Headlines

सेन्सेक्स 2600 अंकांनी वाढून 77,200 वर:निफ्टीही 750 अंकांवर; ऑटो, रिॲल्टी आणि बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

अमेरिका आणि इराण यांच्यात 2 आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर आज म्हणजेच बुधवार, 8 एप्रिल रोजी शेअर बाजारात तेजी आहे. सेन्सेक्स 2600 अंकांनी (3.50%) वाढून 77,200 वर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 750 अंकांनी (3.24%) वर आहे, तो 23,900 वर पोहोचला आहे. आज आयटी, मेटल आणि रिअल्टी शेअर्समध्ये जास्त खरेदी आहे. आशियाई बाजारातही तेजी अमेरिकन बाजारात 7…

Read More

लग्नात डिजेवर नृत्य केल्याच्या रागातून पत्नीची गळा चिरून हत्या:हत्येनंतर झाडाला गळफास घेत पतीचीही आत्महत्या, बोरगडी तांड्यात खळबळ

मेव्हण्याच्या लग्नात डिजेवर नृत्य केल्याच्या रागातून पत्नीची गळा चिरून हत्या केली व गावाच्या शिवारात झाडाला गळफास घेऊन पतीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा गावात घडली. दोघांच्या मृत्यूमुळे त्यांची तीन लेकरं पोरकी झाली आहेत. हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा नंबर 1 येथे चुलत भावाच्या लग्नाच्या निमित्ताने पायल विनोद राठोड (35), पती विनोद रंगराव…

Read More

साखर कारखान्यांना कर्ज नाकारल्याने राजकारणात खळबळ:पक्षांतरांचं गणित बिघडलं, कोणाला फटका तर कोणाला फायदा?

महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्यातील सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले आहे. राज्य सरकारकडून एकूण 14 कारखान्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते, मात्र त्यापैकी केवळ सात प्रस्तावांना मंजुरी मिळाली. उर्वरित सात प्रस्ताव फेटाळल्यामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील तीन कारखान्यांना…

Read More

आखाती देशांत नाशिकमधून 1100 बाेकडांची निर्यात:युद्धामुळे थंडावलेली निर्यात बकरी ईदमुळे पुन्हा सुरू

ओझर विमानतळावरून शारजाहसह इतर आखाती देशांमध्ये जिवंत बोकड आणि मेंढ्यांच्या निर्यातीला येऊ घातलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गती मिळाली आहे. इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम आखाती देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीवरही झाला होता. यामुळे दोन महिने निर्यात थंडावली होती. मात्र, याच आठवड्यात 1100 बोकड कार्गो विमानाद्वारे निर्यात झाले आहेत. नाशिकचा कांदा, द्राक्ष, डाळिंब, फुलांनंतर आता येथील बोकडांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, विशेषत:…

Read More

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी नवा फॉर्म्युला समोर:मराठी सक्तीवर सरकारचा यू-टर्न की दिलासा? चालकांना 6 महिन्यांची मुदत

मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1 मेपासून हा निर्णय लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयावरून महायुती सरकारमध्येच मतभेद उघड झाले असून, काही नेत्यांनी याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सरकारकडून या निर्णयाचा फेरविचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. परिवहन मंत्री…

Read More

महालक्ष्मी सरस 2026 ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद:एकाच दिवसात 6 कोटींची विक्रमी उलाढाल, आतापर्यंत 32 कोटींची उलाढाल

उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, खाद्यपरंपरा, हस्तकला आणि महिला उद्योजकतेचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत आहे. ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना…

Read More

अहिल्यानगर जिल्हा आता कबड्डीची पंढरी- कीर्तीकर:अहिल्यानगरच्या खेळाडूंचे कौतुक; राज्यस्तरीय विजेत्यांचा सत्कार, आता "टीम इंडिया''चे वेध‎

गेल्या पाच वर्षांत अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघाने राज्यात अव्वल स्थान पटकावले असून, येथील खेळाडू आता राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवत आहेत. नगर जिल्हा आता खऱ्या अर्थाने ‘कबड्डीची पंढरी’ बनला आहे, असे गौरवद्गार महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष व माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी काढले. अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पुरुष, कुमार व कुमारी गटातील…

Read More

मनमाडला गुणवंतांमध्ये मुलींनी राखले वर्चस्व:केंद्राचा निकाल 90 तर शहरातील सहा विद्यालयांचा निकाल 100 टक्के; पूजा कुशवाह केंद्रात प्रथम‎

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाईन जाहीर झाला असून मनमाड केंद्राचा एकूण निकाल ९० टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनी उल्लेखनीय यश मिळवत गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये बाजी मारली . सेंट झेवियर्स हायस्कूलमधील पूजा मुकुंद कुशवाह हिने ९६.२० टक्के गुण मिळवत केंद्रात अव्वल स्थान पटकावले. के. आर. टी….

Read More

जी. श्रीकांत यांनी स्वीकारला छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तपदाचा पदभार:म्हणाले- मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करू

जी. श्रीकांत यांनी आज छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी मावळते विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून सूत्रे घेतली. पापळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त दादासाहेब…

Read More

साउथ अभिनेता जीवा यांच्या वडिलांचा रस्ते अपघातात मृत्यू:पालीचे रहिवासी आरबी चौधरी यांनी ९८ चित्रपट बनवले होते, ब्यावर-पिंडवाडा रस्त्यावर कारची धडक

ब्यावर जिल्ह्यात एका रस्ते अपघातात साऊथ चित्रपटांचे निर्माते आणि अभिनेते जीवा यांचे वडील रतनलाल भगतराम चौधरी (७६) यांचा मृत्यू झाला. महामार्गावर गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओ अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या सेफ्टी डिवाइडरला धडकली. अपघात इतका गंभीर होता की आर.बी. चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळाल्यावर, एनएचएआय (NHAI) च्या रुग्णवाहिकेतून त्यांना रायपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात…

Read More