’; खामगावातील विकास कामांवर आरोप:तांडा-दलित वस्ती सुधार योजनेतील कामांची चौकशी करण्याची मागणी‎

तालुक्यातील खामगाव येथे तांडा वस्ती सुधार योजना आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण बडधे यांनी केला आहे. या दोन्ही योजनांमधून मंजूर कामांची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर . तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर झाले होते. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप…

Read More

उसाचा दुसरा हप्ता 300 रुपये द्यावा, ‘स्वाभिमानी’ची कारखान्यांकडे मागणी:‘सहकार महर्षी’‎,‘ सहकार शिरोमणी’श्री पांडुरंगला दिले निवेदन‎

माळशिरस तालुक्यासह राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तातडीने अदा करावा. तसेच काही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिला हप्ता अद्याप दिला नसेल तर तोही तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक . यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, भाळवणी, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर, श्री विठ्ठल सहकारी…

Read More

मराठीपेक्षा सरकारला 'यूपी'च्या निवडणुका महत्त्वाच्या?:मुदतवाढीवरून अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, चालकांना दिली मनसे स्टाईल कारवाईची धमकी

राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या वर्षभरात त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान या निर्णयाचा समाचार…

Read More