पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर जाती,कुळाचे बंधन नष्ट होते- रामदास महाराज:शिऊर येथील संत शिवाई मंदिरात निळोबा महाराज गाथा पारायणाची सांगता
देवाची अनन्य भक्ती करताना व पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर संतांचे सांसारिक जाती व कुळाचे बंधन पूर्णपणे नष्ट होते. ईश्वरभक्तीत एवढी तल्लीनता असते की त्यांना समाज किंवा नात्यागोत्यांनी दिलेल्या लौकिक दर्जाची किंवा भेदाभेदाची कोणतीही पर्वा नसते, असे प्रतिपादन रामदास महाराज पवार यांनी शिऊर येथे केले. संत शिवाई मंदिरात अधिक मासानिमित्त श्री संत निळोबा महाराज गाथा पारायण…