Headlines

नव्या 2 सिस्टिम्सने मान्सून वेग पकडणार:20 जुलैपासून उत्तर, मध्य भारतात पाऊस, बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आशादायक चित्र

देशात कमकुवत झालेल्या मान्सूनला पुन्हा एकदा गती मिळण्याचे संकेत दिसत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि त्याला लागून असलेल्या ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील सात दिवसांत पूर्व आणि पूर्वोत्तर भारत, पूर्व यूपी तसेच पश्चिम हिमालयीन क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर वाढेल. अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ओडिशामध्ये १६…

Read More

कोलकाता येथे बांधकाम सुरू असलेले गोदाम कोसळले, 5 जणांचा मृत्यू:50-55 लोक दबले असण्याची शक्यता, 4 जणांना वाचवले; सेनाही बचावकार्यात सामील

कोलकाताच्या पश्चिम भागातील तारातला येथे बुधवारी दुपारी एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाचे छत कोसळले. या दुर्घटनेत 5 लोकांचा मृत्यू झाला, तर 50-55 लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 4 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, ही दुर्घटना तारातला परिसरातील ब्रेस ब्रिजजवळ, ट्रान्सपोर्ट डेपो रोडवरील एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामात घडली….

Read More

शिवन्यात दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; रस्त्याच्या कडेलाच टाकतात कचरा:कचरामुक्तीच्या केवळ घोषणा, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎

स्वच्छ भारत अभियान (टप्पा दोन) अंतर्गत गाव हागणदारीमुक्त व कचरामुक्त करण्याच्या वल्गना एकीकडे शासन पातळीवर केल्या जात असताना, प्रत्यक्षात सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे गावात प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधून प्रवेश करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला . ग्रामपंचायत आवारात साचलेला कचरा, गल्लोगल्ली तुंबलेल्या गटारी, उखडलेले रस्ते, तुटलेले ढापे आणि नळाला येणारे अशुद्ध पाणी यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या…

Read More

ताशे चोरीप्रकरणी आरोपीला अटक:अमरावतीत ४८ हजार रुपये किमतीचे ८ ताशे जप्त

अमरावती शहर कोतवाली पोलिसांनी ४८ हजार रुपये किमतीचे आठ ताशे चोरणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अंबापेठ येथील मनिबाई गुजराती शाळेजवळ राहणारे प्रसाद राजेंद्र जगताप (वय २६) यांनी २३ जून रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये ठेवलेल्या नऊ ताशांपैकी आठ ताशे २२ जून…

Read More

आईच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाला लेकीने दिले शब्दरूप:‘सोलीना’ पुस्तकाचे‎झाले थाटात प्रकाशन‎

लेखिका, पत्रकार डॉ. शुभांगी अरुण जोशी लिखित ‘सोलीना’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. या वेळी उद्योजक नितीन देशमुख, कल्पना देशमुख यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले . या वेळी विमल जोशी यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे औचित्यही साधले. ‘सोलीना’ हे पुस्तक डॉ. शुभांगी जोशी यांच्या स्व. मातोश्री विभावरी हिवरखेडकर यांच्या जीवनावर आधारित असून, एका सामान्य स्त्रीच्या असामान्य…

Read More

कल्याण रेल्वे स्टेशनवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार:पीडिता मुलगी मामाच्या घरी जात होती; लोकलची वाट पाहताना आरोपीने हेरले

अहिल्यानगरहून खोपोली येथे आपल्या मामाच्या घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने कल्याण रेल्वे स्थानकावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना ही घटना घडली आहे हे विशेष. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पीडित मुलगी अहिल्यानगर येथून खोपोली येथे आपल्या मामाच्या गावी जात होती. ती कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेनची…

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर मोठा निर्णय:आरोग्य विभागाची नवी पॉलिसी जाहीर; बदल्यांसाठी नवे कडक नियम लागू

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे. या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या धोरणामुळे बदल्यांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः गट-ब, गट-क आणि गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी हे सर्वसमावेशक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बदल्यांबाबत…

Read More

TMC मुख्यालयावर बंडखोर गटाचा ताबा:कुलूप-पोस्टर बदलले, यांमध्ये ममताचा फोटो नाही; एक दिवसापूर्वी पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता

तृणमूल काँग्रेस (TMC) च्या बंडखोर गटाने शुक्रवारी कोलकाता येथील पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवला. ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर नेत्यांनी मेट्रोपॉलिटन येथील मुख्यालयाचे कुलूप बदलले, नवीन पोस्टर्स लावले, ज्यात ममता बॅनर्जी यांचा फोटो नव्हता. मात्र, कार्यालयाच्या आत आधीपासून लावलेले ममता बॅनर्जी यांचे फोटो आणि कटआउट काढण्यात आले नाहीत. ऋतब्रत बॅनर्जी वरिष्ठ नेते आणि पक्षाच्या कोषाध्यक्षांसह TMC…

Read More

अकोल्यात कोट्यवधींचा घोटाळा उघड:गजानन पतसंस्थेत गैरव्यवहार; अध्यक्ष आणि सीईओ अटकेत, ठेवीदारांचे 25 कोटी अडकले

अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाख रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत….

Read More

जरांगेंच्या आंदोलनापुढे सरकार पूर्णपणे झुकले:सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला; फडणवीसांनी ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली- हाके

मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीच्या आंदोलनासमोर हे सरकार पूर्णपणे झुकले असून, त्यांच्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. या लोकनियुक्त सरकारने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. लक्ष्मण हाके म्हणाले की, राज्यातील लोकसंख्येचा विचार करता ओबीसी समाजाला अर्थसंकल्पात 50 टक्के निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, देवेंद्र…

Read More