'अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय तुमच्या बापाची जहागीर आहे का?':रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर जोरदार पलटवार; महाराष्ट्रात राजकारण तापले
राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संघटनांनी तसेच विरोधी पक्षांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ठिकठिकाणी सत्याग्रह आंदोलन केले. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून कॉकरोच जनता पार्टीवर तसेच या आंदोलकांवर टीका केली जात आहे. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत, बापाचा माल आहे का? अशा शब्दांत भाजप नेते…