Headlines

संभाजीनगरात गोवंश तस्करांच्या टोळीवर थेट ‘मकोका’:मुख्य आरोपीसह 14 जणांवर गुन्हा दाखल, बकरी ईदच्या पूर्वसंध्येला 131 गोवंशांची केली होती सुटका

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या १३१ गोवंशांना अमानुष पद्धतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावर डांबून ठेवले होते. पोलिसांनी धडक कारवाई करत त्या १३१ गोवंशाची सुटका केली होती. दरम्यान, कारवाईच्या तीन दिवसांनंतर जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या या अवैध गोवंश तस्करी आणि साठवणुकीच्या संपूर्ण रॅकेटविरुद्ध थेट मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे….

Read More

कंगनाची क्वीन 2 विवादात:फँटम स्टुडिओने जिओ स्टुडिओविरुद्ध 250 कोटी रुपयांचा खटला दाखल केला, आरोप- चित्रपटाचे हक्क

कंगना रणौतने नुकतेच 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिट चित्रपट ‘क्वीन’च्या ‘क्वीन 2’ या सिक्वेलचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग संपताच चित्रपट वादात सापडला. चित्रपटाचे 50 टक्के हक्क असलेल्या प्रॉडक्शन हाऊसने हा सिक्वेल बनवणाऱ्या जिओ स्टुडिओविरुद्ध 250 कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. फँटम स्टुडिओने नुकतेच बॉम्बे उच्च न्यायालयात जिओ स्टुडिओविरुद्ध 250 कोटींचा खटला दाखल करून…

Read More

काजोल म्हणाली- आमिरला चित्रपटांबद्दल जबरदस्त समज:मस्करीत म्हटले- महिलांबद्दलची समजही चांगली, ऐकून अभिनेता हसला

आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि ‘आमिर खान प्रोडक्शन्स’च्या २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काजोलने आमिरच्या चित्रपटांच्या निवडीचे कौतुक केले. काजोल म्हणाली की, आमिरच्या प्रोडक्शन कंपनीने ‘लगान’पासून आतापर्यंत उत्कृष्ट चित्रपटांची निवड केली आहे, जे त्याच्या उत्तम निवडीचे प्रदर्शन करते. यानंतर काजोलने विनोदी शैलीत सांगितले की, आमिरला चित्रपटांप्रमाणेच महिलांबद्दलही चांगली समज आहे. यावर अभिनेता…

Read More

लेक लाडकी योजनेचा 9 हजार मुलींना लाभ:पुणे जिल्ह्यात तीन वर्षांत 4.74 कोटी रुपये वितरित; सीईओ पाटील यांची माहिती

पुणे जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत ९ हजार ४८२ मुलींना लाभ मिळाला आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या या मुलींना मागील तीन वर्षांत ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले….

Read More

'अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व'!:मशाल गायब, उद्धव ठाकरेंचाही फोटो नाही; बंडू जाधवांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले नवे राजकीय संकेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये शिवसेना…

Read More

हिंगोलीत इंधन पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन:इंदिरा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी

हिंगोली जिल्हयासह राज्यभरात इंधन पुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी ता. २५ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्या समोर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. हिंगोली येथील इंदिरा गांधी पुतळा…

Read More

बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला आली होती:3 कोटी रुपयांना आलिशान रिसॉर्ट बुक केले होते, केतनसोबत इथेच लग्न करण्याचा हट्ट केला होता

पुणे (महाराष्ट्र) येथील गाजलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल तिचा प्रियकर चेतन चौधरी (23) सोबत उदयपूरलाही आली होती. सियाला सरोवरांचे शहर उदयपूरची सुंदरता इतकी आवडली होती की तिने केतन अग्रवालसोबत उदयपूरमध्येच लग्न करण्याचा हट्ट धरला होता. सियाचा हाच हट्ट आणि तिचे म्हणणे मान्य करून केतनने उदयपूरमधील प्रसिद्ध ‘अनंता रिसॉर्ट’ला डेस्टिनेशन वेडिंगसाठी निश्चित केले होते….

Read More

शर्तभंग प्रकरणांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे:नागरिकांना मंत्रालयात जाण्याची गरज नाही, निपटारा स्थानिक पातळीवर

राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता नियमांतर्गत सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी करत शर्तभंग प्रकरणांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शर्तभंग प्रकरणांच्या निपटाऱ्याचे अधिकार आता विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. यापूर्वी हे अधिकार केवळ महसूल मंत्र्यांकडे होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून, या निर्णयाची अधिसूचनाही जारी करण्यात आली…

Read More

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस:शेतकरी कर्जमाफी, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, पेपरफुटी, कायदा-सुव्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. . दरम्यान, अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले होते, तोच मुद्दा आज पाचव्या दिवशीही विरोधक लावून धरण्याची चिन्हे आहेत. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार असून,…

Read More

'ये है मोहब्बतें' मधील रुही 'खतरों के खिलाडी' मध्ये दिसणार:म्हणाली – आता मी लहान मुलगी राहिले नाही; दिव्यांकाला 'आयर्न लेडी' मानते

टीव्हीवरील सर्वात लाडकी आणि निरागस ‘रुही’ म्हणजेच रुहानिका आता मोठी झाली आहे. ‘ये है मोहब्बतें’ मध्ये आपल्या अभिनयाने कोट्यवधी लोकांची मने जिंकणारी रुहानिका आता एका नवीन अवतारात दिसणार आहे. ती रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या शोद्वारे रिॲलिटी टीव्हीच्या जगात पदार्पण करत आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना रुहानिकाने तिच्या या नवीन प्रवासावर, तिची जुनी…

Read More