जीर्ण इमारत अन् सुरक्षेचाच खोळंबा; जामखेडचे कारागृह कायमस्वरूपी बंद:62 कैद्यांना नाशिक जेलमध्ये हलवले; कारागृहाबाहेर नातेवाईकांची गर्दी
इमारतींची अत्यंत जीर्ण झालेली अवस्था, सुरक्षेचे गंभीर प्रश्न आणि राज्यातील इतर कारागृहांतून कैदी पळून जाण्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत राज्य शासनाने अखेर जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार गुरुवारी, ९ जुलै रोजी जामखेडमधील सर्व ६२ आरोपींना कडेकोट पोलिस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात (सेंट्रल जेल) स्थलांतरित करण्यात आले….