Headlines

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचा उमेदवार ठरला:झिशान सिद्दिकींच्या नावावर शिक्कामोर्तब, देवगिरीवरील मॅरेथॉन बैठकीनंतर निर्णय

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एकमेव जागेचा पेच अखेर सुटला आहे. पक्षाचे तरुण नेते आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आला आहे. काल रात्री उशिरापर्यंत चाललेली कोअर कमिटीची बैठक आणि त्यानंतर झालेली वरिष्ठ नेत्यांची चर्चा यानंतर झिशान सिद्दिकींच्या नावावर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर…

Read More

बीडमध्ये शाही लग्नातील बडेजाव बेतला जिवावर:फटाक्यांच्या आतिषबाजीत 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी, इव्हेंट‎ कंत्राटदारांवर कारवाई करा- भाजप

विवाह सोहळ्यांमध्ये श्रीमंतीचे प्रदर्शन आणि बडेजाव करण्याच्या नादात साध्या सुरक्षेच्या नियमांनाही पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. एका शाही विवाह सोहळ्यात झालेल्या प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका फोटोग्राफरचा अवघ्या तीन दिवसांवर विवाह होता. मिळालेल्या माहितीनुसार लग्न समारंभ, वाढदिवस आणि‎ विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हौस ‎‎म्हणून…

Read More

ई-पीक पाहणी, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार:7/12 वरील पीक नोंदींसाठी शासनाचे निर्बंध

ई-पीक पाहणी (डीसीएस- डिजिटल क्रॉप सर्व्हे) प्रकल्पाच्या अंमलबजावणीत होणारी दिरंगाई आणि तांत्रिक गोंधळ संपवण्यासाठी महसूल व वन विभागाने नवीन शासन परिपत्रक काढून सर्वच विभागांचे कान उपटले आहेत. आता केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही तर जिल्हाधिकाऱ्यांपासून ते गावपातळीवरील सहायकांपर्यंत प्रत्येकाला मैदानात उतरून १००% अचूक नोंदणी करावी लागणार आहे. पीक पाहणीची संपूर्ण पद्धतच बदलली असून कृषी…

Read More

रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे….

Read More

ओरी म्हणाला- 24 तास कंगना रनोटसोबत राहू शकतो:खतरों के खिलाडी १५ मध्ये दिसणार, म्हणाला- प्रेरणा नाही, फक्त कृतीवर विश्वास ठेवतो

सोशल मीडिया सेन्सेशन ओरहान अवात्रामणि उर्फ ओरी आता स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये दिसणार आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे, मजेदार उत्तरांमुळे आणि व्हायरल व्यक्तिमत्त्वामुळे प्रसिद्ध असलेल्या ओरीने दैनिक भास्करशी खास बातचीत करताना शो, भीती, प्रेरणा, सोशल मीडियावरील प्रतिमा आणि स्वतःच्या वैयक्तिक विचारांबद्दल मनमोकळेपणाने बोलले. या संवादादरम्यान ओरीने सांगितले की त्याला पाणी किंवा धोकादायक…

Read More

आशा भोसलेंनी निधनाच्या एक दिवस आधी नाटक पाहिले:लोकांना फटकारत कला जिवंत ठेवण्याबद्दल बोलल्या होत्या

गायिका आशा भोसले त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधी मुंबईत तीन तासांचे मराठी नाटक पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्या रंगमंचावरही गेल्या आणि नाटक पाहण्यासाठी आलेल्या लोकांना फटकारत कला जिवंत ठेवण्याबद्दल बोलल्या होत्या. ही गोष्ट आशा भोसले यांचे नातू चिंटू भोसले यांनी स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितली. आशा भोसले यांचे 12 एप्रिल रोजी 92 व्या वर्षी निधन झाले…

Read More

नागपुरात कॅफेच्या आड हुक्का पार्लरवर मध्यरात्री धाड:‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत मानवनगर परिसरातील ‘नेटफ्लिक्स अँड चिल कॅफे’वर मध्यरात्री धाड टाकून हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 82,995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 19 ग्राहकांवर कारवाई केली आहे. 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री रंगला पंजाब रेस्टॉरंटजवळील या कॅफेवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी सोहेल खान फिरोज खान (22) याच्यासह कर्मचारी आणि…

Read More

ताबा प्रकरणात ‘मुलांची इच्छा दुर्लक्षित नको’:“मुलाची वा मुलीची इच्छा आणि त्याचे सर्वांगीण कल्याण” हेच अंतिम निकष असावेत – हायकोर्ट

अल्पवयीन मुलांच्या ताब्याच्या प्रकरणांत “मुलाची वा मुलीची इच्छा आणि त्याचे सर्वांगीण कल्याण” हेच अंतिम निकष असले पाहिजेत, असे महत्त्वपूर्ण निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले. सत्र न्यायालयाने वडिलांची बाजू ऐकून न घेताच १० वर्षांच्या मुलीचा ताबा आईकडे देण्याच्या आदेशावर उच्च न्यायालयाने स्थगिती देत प्रकरण पुनर्विचारासाठी परत पाठवले आहे. न्यायमूर्ती…

Read More

टॉप-10 कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मूल्य ₹1 लाख कोटींनी घटले:SBI टॉप लूजर, मूल्य 44 हजार कोटींनी घटले; एअरटेल-टीसीएसचे मार्केट कॅपही घटले

मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यातील व्यवहारात 1 लाख कोटी रुपयांनी घटले. या काळात SBI चे मार्केट मूल्य सर्वाधिक घटले आहे. SBI चे मार्केट मूल्य ₹44,722 कोटींनी घटून ₹9.41 लाख कोटींवर आले. याशिवाय एअरटेल, TCS आणि लार्सन अँड टुब्रोचे मार्केट मूल्यही घटले आहे. तर रिलायन्स, HDFC बँक, ICICI…

Read More

वरिष्ठ सभागृहात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणार:आमदार विवेक कोल्हे; भव्य नागरी सत्काराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी | कोपरगाव शेतमालाला योग्य दर आणि बाजारभाव मिळाला पाहिजे, हीच आमची मुख्य भूमिका आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठ सभागृहात शेतकरी हितासाठी सरकारकडे आग्रही राहणारा आणि युवकांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मी काम करणार आहे. तुमच्या न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणारा तुमच्या घरातील व्यक्तीच आता विधान परिषदेमध्ये गेला आहे, असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले….

Read More