Headlines

घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी लाच:सवना येथील ग्रामसेवकास अडीच हजार घेताना पकडले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सेनगाव तालुक्यातील सवना येथील ग्रामसेवकास घरकुलाच्या चौकशी पाहणी अहवालावर स्वाक्षरीसाठी अडीच हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ता. १३ दुपारी गोरेगाव चौफुली येथे रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवना येथील एका लाभार्थ्याला घरकुल मंजूर झाले होते….

Read More

अभिनेता विजय यांच्या शपथविधीत आई-वडील हात जोडून उभे होते:पहिल्यांदाच एका नेत्याने पँट, शर्टमध्ये शपथ घेतली, 6 मोमेंट्स

तमिलगा वेत्री कडगम (TVK) प्रमुख आणि अभिनेत्यातून नेते बनलेले सी. जोसेफ विजय रविवारी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत. शपथविधीदरम्यान काही क्षण असेही होते जे चर्चेत राहिले. शपथपत्र न वाचता ते भाषण देऊ लागले, जसे त्यांनी ‘मी जोसेफ विजय…..’ असे म्हटले, समर्थकांनी 3 मिनिटे टाळ्या वाजवल्या. आई-वडील हात जोडून दिसले. यादरम्यान राज्यपालांनी त्यांना थांबवले. तामिळनाडूमध्ये शपथविधीचे…

Read More

संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मनपाची मोठी कारवाई:5 हजार 170 किलो प्लास्टिक जप्त, 75 हजार रुपयांचा दंड

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई केली आहे. मध्यवर्ती भागात केलेल्या या धडक मोहिमेत ५१७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित विक्रेत्यांकडून ₹७५,००० दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई झोन क्र. २ अंतर्गत अंगुरी बाग आणि जुना मोंढा परिसरातील ३ ते ४ दुकानांची तपासणी करून करण्यात आली. यामध्ये शालिमार प्लास्टिक, संजय…

Read More

अमरावतीत 876 लखपती थकबाकीदारांची नावे जाहीर:मनपाने पहिल्यांदाच प्रसिद्ध केली यादी, रक्कम भरण्याचे आवाहन

अमरावती महानगरपालिकेने एक लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकी असलेल्या ८७६ मालमत्तांची यादी जाहीर केली आहे. पालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असून, थकबाकीदारांना तातडीने रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही यादी झोन क्र. १ ते ५ मधील संपूर्ण शहरातील मालमत्तांची आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी पालिकेच्या महसुलात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे….

Read More

जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या 9, 10 मे रोजी:कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, वित्त, मबाक विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश

अमरावती जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ९ आणि १० मे रोजी सुरू होणार आहे. या दोन दिवसांत समुपदेशन आणि बदलीचे आदेश एकाच वेळी दिले जातील. जिल्हा परिषदेतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी साधारणतः १० टक्के कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय आणि तेवढ्याच कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या केल्या जातात. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाने या बदली प्रक्रियेची तयारी…

Read More

परकीय गुंतवणुकीचा ओघ आटला:देशात आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती, काँग्रेस प्रवक्ते तिवारींची केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांच्या मते, जागतिक युद्धजन्य परिस्थितीसोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे देशात ‘आर्थिक आणीबाणी’ सदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिवारी यांनी म्हटले की, देशाचे अस्थिर परराष्ट्र धोरण, देशांतर्गत अशांतता, बिघडलेला सामाजिक सलोखा आणि…

Read More

हळदवाडी साठवण तलावामुळे 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार:दोन गावांची तहान भागणार, मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

हिंगोली तालुक्यातील हळदवाडी साठवण तलावाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु झाले असून कामाला गती आली आहे. या तलावात 1.646 दशलक्ष घनमीटर पाणीसठा होणार असून त्यातून दोन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. या शिवाय 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तलावाच्या कामाची शनिवारी ता. 18 आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी…

Read More

शनिशिंगणापूर देवस्थानला आता मिळणार ‘मंत्रालयीन’ बळकटी‎:कार्यकारी अधिकारीपदी कक्ष अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; 30 एप्रिलपर्यंत मागवले अर्ज

. प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार आता अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आता मंत्रालयीन ‘कक्ष अधिकारी’ दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. २०१८ च्या विशेष कायद्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थान सरकारी अखत्यारीत आले…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा‎:संत रविदास फाउंडेशन सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी- आमदार सई डहाके

कारंजा नगरीत नव्याने स्थापन झालेली ‘श्री संत रविदास फाउंडेशन’ ही संस्था केवळ एका संघटनेची निर्मिती नसून, सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी आहे. या संस्थेची प्रेरणा संत रविदासांच्या विचारांतून आलेली आहे, ही तिची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. संत रविदासांनी मांडलेली समतेची, बंधुत्वाची आणि श्रमप्रतिष्ठेची भूमिका ही भारतीय समाजव्यवस्थेला दिशादर्शक ठरलेली आहे. जात, पंथ, आर्थिक…

Read More

'लिंकिंग'ची भानगड शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट:खते घेताना कृषी सेवा केंद्रांकडून महागड्या औषधी घेण्याची सक्ती, रोहिणी खडसे यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांसोबत महागडी औषधी घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या मुद्यावर संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल या प्रयत्नातच सरकार व मोठमोठ्या कंपन्या असतात की काय असा प्रश्न निर्माण होतो. लिंकिंग ही भानगड तर शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट आहे,…

Read More