Headlines

मुंबईचे भूखंड लुटले जातायत अन् लोढांना केवळ जैन-मारवाड्यांची चिंता!:बाहेरच्या 'भैय्यांच्या' धमक्यांना भीक घालणार नाही; मुंबई बंद करून दाखवाच- संदीप देशपांडे

मुंबई मनपातील भूखंड लाटण्याचा प्रयत्न बाहेरील लोकं करत आहेत. नर्सिंग कॉलेजचा मोठा भूखंड जेएसडब्ल्यूला देण्यात येत आहे. एक भूखंड जैन इंटरनॅशनलला देण्यात येत आहे. महानगरपालिकेचे भूखंड लुटून खाण्याचे काम लोकं करत आहे, सत्तेमध्ये बसलेले लोकं मनपाचा खजिना लुटवत आहे, असे म्हणत मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की,…

Read More

5500 लोकांतून कसे निवडणार राम मंदिर CEO?:मुलाखत-निवडीला लागतील 40 दिवस; अनुभवासह धार्मिक असणेही आवश्यक

अयोध्येतील राम मंदिराची व्यवस्था २८ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधननंतर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. देशभरातून ५५०० लोकांनी सीईओ पदासाठी ऑनलाइन अर्ज पाठवले आहेत. निवड समिती योग्य व्यक्तीच्या शोधात वेगाने काम करत आहे. निवड कशी केली जात आहे? याचे उत्तर समितीशी संबंधित एक सदस्य देतात – आम्ही केवळ अर्जदाराच्या अनुभवाला आधार बनवत नाही. त्या व्यक्तीची रामावर किती…

Read More

वसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे हळदीच्या कारखान्यात पाणी टाकण्यासाठी विद्युतपंपला पाईप लावतांना विजेचा धक्का बसल्याने बिहार राज्यातील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 अकस्मात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजनगाव शिवारात असलेल्या हळदीवर प्रक्रिया करून पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर बिहार राज्यातील मजूर कामावर आहेत….

Read More

सुप्रीम कोर्ट म्हणाले- सीएम तपासात हस्तक्षेप करतील असे वाटले नव्हते:त्या लोकशाहीला धोका पोहोचवू शकत नाहीत; ममता IPAC छाप्यांदरम्यान पोहोचल्या होत्या

I-PAC रेड प्रकरणी ईडीच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या चौकशीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या हस्तक्षेपालाही चुकीचे ठरवले. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री असे करतो, तेव्हा ते लोकशाहीला धोक्यात आणते. न्यायमूर्ती कुमार म्हणाले – हा राज्य आणि केंद्रातील वाद नाही. आम्हाला कधी वाटले नव्हते की या देशात असाही दिवस…

Read More

मिरा-भाईंदर हादरलं! गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी भीषण आग:3 ठार, 50 झोपड्या खाक; बेकायदेशीर सिलिंडरचा साठा उघड

मिरा-भाईंदर परिसरातील भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मधील झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. सुमारे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आग पसरत गेली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीदरम्यान एकामागोमाग तीन गॅस सिलिंडरचे जोरदार स्फोट झाले. या स्फोटांमुळे आगीची तीव्रता वाढत गेली आणि अवघ्या…

Read More

आळेफाटा परिसरातून गावरान जांभळाची झाडे झाली गायब:झाडांचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून पडला

आळेफाटा | उन्हाळा सुरू झाला की गावोगावी रस्त्यांच्या कडेला आणि शिवारात काळ्याभोर गावरान जांभळांनी लगडलेली झाडे अन् त्याखाली शाळकरी मुलांची होणारी गर्दी… हे सुखावणारं चित्र आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. नागरीकरण, शेतीचा विस्तार आणि रस्ते रुंदीकरणात झालेली बेसुमार वृक्षतोड यांमुळे आळेफाटा परिसरातून जांभळाची जुनी झाडे झपाट्याने नष्ट झाली आहेत. नव्या लागवडीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आता गावरान…

Read More

पुणे महापालिका भरती घोटाळा:बनावट नियुक्तीपत्रांनी 45 लाखांची फसवणूक, जेजुरी देवस्थान विश्वस्तासह इतरांवर गुन्हा दाखल

पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रांच्या आधारे तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र बबन खेडेकर यांच्यासह महानगरपालिकेचे शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बसनोडे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शलाका विनायक ढोणे…

Read More

E20–पेट्रोलमुळे खराब झालेली कार 16 महिन्यांपासून शोरूममध्ये उभी:30,000 ची EMI भरणारे डॉक्टर म्हणाले- न्यायालयात लढाई सुरूच राहील

रायपूरमध्ये मारुती सुझुकी ग्रँड विटारा स्ट्रॉंग हायब्रीड कारमध्ये E20 पेट्रोल टाकल्यानंतर इंजिन खराब झाल्याचा प्रकार देशभरात चर्चेत आहे. ग्राहक आयोगाने कंपनीला 20.50 लाख रुपये परत करण्याचे किंवा नवीन कार देण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर दिव्य मराठीने तक्रारदार आणि किडनी रोग विशेषज्ञ डॉ. प्रेमराज देबता यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, “टाकीतून दह्यासारखी पांढरी जेली बाहेर आली….

Read More

‘जूते दो, पैसे लो’च्या मस्करीत खंजिराचे वार:चौघांनी वधूकडील दोघांना भोसकले; हिंगोलीच्या कळमकोंडात बूट लपवल्याच्या घटनेचा राग, लग्न मोडता मोडता वाचले

हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे एका विवाह सोहळ्यात बूट लपवल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. नवरदेवाकडील वऱ्हाडींनी चक्क खंजीर काढून वधूकडील दोघांवर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी वसमत तालुक्यातील गिरगाव येथून नवरदेवाकडील मंडळी आली होती. लग्न लागण्यापूर्वी बूट लपवल्यामुळे दोन्ही गटांत शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र लग्न लागल्यानंतर हा…

Read More

पेट्रोलच्या निर्यातीवर ₹3 प्रति लिटर कर लावला:डिझेल आणि एटीएफवरील शुल्क कमी केले, देशातील टंचाई रोखण्यासाठी घेतला निर्णय

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ₹3 प्रति लिटरपर्यंत वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने तेल कंपन्यांसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवर ₹3 प्रति लिटर विंडफॉल टॅक्स लावला आहे. डिझेल आणि जेट इंधनावरील कर कमी केला आहे. अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. भारतात तेलाची…

Read More