मासे कापू नका म्हणणाऱ्यांना ठाकरे गटाचा सवाल:मग जिवंत कोंबडी घरी न्यायची का? मासळी बाजारातील नव्या नियमांवरून राजकारण तापलं
मुंबईतील मासळी बाजारांमध्ये मासे कापून विकण्यावर घालण्यात आलेल्या कथित निर्बंधांमुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे कोळी समाजात संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरणही तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईच्या मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांच्या उदरनिर्वाहावर गदा…