Headlines

वीटभट्टीवरील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते:विभागीय आयुक्तांनी समस्या ऐकून उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अमरावती परिसरातील वीटभट्ट्यांवर आलेल्या आदिवासी आणि कोरकू मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय नियमांनुसार वीटभट्टीवरच शिक्षणाची सोय उपलब्ध असणे आवश्यक असताना, ती पुरेशी उपलब्ध नसल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुला-मुलींनी थेट विभागीय आयुक्त नयना गुंडे यांची भेट घेतली. अविनाश बेलसरे,…

Read More

साताऱ्यात NCERT विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) कडून मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ आज साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव, नागरिक, नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे धारकरी, मुस्लिम बांधव तसेच…

Read More

Exit Poll Result 2026 LIVE Update; West Bengal Tamil Nadu Kerala

Marathi News National Exit Poll Result 2026 LIVE Update; West Bengal Tamil Nadu Kerala | Assam Election BJP Congress TMC DMK Seats नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालसाठीच्या सहा एक्झिट पोल्सचे (मतदानोत्तर चाचण्यांचे) निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी पाच पोल्समध्ये भाजप सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर एका पोलमध्ये टीएमसीचे…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना 2 दिवस वर्क फ्रॉम होम:न्यायाधीश कार पूलिंग करून न्यायालयात जातील; मोदींच्या इंधन वाचवण्याच्या आवाहनावर निर्णय

पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कामकाजासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता न्यायालयाच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी दोन दिवस वर्क फ्रॉम होमवर असतील. सर्व न्यायाधीश कार पूल करतील. रजिस्ट्रीशी संबंधित 50 टक्के कर्मचारी देखील घरून काम करतील. सोमवार, शुक्रवार आणि मिसलेनियस डे (जे दिवस आधीपासून निश्चित नसतात) रोजी सूचीबद्ध प्रकरणांची सुनावणी केवळ…

Read More

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!:तूर आणि हरभरा खरेदीला केंद्राची मुदतवाढ, पणनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत आणखी 58 हजार 632 मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण…

Read More

सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड:चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा दैवी आवाज शांत झाला – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत आपल्या शोकभावना व्यक्त करत या दोन्ही नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या…

Read More

बंगाल CM सुवेंदु यांच्या पीएच्या हत्येप्रकरणी 3 संशयित ताब्यात:एसटीएफने यूपी-बिहारमधून पकडले; 6 मे रोजी चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली होती

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट (PA) चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर 5 दिवसांनी बिहारमधील बक्सर आणि यूपीमधील बलिया येथून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. बंगाल पोलिसांचे स्पेशल टास्क फोर्स (STF) तिघांनाही आपल्यासोबत कोलकाता येथे घेऊन गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगालमधून बिहारमध्ये पोहोचलेल्या STF च्या पथकाने बक्सरमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रविवारी रात्री…

Read More

दीपनगरला ‘चाइल्ड ओबेसिटी' विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

भारतीय युवक संस्था दिल्ली द्वारा आयोजित पाच दिवसीय मोटापा निवारण शिबिराचा चतुर्थ दिवस दीपनगर साताजीरा परिसरात उत्साहात पार पडला. या योग वर्गात एकूण ३३ साधकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटन प्रमुख वसंतराव शेजोळे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आहारतज्ज्ञ डॉ. अनघा संतोषजी नेवपूरकर उपस्थित होत्या. यावेळी राधा मंगल कार्यालय योग वर्गाचे विलास अहिरे, विजया कुलकर्णी…

Read More

शिवसेना उबाठाच्या खुलताबाद शहर प्रमुखपदी मुकेश मालोदे यांची नियुक्ती:पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना

खुलताबाद | शिवसेना (उबाठा) शहर प्रमुखपदी मुकेश मालोदे यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी विरोेधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे खुलताबाद शहरातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना (उबाठा)चे मराठवाडा संपर्कप्रमुख सुभाष पाटील,…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही:कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो – धीरेंद्र शास्त्री

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी…

Read More