Headlines

कर्जमाफी यादीत घोळ:पात्र शेतकरी वंचित, कर्ज आणि माफ रकमेत मोठी तफावत; तिवसातील शेतकऱ्यांमध्ये रोष, मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे समोर आले आहे. एकट्या तिवसा तालुक्यातील अनेक पात्र शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत, तर ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांच्या कर्जाच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी तिवसा तहसीलदारांमार्फत…

Read More

बालिकेच्या मृत्यू प्रकरणात ग्रामसेवक निलंबित:असमाधानकारक खुलास्यानंतर आणखी दोघांवर कारवाईची शक्यता

चिखलदरा तालुक्यातील कोरडा ग्रामपंचायत अंतर्गत हनुमानढाणा गावात एका बालिकेचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ग्रामपंचायत अधिकारी विनायक मालसिंग धुर्वे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी घडली होती. धुर्वे यांच्यावर कामात हयगय, प्रचंड निष्काळजीपणा आणि वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप आहे. चिखलदरा येथील गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे….

Read More

Maharashtra Weather Update; Orange Alert for Ghats & Yellow for Districts

राज्यात पावसाचा जोर अद्यापही असमान स्वरूपाचा कायम असून, पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट तर राज्यात . १ ऑगस्ट रोजी पुणे घाट, कोल्हापूर घाट आणि सातारा घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर ठाणे,…

Read More

बडनेरा मतदारसंघात 47,890 मतदारांचे पत्ते गायब:नावे वगळण्याची भीती, निवडणूक आयोगासमोर मोठा पेच

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बडनेरा विधानसभा मतदारसंघात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात तब्बल ४७,८९० मतदारांचे पत्ते गायब झाले आहेत. आयोगाने निश्चित केलेली मुदत संपायला अवघे सात दिवस उरले असल्याने, या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक…

Read More

तसलीमा नसरीन यांच्या कार्यक्रमात गोंधळ:कवी जॉय गोस्वामी यांना रंगमंचावर बोलावल्याने लोक संतापले, भाषण काही काळासाठी थांबले

कोलकातामध्ये शनिवारी एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान गोंधळ निर्माण झाला, जेव्हा निर्वासित बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांनी मंचावर प्रसिद्ध बंगाली कवी जॉय गोस्वामी यांना बोलावले. या घटनेमुळे तसलीमांचे भाषण काही काळ थांबले. हा कार्यक्रम तसलीमांच्या सुमारे दोन दशकांनंतर कोलकाता येथे परत येण्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. जॉय गोस्वामी यांची माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी असलेली जवळीक प्रेक्षकांच्या…

Read More

पूरग्रस्त 16 जणांचे वाचले प्राण:जिल्हा बचाव पथकाने एकाच रात्री दोन आव्हानांवर केली मात

अमरावती जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा येथे आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या १६ जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाने एकाच रात्री सुरक्षित बाहेर काढले. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पथकाने धाडसी बचावकार्य करत अनेकांचे प्राण वाचवले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे बेंबळा नदीला आलेल्या पुरामुळे ९ जण छतावर अडकले होते. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रात्री ११ च्या सुमारास अचानक वाढले…

Read More

विभागीय आयुक्तांकडून 22 महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार:संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन

महसूल दिनानिमित्त विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन केले. महसूल विभाग हा शासनाचा कणा आणि मुख्य चेहरा आहे. सामान्य जनता शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल प्रशासनाकडे पाहते. त्यामुळे या विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या वर्तनात शिस्त, संवेदनशीलता आणि सहानुभूती आणून…

Read More

CBI Files FIR Against Anil Ambani; Reliance Capital EPFO Fraud Case

39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CBI ने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड आणि त्याचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे. कंपनीवर EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला 1816.22 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी शनिवार, 1 ऑगस्ट रोजी ही माहिती दिली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 21 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे…

Read More

अमरावतीत माजी सैनिकांच्या समस्यांवर ऑनलाईन तोडगा:कर्नल नवनीत दुग्गल यांच्या 'ऑन स्पॉट' ऑर्डरने प्रश्न मार्गी

नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया हेडक्वार्टरमधून कर्नल (वेटरन्स) नवनीत दुग्गल यांनी शनिवारी अमरावतीला भेट दिली. माजी सैनिकांच्या सैन्य प्रशासनाशी संबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश होता. त्यांनी उपस्थितांच्या समस्या समजून घेत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क साधून तात्काळ ‘ऑन स्पॉट’ आदेश दिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे अनेक…

Read More

सुवेंदू म्हणाले- CAA चे अर्ज 6 महिन्यांत निकाली काढले जातील:कोणाचीही नागरिकत्व रद्द होणार नाही; आज 300 लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र दिले

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी घोषणा केली की, राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अंतर्गत सर्व प्रलंबित अर्जांचा निपटारा पुढील 6 महिन्यांत होईल. ते म्हणाले की, हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी बनवला आहे, कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. न्यू टाऊन येथे आयोजित सीएए प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात सुवेंदू यांनी उत्तर 24 परगणा येथील मतुआ समुदायाच्या सुमारे…

Read More