उन्हाळ्यात 220 आगीच्या घटना; शहरात केवळ 4 अग्निशमन केंद्र:इमारती 16 माळ्यांच्या, शिडी चार ते पाच माळ्यांपर्यंत पोहोचेल इतकीच
शहराची लोकसंख्या, इमारती, घरे, दुकाने, बाजारांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सध्या तर सूर्य आग ओकत असल्याने शहर जणू आगीच्या उंबरठ्यावरच उभे आहे की, काय असे वाटत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात २०० हून अधिक लहान, मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच शहरात बहुमजली इमारतींचीही संख्या वाढत आहे. अशात महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडे…