Headlines

गणगणे विद्यालयात दिले व्यसनमुक्तीचे धडे:अकोट‎ ग्रामीण पोलिसांनी केले मार्गदर्शन‎

अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील राधाबाई गणगणे विद्यालयात अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनच्या माध्यमातून शाळेचा परिसर नशामुक्त व तंबाखूमुक्त असावा या उद्देशाने अभियान राबवण्यात आले. विद्यार्थ्यांना अकोट ग्रामीण पोलिसांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे दिले. अभियानाबाबतीत येथील शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांसह विविध व्यसनांचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व, तसेच दारू, गुटखा या सारखे अनेक…

Read More

तनपुरे कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी 478 कोटींचा प्रस्ताव:अत्याधुनिक मशिनरी बसवून गाळप क्षमता वाढवण्याचा अध्यक्ष अरुण तनपुरे यांचा निर्धार‎

एकेकाळी आशिया खंडात नावाजलेला डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कारखाना प्रशासनाने राज्य सरकारकडे ४७८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्र . १९५३ साली मिळालेले मूळ प्रमाणपत्र तसेच आवश्यक कागदपत्रे गोळा करून ४७८ कोटींची प्रस्तावित निधीची फाईल राज्य सरकारकडे सादर केली आहे….

Read More

मास्टरमाइंड भावांनी मुलांमार्फत NEET चे पेपर विकले:एका मुलाने खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बनवली, 10 लाखांत सौदा

NEET पेपरफुटीचे सूत्रधार भाऊ मांगीलाल बिंवाल आणि दिनेश बिंवाल त्यांच्या मुलांमार्फत पेपर विकत होते. मांगीलाल, दिनेश आणि मांगीलालचा मुलगा विकास पोलिसांच्या ताब्यात आहेत. कुटुंबाचा दावा आहे की दिनेशचा अल्पवयीन मुलगाही ताब्यात आहे. दोघांचेही मुलगे सीकरमधील एका खाजगी कोचिंगमध्ये NEET ची तयारी करत होते. त्यांच्याकडे 27 एप्रिल रोजीच पेपर पोहोचला होता. पेपर पुढे विकण्यासाठी दोघांनी शेकडो…

Read More

सम्राटला मुख्यमंत्री करणे ही नीतीश कुमार यांची चूक आहे का?:उपेंद्र कुशवाह असे का म्हणाले; NDA मध्ये सर्व काही ठीकठाक नाही का?

पहिली 2 विधाने… एका मुलाखतीत कुशवाहा यांनी नितीश कुमार यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल प्रश्न उपस्थित करून एनडीएच्या आत सुरू असलेली अंतर्गत ओढाताण, भविष्यातील रणनीती आणि जातीय नेतृत्वाची लढाई उघड केली आहे. कुशवाहा यांच्या विधानाचा अर्थ काय आहे, ते सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाल्याने अस्वस्थ का आहेत. ते असे का म्हणत आहेत, जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनर ‘बुझे की नाही’…

Read More

बिल मंजुरीसाठी कमिशनखोरीचा भंडाफोड:6 टक्क्यांच्या ‘कट’चा खेळ उघड! बदलापूर नगर परिषदेत ACB ची कारवाई

बदलापूरमध्ये नगर परिषदेतील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील लेखाधिकारी विकास वैजीनाथ चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. कामाच्या बिलांसाठी आणि सुरक्षा ठेवीच्या रकमेवर 6 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची…

Read More

आजपासून एसटीची स्वच्छतागृहे मोफत:बसस्थानके चकाचक आणि प्रवासही होणार सुखकर; 78 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मोहीम

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या 78व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज, 1 जूनपासून विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात येत असून, त्याअंतर्गत यंदा 78 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. तसेच प्रवाशांना एसटीच्या सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार आहे. मात्र या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने आधीच, म्हणजेच 15 एप्रिलपासून प्रवाशांच्या प्रत्येक तिकिटावर दोन रुपयांचा अधिभार लागू केलेला आहे….

Read More

'काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलतं…':सुप्रिया सुळेंची साडी ठरतेय चर्चेचा विषय, छत्रपती संभाजीनगरच्या विणकराचे मानले आभार

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावनिक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. 20 जून रोजी त्यांची कन्या रेवती आणि नागपूरचे उद्योजक सारंग लखानी यांचा विवाहसोहळा पार पडला. या विशेष प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी परिधान केलेल्या पैठणी साडीला एक अनोखा भावनिक इतिहास लाभला आहे. कारण तब्बल 35 वर्षांपूर्वी, म्हणजेच 4 मार्च…

Read More

तरुणांच्या पुढाकाराने साठ वर्षांनंतर लक्ष्मीमातेचा यात्रोत्सव उत्साहात:हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ‎

सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरालगत असलेल्या बोजगाव येथे सुमारे साठ वर्षांपासून खंडित झालेली लक्ष्मी मातेची पारंपरिक यात्रा यंदा गावातील तरुणांच्या पुढाकारातून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू करण्यात आली. या ऐतिहासिक पुनरुज्जीवनामुळे गा . सामाजिक एकात्मता अधिक दृढ या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील एकजूट आणि सामूहिक सहभाग. जात, धर्म, वय या सर्व भेदांपलीकडे जाऊन ग्रामस्थांनी…

Read More

शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा:जमिनीच्या कौटुंबिक वाटणीची मोजणी आता अवघ्या 200 रुपयांत, शासनाचे नवे धोरण जाहीर

राज्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने जमीन मोजणीच्या प्रक्रियेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे, आता कुटुंबातील जमिनीच्या वाटणीची मोजणी प्रति पोटहिस्सा अवघ्या 200 रुपयांत केली जाणार आहे. जमीन मोजणीच्या प्रक्रियेतील विलंब आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या…

Read More

मुंबई-बंगळुरू आता अवघ्या साडेपाच तासांत:गडकरींच्या घोषणेमुळे महाराष्ट्राला मोठा फायदा; पुणे ते संभाजीनगर मार्गालाही मंजुरी

मुंबई ते बंगळुरू हा प्रवास आता अवघ्या साडेपाच तासांत पूर्ण करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी नव्या महामार्गाबाबत घोषणा केली. या मार्गाच्या पहिल्या टप्प्याची निविदा काढण्यात…

Read More