Headlines

एआयने दिग्गज कंपन्यांचे बजेट बिघडवले:मायक्रोसॉफ्टने परवाने थांबवले, उबरचा वर्षभराचा निधी 4 महिन्यांतच संपला

गेल्या दोन वर्षांपासून टेक इंडस्ट्रीमध्ये एक घोषणा घुमत आहे… ‘एआय लवकरच सॉफ्टवेअर अभियंत्यांची जागा घेईल आणि कंपन्यांचा खर्च अर्धा होईल.’ या आश्वासनाने शेअर बाजाराला गगनाला भिडवले, कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली आणि कोट्यवधी रुपये एआय इन्फ्रावर खर्च केले. पण, जेव्हा ही साधने कामावर लावली गेली, तेव्हा समोर आलेल्या इनव्हॉइसने दिग्गज कंपन्यांना धक्का बसला. सर्वात…

Read More

Bhaskar Jadhav Slams BJP Over Ram Mandir Theft Controversy

शिवसेना (यूबीटी) नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार निशाणा साधला. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणारे आता राम मंदिरातील चोरीबाबत गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित के . ‘मातोश्री म्हणजे मशिद आहे का?’ हनुमान चालिसा आंदोलनाचा संदर्भ देताना जाधव म्हणाले की, राज ठाकरे यांनी मशिदींवरील…

Read More

अमरावतीत रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण दोन्ही प्रभावित:जीएमसी-इर्विन रुग्णालयांच्या हस्तांतरणामुळे निर्माण झाला पेच

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) यांच्यातील हस्तांतरणाच्या वादामुळे रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण दोन्ही प्रभावित झाले आहे. जीएमसीच्या शिकाऊ डॉक्टरांना अभ्यासासाठी रुग्ण मिळत नाहीत, तर इर्विन रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. हा तांत्रिक पेच वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांपर्यंत पोहोचला असून, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. अमरावतीमध्ये…

Read More

डाबली-धांदरणे जिल्हा परिषद शाळेत सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक

तालुक्यातील डाबली धांदरणे येथील जिल्हा परिषद शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आली होती. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे, सदस्य पुना मंगळे, गजानन पाटील, भगवानसिंग गिरासे, तसेच पालक हरीश संकलेचा, अनिल कोळी, सुदाम देवरे आणि रामकृष्ण पाटील यांची प्रमुख…

Read More

प्रेमानंदजींचे आवाहन- मी असो वा नसो, नेहमी सोबत राहीन:माझी काळजी सोडा, श्रीजींचे ध्यान करा; तब्येत बिघडल्यानंतर 9 दिवसांपासून पदयात्रा बंद

‘मुळीच काळजी करू नका. आम्ही भेटलो नाही तरी, बोललो नाही तरी, आम्ही तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो. शेवटची गोष्ट हीच की, काळजी करायची नाही. आपले उत्थान कसे होईल, याचीही चिंता करायची नाही. न बोलताही आम्ही तुमच्या मनात असू.’ हे भावनिक आवाहन वृंदावनमध्ये संत प्रेमानंद महाराजांनी व्हिडिओ जारी करून आपल्या शिष्यांना आणि भक्तांना केले. 1 मिनिट…

Read More

भाविकांची गैरसोय:पैठण शहरामधील 8 नाल्यांचे पाणी गोदावरीच्या नदीपात्रात‎, विविध जिल्ह्यांतून दररोज 6 हजार भाविक येतात स्नानासाठी,

येथील गोदावरी नदीत अधिक मासानिमित्त पवित्र स्नानासाठी दररोज ५ ते सहा हजार भाविक येतात. मात्र, नदीपात्रात ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक मासात गोदावरी स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दररोज पाच हजार भाविक संत एकनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागे, नागघाट आणि इतर घाटांवर स्नानासाठी येत आहेत. मात्र शहराच्या…

Read More

नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं आयुष्य:25 लाख, 21 तोळे सोने अन् तरीही छळ कायम; जादूटोण्याच्या नावानेही धमकावलं

नाशिक शहरातील जेलरोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संसार सुखाचा व्हावा म्हणून माहेरकडून लाखो रुपये आणि सोनं देऊनही एका विवाहितेला सासरच्या छळाला सामोरं जावं लागलं. अखेर सततचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात संतापाचं…

Read More

विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावा

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे‎उमेदवार नंदकिशोर महाजन यांना‎उमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिली‎याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट‎चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल‎करण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजी‎टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी‎दिल्लीवरून उमेदवारी जाहीर झाल्याचे‎स्पष्ट केले होते; मात्र रविवारी‎महायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री‎तथा खासदार रक्षा खडसे यांनी‎उमेदवार दिल्लीचा नव्हे तर मंत्री गिरीश‎महाजनांनी दिल्याचा दावा केल्याने‎खळबळ उडाली; मात्र महाजनांनी‎खडसेंचा हा दावा खोडून काढत…

Read More

राजस्थानमध्ये पहिल्यांदाच कारागृहात 2 खुन्यांचे लग्न:22 जुलै रोजी सप्तपदी, युवकाने शेजाऱ्याचा आणि युवतीने पतीचा खून केला होता

जोधपूरच्या मंडोर खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले युवक-युवती 22 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याला परवानगी दिली आहे. राजस्थानच्या न्यायिक इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखाद्या खुल्या कारागृहाच्या (खुला बंदी शिबिर) आवारात दोन दोषींचा विवाह होईल. युवक नागौरचा, तर युवती मुंबईची रहिवासी आहे. कारागृहातच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी…

Read More

रामगडमध्ये ट्रक – पिकअपची धडक, 7 ठार:गाडीत अडकले मृतदेह, रस्त्यावर विखुरले ढोल – ताशे; सर्व बँड – बाजा पार्टीशी संबंधित होते

झारखंडमधील रामगढ जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या एका रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात रजरप्पा पोलिस स्टेशन हद्दीतील लारी-बरलौंगजवळ रामगढ-बोकारो मुख्य मार्गावर (एनएच-23) झाला. कोळशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडकेनंतर पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यात बसलेले सर्व जण बँड-ताशा पार्टीशी संबंधित होते. अपघातानंतर त्यांचे…

Read More