Headlines

फोंडशिरस येथे पेरूची बाग अन् गवारीचे पीक भुईसपाट:सलग दोन दिवस वादळी पावसाचा तडाखा‎

माळशिरस तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस या अवकाळी आणि वादळी पावसामुळे तालुक्यातील फोंडशिरस येथील शेतकरी अजय निटवे यांच्या शेतातील पेरूची बाग आणि गवारीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले असून, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या अस्मानी संकटामुळे निटवे यांच्या डोळ्यात अश्रू आले असून ते पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. चालू वर्षी उन्हाळ्याची…

Read More

दिल्लीत 8 जून रोजी I.N.D.I.A ब्लॉकची बैठक होण्याची शक्यता:राहुल, ममता आणि अखिलेश यांच्यासह 15 पक्षांचे नेते येऊ शकतात; एकजुटीवर चर्चा

विरोधी पक्ष आघाडी इंडिया (I.N.D.I.A) ब्लॉकच्या वरिष्ठ नेत्यांची 8 जून रोजी दिल्लीत बैठक होऊ शकते. न्यूज एजन्सी PTI शी संबंधित सूत्रांनुसार, बैठकीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होऊ शकतात. या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा सामना करण्यासाठी आणि विरोधी…

Read More

गोलमाल:वारा आला की शेड उडेल; ढोरजळगावात १२ लाखांच्या कामाचा “कागदी’ वाघ, ठेकेदार व अभियंत्यांची मिलीभगत उघड; पेव्हिंग ब्लॉकच्या कामात डबरऐवजी मुरूम‎

ढोरजळगाव आरोग्य केंद्रात उभारलेले निकृष्ट प्रकारचे शेड. प्रतिनिधी | शेवगाव शासनाकडून विकासकामांसाठी लाखो रुपयांचा निधी येतो, पण अधिकारी आणि ठेकेदारांचे ‘रिंगण’ तो निधी कसा फस्त करते, याचे जिवंत उदाहरण शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या देखभाल-दुरुस्ती . सीईओंकडे तक्रार करणार! “कामाच्या दर्जाबद्दल राम राजळे व दत्तात्रय कर्डिले या अधिकाऱ्यांना विचारणा…

Read More

विदर्भात 54 टक्के पावसाची तूट:जून संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही, पेरण्या खोळंबल्या

चालू मान्सून हंगामात विदर्भात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान विभागाने १ ते २४ जून २०२६ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः १२०.४ मिमी पावसाची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात केवळ ५५.५ मिमी…

Read More

अनुसूचित जातीच्या 59 जातींचा जनसागर रस्त्यावर उतरणार:उपवर्गीकरणाचा घाट हाणून पाडण्यासाठी तिवस्यात ‘एल्गार मोर्चा

देशात हिंदू-मुस्लिम वाद पेटवल्यानंतर आता केंद्र व राज्य सरकारने जाती-जातीत भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहेत. अनुसूचित जातीतील ५९ जातींचे हक्काचे १३ टक्के आरक्षण संपवण्याचा सरकारचा हा कुटील डाव असून, हा उपवर्गीकरणाचा घाट कोणत्याही परिस्थितीत हा . या मोर्चात ५ हजारपेक्षा जास्त आंबेडकरी जनसागर रस्त्यावर उतरणार असून, तालुक्यातील सामाजिक व राजकीय वातावरण या निमित्ताने कमालीचे…

Read More

मोर्शीत गारपिटीचा तडाखा; खांब वाकले, झाडेही पडली:संत्रा उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटात‎

मोर्शी शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस व जोरदार गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च व बाजारातील अनिश्चिततेचा सामना करणारा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मोर्शी शहरातील एसटी डेपो लगत अप्पर वर्धा कॉलनीकडे…

Read More

घोळसगावचा रस्ता वर्षभरात करणार, शनैश्वर दर्शन भक्तांसाठी होईल सुकर:गुणवंत विद्यार्थी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे नूतन सदस्यांचा सन्मान‎

सर्वधर्मीय जागृत शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान घोळसगाव येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भाविक भक्तांना अनेक अडचणीतून मार्ग काढावा लागतो. येत्या शनी अमावास्या यात्रेपर्यंत घोळसगाव ते बोळेगाव शिवपर्यंत आणि घोळसगाव ते किरनल्ली रस्त्यापासून श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थानपर्यंत पक्का मजबूत रस्ता तसेच आमदार निधीतून येथे सभागृहांचे बांधकाम करण्याचे आश्वासन उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांनी दिले. जय भारत माता सेवा…

Read More

राजा शिवाजी चित्रपत करमुक्त करा:अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; हिंदवी स्वराज्याचा दाखला देत शिवरायांचे केले कौतुक

शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अभिनेते रितेश देशमुख लिखित – दिग्दर्शित “राजा शिवाजी” हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंबंध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य, त्यांचे अद्वितीय शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा महान इतिहास हा महाराष्ट्राच्या तसेच संपूर्ण…

Read More

स्थलांतरित मजुरांना सहज मिळेल 5 किलोचा गॅस सिलेंडर:सरकारने राज्यांची दैनंदिन मर्यादा दुप्पट केली, इराणमधील युद्धामुळे निर्णय घेतला

केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 5KG फ्री ट्रेड एलपीजी (FTL) सिलिंडर्सची दैनंदिन मर्यादा दुप्पट केली आहे. वाढवलेला कोटा विशेषतः स्थलांतरित मजुरांसाठी राखीव असेल. सरकारने 2-3 मार्चच्या सरासरी विक्रीच्या आधारावर 5KG एलपीजी सिलिंडरचा अतिरिक्त पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, जो आधीच निश्चित केलेल्या 20% मर्यादेपेक्षा वेगळा असेल. अमेरिका-इराण यांच्यातील युद्धामुळे एलपीजीचा पुरवठा बाधित होत…

Read More

श्रीगोंदेत चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन प्रेयसीची निर्घृण हत्या, मृतदेह जाळला:पुरावा नष्ट करण्यासाठी बापानेही केली मदत, तिघांवर गुन्हा

श्रीगोंदेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच 24 वर्षीय प्रियकराने चारित्र्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने आपल्या बापाच्या मदतीने तिचा मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळला. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओहळ आणि त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करणारे त्याचे वडील सुखदेव ओहळ या…

Read More