Headlines

मोदींचा काटकसरीचा सल्ला अन् साताऱ्यात उधळपट्टी!:टीकेची झोड उठताच सरकारचा 'यू-टर्न'; 400 एसटी बसेसचे नियोजन रद्द

साताऱ्यात शुक्रवारी होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी हेलिपॅड, लाभार्थ्यांसाठी 400 एसटी बसेस, हजारो फूड पॅकेट्स आणि पंखे, कुलरसाठी लाखोंची उधळपट्टी सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने तातडीने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच लाभार्थ्यांची संख्या कमी केली असल्याचे स्पष्टीकरण मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

रिक्षा चालकांना मराठी सक्तीवरून शिंदे गटातच ठिणगी:संजय निरुपम यांचे सरनाईकांना पत्र, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

राज्यातील टॅक्सी, रिक्षा तसेच ओला आणि उबर चालकांनी प्रवाशांशी मराठीतच संवाद साधणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची १ मे म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’पासून काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयामुळे शिवसेना (शिंदे गट) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, माजी खासदार संजय निरुपम यांनी या सक्तीला विरोध दर्शवत…

Read More

वेरूळ बसस्थानकात स्मार्ट सिटी बसचा स्फोट:प्रवासी नसल्याने टळली मोठी दुर्घटना; इंजिन स्फोटाने धांदल, घटनेनंतर भीतीचे सावट

वेरूळ येथील भोसले चौक बसस्थानकात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. ‘स्मार्ट शहर बस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनपा बसच्या इंजिनमध्ये अचानक स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटानंतर काही क्षणांतच बसमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. त्यामुळे बसस्थानक परिसरात उपस्थित असलेले लोक घाबरून इथून तिथे पळू लागले. ही बस छत्रपती…

Read More

भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा:समाधान महाराज शर्मा यांचे प्रतिपादन, गंगापूर येथील श्रीराम कथा‎

प्रतिनिधी | गंगापूर देवाने सर्व दु:खे द्यावीक, परंतु दरिद्रीसारखं दु:ख कोणाला देऊ नये. भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. सत्संगाच्या माध्यमातून भाविकांमध्ये आत्मसाक्षात्कार, ईश्वरभक्ती आणी जीवनात सुधारणा घडवून आणणे या उद्देशासाठी रामकथेचे आयोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने भाविकांनी कथेचे स्रवण करावे, असे मतही…

Read More

तरुणाईला मोबाईलपासून दूर करून वाचन संस्कृती रुजवणारी संमेलने काळाची गरज:शब्दगंध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषीमंत्री भरणे यांचे प्रतिपादन‎

आपली मराठी भाषा, आपले साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे काम शब्दगंध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांपासून अविरत सुरू आहे. अलीकडच्या काळात तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये कमालीची व्यस्त झाली आहे. या पिढीला तंत्रज्ञानाच्या कचाट्यातून बाहेर काढून त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशी संमेलने गरजेची आहेत, असे प्रतिपादन कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी केले. शब्दगंध…

Read More

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी बाप्पू मानकर बिनविरोध:अध्यक्षपदाची गाडी नाकारून वाचलेला निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारत, त्यातून वाचणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंगळवारी पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या…

Read More

KPIT चे अध्यक्ष रवी पंडित यांचे निधन:वयाच्या 75 वर्षी घेतला अखेरचा श्वास; नवोन्मेष, मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीचा अध्याय संपुष्टात

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी केपीआयटी टेक्नोलॉजीचे अध्यक्ष तथा निष्णाता सीए डॉक्टर एस बी (रवी) पंडित यांचे आज पहाटे 5 च्या सुमारास पुणे येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या रुपाने केवळ एका यशस्वी उद्योगपती किंवा सीएचा काळाच्या पडद्याआड गेला नाही, तर दूरदृष्टी, नेतृत्व, नवोन्मेष व मूल्याधिष्ठित कार्यपद्धती यांचा एक प्रेरणादायी अध्याय संपुष्टात आल्याची…

Read More

मनपातील पराभव, गटबाजीमुळे शिंदेसेनेची कार्यकारिणी बरखास्त:संपर्क प्रमुख घेणार पदाधिकाऱ्यांच्या भेटी; नंतर नव्या नियुक्त्या‎

महापालिका निवडणुकीत झालेला दारूण पराभव, एकाच जिल्ह्यात चार जिल्हा प्रमुख नियुक्ती केल्यानंतर वाढलेली गटबाजी आदींमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लोकसभा संपर्क प्रमुखांकडून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भे . मूळ शिवसेनेसह अन्य पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त् यांनी सन २०२२मध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यापासूनच पक्षांतर्गत वाद सुरू झाले. प्रारंभी दोन जिल्हा प्रमुख, एका महानगराध्यक्षसह अन्य…

Read More

महिला अधिकारी नको!:मंत्र्यांच्या भूमिकेवर मनीषा म्हैसकरांचा धक्कादायक खुलासा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वक्तव्याने खळबळ

राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा रंगली आहे ती अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी मांडलेल्या एका धक्कादायक अनुभवामुळे. त्यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळातील एक प्रसंग उघड करत, 2023 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर एका मंत्र्याने, माझा विभाग चालवायला मला महिला अधिकारी नको, अशी भूमिका घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे प्रशासनातील लिंगभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा…

Read More

धुरंधर 2 ने 23व्या दिवशी ₹10.03 कोटी कमावले:चित्रपट डकैतचे ओपनिंग कलेक्शन ₹15 कोटी, अदिवि शेषचा सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन चित्रपट

रणवीर सिंह अभिनित ‘धुरंधर 2’ ने शुक्रवारी जगभरात ₹10.03 कोटींची कमाई केली. तर, अदिवि शेष आणि मृणाल ठाकूर यांच्या ‘डकैत: एक प्रेम कथा’ या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरात ₹15 कोटींहून अधिक कमाई केली. यानंतर हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू मार्केटमध्ये अदिवि शेषचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला. पहिल्याच दिवशी ₹15 कोटींहून अधिक…

Read More