Headlines

मोदी सलग दुसऱ्या दिवशी म्हणाले- पेट्रोल-डिझेलचा कमी वापर करा:सोन्याची खरेदी टाळा, खाद्यतेलाचाही वापर कमी करा, शाळांनी ऑनलाइन वर्ग चालवावे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्या दिवशी लोकांना इंधन आणि संसाधनांचा कमी वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, देशाला परकीय चलन वाचवण्यासाठी आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी जनसहभागाची गरज आहे. जिथे शक्य असेल तिथे मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. वडोदरा येथे मोदी म्हणाले की, ज्याप्रमाणे देशाने एकत्र येऊन कोरोना संकटाचा सामना केला होता,…

Read More

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय!:आता मिळणार स्वतंत्र ‘शेतकरी’ दर्जा; फडणवीस सरकार आणणार नवा कायदा

महाराष्ट्रातील लाखो महिला शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. शेतीत प्रत्यक्ष राबणाऱ्या, पण जमिनीची मालकी नसल्यामुळे अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहणाऱ्या महिलांना आता स्वतंत्र ‘शेतकरी’ म्हणून वैधानिक मान्यता मिळणार आहे. यासाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026’ पावसाळी अधिवेशनात सादर करण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read More

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे:ते काँग्रेस किंवा भाजपसोबत जातील असं वाटत नाही- अंबादास दानवे

शरद पवारांचे नेतृत्व खूप मोठे आहे. ते काँग्रेस किंवा भाजपसोबत स्वतंत्रपणे जातील असे मला वाटत नाही. लोकसभा आणि आगामी विधानसभेत पवारांचा पक्ष, काँग्रेस आणि आम्ही एकत्रच आहोत, असे उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत यांच्या सल्ल्यांबाबत विचारले असता, राऊत हे शिवसेनेचे नेते असून ते इतर पक्षांना नाही तर केवळ शिवसैनिकांनाच सल्ला…

Read More

राज्यसभेच्या खासदारपदासाठी छगन भुजबळांच्या अटी-शर्ती:पुतण्या समीरला येवल्यातून विधानसभेची उमेदवारी आणि कॅबिनेट मंत्रिपदही हवे

राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकाला राज्यसभेवर जाण्याची संधी आहे. या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. मात्र, खासदारकीसोबत दोन अटी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांपुढे घातल्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे त्यांच्या रिक्त होणाऱ्या विधानसभेतील येवला मतदारसंघाची जेव्हा पोटनिवडणूक होईल तेव्हा त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यालाच पक्षातर्फे उमेदवारी…

Read More

FSSAI Notice: Misleading Food Names Violation

नवी दिल्ली50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने रविवारी देशातील 8 मोठ्या फूड कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कंपन्यांवर त्यांच्या उत्पादनांची ब्रँड नावे, ट्रेड नावे आणि जाहिरातींमध्ये ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे केल्याचा आरोप आहे. नियामकाने स्पष्ट केले आहे की, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट, 2006 अंतर्गत अशी…

Read More

युवकांनी निर्व्यसनी राहून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे:धोडंबे येथील गोरक्षनाथ स्कूलमध्ये डॉ. साळुंके यांचे आवाहन‎

देशाचे भवितव्य असलेल्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपली ऊर्जा, कौशल्ये, क्षमता राष्ट्रनिर्मितीसाठी वापरावी, असे आवाहन नशाबंदी मंडळाचे नाशिक जिल्हा संघटक तथा मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी केले. जिल्हा समाजकल्याण कार्यालय नाशिक, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (मुंबई) आणि मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताहा’चा शुभारंभ धोडंबे…

Read More

हवामान अंदाजांचा रंजक इतिहास:प्राचीन आडाख्यांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत; जाणून घ्या, कसे वर्तवतात भाकीत!

मानवी जीवन आणि निसर्ग यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मानवाने जेव्हा शेती करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच त्याला हवामानाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला आहे. पाऊस कधी पडणार? वादळ कधी येणार? हिवाळा किती तीव्र असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मानवाची धडपड हजारो वर्षांपासून सुरू आहे. प्राचीन काळी ढगांचा रंग आणि वाऱ्याची दिशा पाहून बांधल्या जाणाऱ्या आडाख्यांपासून ते…

Read More

नागपुरात हिट अँड रन, वृद्ध महिलेचा मृत्यू:मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने चिरडले

नागपूर शहरातील गजबजलेल्या धरमपेठ परिसरात पहाटेच्या सुमारास एका भीषण हिट अँड रनची घटना घडली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका वृद्ध महिलेला भरधाव कारने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. ही दुर्घटना धरमपेठेतील सुगंध मंगल कार्यालयाजवळील चौकात घडली. मंगला केवटे (अंदाजे ७० वर्षे) या नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी…

Read More

भारताने म्हटले- चीनने दिलेली नावे बनावट, अरुणाचल भारताचा भाग:खोटे दावे वास्तविकता बदलत नाहीत; चीनने 9 वर्षांत 62 ठिकाणांची नावे बदलली

चीनकडून अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना बनावट नावे देण्याच्या प्रयत्नावर भारताने आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले की, असे खोटे दावे जमिनीवरील वस्तुस्थिती बदलू शकत नाहीत. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो. खरं तर, चीन अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांसाठी आपल्या सोयीनुसार नावे ठरवत आला आहे आणि त्यावर दावा करत आहे. भारताने अशा…

Read More

शिमला हवाई कनेक्टिव्हिटीवर हिमाचल उच्च न्यायालय कठोर:केंद्र सरकारला नोटीस जारी; सेवा सुरू ठेवण्याचे आदेश; 7 महिन्यांनंतर उड्डाण सुरू

हिमाचल उच्च न्यायालयाने शिमलाच्या हवाई सेवांबाबत केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत की, भविष्यात शिमलाच्या हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये. न्यायालयाने या संदर्भात केंद्र सरकारला पुढील सुनावणीपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. मुख्य न्यायाधीश गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती बीसी नेगी यांच्या खंडपीठाने हे देखील विचारले की, सुधारित उड्डाण योजना कधी लागू होईल आणि चंदीगड-शिमला…

Read More