Headlines

गृहनिर्माण संकुलांतील सांडपाणी, कचरा ऑडिट; दोषींवर कारवाई:प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची घोषणा, नियमांचे पालन आवश्यक

राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलांमधील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा (STP) आणि कचरा विलगीकरणाचे ऑडिट केले जाणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. सिद्धेश कदम हे ‘प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया’ आणि ‘भारत रिसायकलिंग शो’ यांच्या वतीने आयोजित ‘रिसायकलिंग व्हिजन सिरीज २०२६’ परिषदेसाठी…

Read More

लता-आशा यांना वाद्य वादनातून 'स्वरांजली':गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वरांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १५ हून अधिक वाद्यांद्वारे २५ कलाकार विविध गीते सादर करतील. या तीन दिवसीय सोहळ्यात मराठी-हिंदी चित्रपट गीतांबरोबरच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत आणि गझल ऐकायला मिळतील. सुगम संगीत क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल रमाकांत…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावाच्या दौऱ्यावर:नेमके कारण काय? जिल्हा परिषदेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला राजकीय रंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तीन दिवसांचा सातारा दौरा सुरु झाला असून त्यांच्या दरेगाव भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दौरा अधिकृतपेक्षा खाजगी असल्याचे सांगितले जात असले तरी, अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय नजरेने पाहिले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत मोठे राजकीय नाट्य रंगले होते. या…

Read More

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संतापजनक प्रकार:दर्शन मंडपात सापडल्या दारूच्या बाटल्या आणि सिगारेट; संबंधितांवर कारवाईची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आणि गुटखा-मावाच्या पुड्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी उघडकीस आणली आहे. यामुळे धार्मिक स्थळी अशा वस्तू आढळून आल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे….

Read More

कालव्यातून पाईप ओढताना पाय दोरीत अडकला:तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील घटना

वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात कालव्यातून पाईप नेतांना हात अन पाय दोरीत अडकल्याने तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात बाभणाजी वाघमारे (38) यांचे शेत…

Read More

राहुल म्हणाले- पीएम प्रश्नांपासून पळताना दिसले:जर लपवण्यासारखं काही नाही, तर भीती कशाला; मोदींनी नॉर्वेमध्ये पत्रकाराला उत्तर दिले नव्हते

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या नॉर्वे येथील पत्रकार परिषदेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेत्याने X वर लिहिले, “जेव्हा जग एका ‘कॉम्प्रोमाइज’ पंतप्रधानांना काही प्रश्नांना घाबरून पळताना पाहते, तेव्हा भारताच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो? जेव्हा लपवण्यासाठी काहीच नसते, तेव्हा घाबरण्याचेही काही कारण नसते.” राहुल गांधींनी नॉर्वेच्या महिला पत्रकार हेली लिंग यांची X पोस्ट शेअर करत हे…

Read More

शिवयोग मंदिर व कोप्पळमधून तावून‎सुलाखून निघालेले महास्वामीजी सोने‎:अणदूरमध्ये पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त शिवकथा कार्यक्रमात आशीर्वचन‎

प्रतिनिधी | अणदूर येथील मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अणदूर सदभक्तांच्या इच्छेनुसार व रंभापुरी जगदगुरूंच्या आज्ञेने येथील श्री निलकंठेश्वर मठाचे मठाधिपती झाले. गेल्या २५ वर्षांत त्यांनी धार्मिक, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहेच. मात्र आज हजारो उपस्थित सद्भक्त ही त्यांची खरी संपत्ती आहे. शिवयोग मंदिर व…

Read More

अमिताभ बच्चन म्हणाले- रिकाम्या हाती आलो, तसेच जाणार:बिग बींनी आयुष्यातील ‘का’ आणि ‘कसे’ यावर चिंतन केले, स्वतःशी प्रश्नोत्तरे केली

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी नुकताच जीवन आणि त्याच्या अर्थाबद्दल एक नोट शेअर केली. त्यांनी सांगितले की, त्यांनी एक पूर्ण दिवस शांततेत राहून स्वतःशी प्रश्नोत्तरे करत घालवला. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, दिवसभर त्यांनी आपल्या आजूबाजूला आणि स्वतःसोबत वेळ घालवला, उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत. त्यांनी लिहिले की, जीवनातील…

Read More

आकाश अंबानी जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक बनले:5 वर्षांसाठी जबाबदारी मिळाली, मे-जूनपर्यंत कंपनीचा IPO येऊ शकतो

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल आर्म ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’ने आकाश अंबानी यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती कंपनीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (IPO) च्या अगदी आधी करण्यात आली आहे. नियामक फाइलिंगनुसार, आकाश अंबानी यांचा कार्यकाळ 9 एप्रिल 2026 पासून प्रभावी झाला आहे आणि ते पुढील 5 वर्षांसाठी या पदावर राहतील. मे महिन्याच्या अखेरीस किंवा…

Read More

विरोधकांनी प्रश्न विचारले की ती बदनामी?:मग जनतेने काय मरायचे का? ड्रग्जच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्जच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले आहे. “छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि संतांच्या संस्कारांचा थोर वारसा असलेला महाराष्ट्र कोणाच्या एका वक्तव्याने बदनाम होऊच शकत नाही. पण जेव्हा आम्ही ‘बदनामी’ शब्द वापरतो, तेव्हा ती राज्याच्या गौरवाबद्दल नसते, तर गल्लीबोळात पसरलेल्या ड्रग्जच्या भीषण…

Read More