मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा:लग्नसराई अन् शेतीच्या पेरणीपूर्व कामांना फटका, अंबादास दानवे यांची 'आरबीआय'कडे धाव
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील बँकिंग क्षेत्रात सध्या ५०० रुपयांच्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे बँकांमधून रोख रक्कम काढण्यावर मोठ्या मर्यादा येत असून, ऐन लग्नसराई आणि शेतीच्या मशागतीच्या काळात सामान्य नागरिक आणि बळीराजा पुरता अडचणीत सापडला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI)…