Headlines

अजिंठा लेणीच्या पायथ्याशी दुकानदारी:व्यापारी आक्रमक, 2002 मध्ये स्थलांतरित झालेले व्यापारी संतप्त

जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पुन्हा एकदा व्यावसायिक दुकाने सुरू करण्याचा घाट भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घातला आहे. लेणीच्या पायथ्याशी सुव्हेनिअर (स्मृतिचिन्ह) शॉप सुरू करण्याच्या या प्रस्तावाला अजिंठा लेणी हस्तकला व्यवसाय व परिसर विकास असोसिएशनने आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, ज्या जागेवर हे शॉप सुरू केले जाणार आहे ती जागा…

Read More

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी राज्यसभेत नोटीस:73 खासदारांच्या स्वाक्षऱ्या, मार्चमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये फेटाळला गेला प्रस्ताव

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी शुक्रवारी राज्यसभेत नोटीस दिली. यावर 73 खासदारांच्या सह्या आहेत. CEC यांच्या विरोधात नवीन आरोपांमध्ये निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू करण्यात सतत पक्षपाती भूमिका घेणे आणि 18 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणाविरोधातील तक्रारींवर कारवाई न करणे याचाही समावेश आहे. वृत्तसंस्था…

Read More

काँग्रेसच्या बंडखोर गटाला बघेल यांचा धक्का:म्हणाले- पंजाबमध्ये एकच चेहरा असेल, राहुल गांधींचा; चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याची मागणी फेटाळली

काँग्रेस प्रभारी भूपेश बघेल यांनी पंजाबमधून परत येताच बंडखोर गटाला स्पष्ट उत्तर दिले आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्री चेहरा बनवण्याची मागणी त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. बघेल यांनी सोशल मीडिया (X) वर स्पष्ट लिहिले की, पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाचा एकच चेहरा आहे, तो म्हणजे राहुल गांधी. काँग्रेसच्या बंडखोर गटासाठी हा मोठा धक्का आहे. यापूर्वी…

Read More

दीड लाखांचे ६९० पोते जिप्सम खत पकडले:राजस्थानमधून थेट कळमनुरीच्या मसोड येथे आला होता ट्रक, कृषी विभागाची सतर्कता

कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे जिप्सम खताचे पोते घेऊन आलेला राजस्थानातील ट्रक कृषी विभागाच्या पथकाने शनिवारी ता. १६ पकडला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात जिप्समचे ६९० पोते आढळून आली असून त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण…

Read More

जांबमध्ये लोकसहभागातून 10 हजार वृक्षलागवडीचा संकल्प:शाश्वत पाण्यासाठी आळाचीवाडी पुरंदर, सातारा, चंद्रपूर, गावांच्या अभ्यासातून करणार जलसंधारणाची कामे‎

जिल्ह्यातील जांब गावाला हरित करण्यासह पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी अमोल घायवट यांच्या पुढाकारातून पावसाळ्यात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. गत तीन वर्षात अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करणाऱ्या अमोल घायवट यांनी . गतवर्षी त्यांच्या माध्यमातून अकोट तालुक्यात ४९ गावे आणि ६७ शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, अनेक ठिकाणी योग्य संगोपन…

Read More

Vasant Bhase Opposes PMRDA Plan; Demands Filling 23 MPC Vacancies

पुणे महानगर नियोजन समितीचे (एमपीसी) सदस्य वसंत भसे यांनी पीएमआरडीएच्या (PMRDA) स्ट्रक्चरल प्लॅनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला आणि नंतर रद्द केलेला प्रारूप विकास आराखड्यातील चुका दुरुस्त करणे अधिक सोपे आणि कमी खर . यावेळी भसे यांनी एमपीसीमधील 23 रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या…

Read More

‘महारेल’कडे ‘आरओबी’चे काम दिल्यास पुनर्बांधणीत विलंबाची शंका:पावसाळी अधिवेशनात आ. संजय खोडके यांनी उपस्थित केला मुद्दा‎

शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या (आरओबी) पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कडे हस्तांतरित केल्यास सर्व तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया नव्याने कराव्या लागतील. त्यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब होऊन काम रखडण्याची शक्यता असल्याचा मुद्दा विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. मागील दहा महिन्यांपासून धोकादायक ठरलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून सर्व प्रकारची वाहतूक…

Read More

राज्यातील 4 अधिकाऱ्यांच्या बदल्या:जी. श्रीकांत 15 दिवसांतच पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये, विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणार

राज्य प्रशासनामध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदली केल्यानंतर आज (१६ एप्रिल) पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ४ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महसूल, सिडको आणि जीएसटी विभागातील प्रशासकीय…

Read More

ठाणगाव परिसरामध्ये कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल:भाजपच्या वतीने‎ महावितरणला निवेदन‎

ठाणगाव आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडिंग आणि कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या (महावितरण) सिन्नर विभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. ठाणगाव परिसरात वीज पुरवठा वारंवार…

Read More

सातबारा दुरुस्तीपासून ते शेतरस्त्यांपर्यंत:महसूल शिबिरातून बळीराजाला दिलासा, राहात्यात समाधान‎ शिबिराद्वारे विविध ‎दाखल्यांचे वितरण‎

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा क्रमांक- १ अंतर्गत महसूल विभागाच्या राहाता मंडलाच्यावतीने विविध विभागीय शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रांत अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार अमोल मोरे यांच्या उपस्थितीत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. साई विठ्ठला लॉन्समध्ये शिबीर आयोजित केले होते. यावेळी मुख्याधिकारी वैभव लोंढे, उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, नायब तहसीलदार बाळासाहेब…

Read More