Headlines

बनावट नोटांचे रॅकेट उघड, चौघांना अटक:गडचिरोली पोलिसांची नागपुरात कारवाई, बँकेतील डिपॉझिट मशीनमुळे झाला पर्दाफाश

गडचिरोली जिल्हा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने नागपूरमध्ये बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या एका हायटेक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ३९,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बँकेच्या डिपॉझिट मशीनमुळे या रॅकेटचा छडा लागला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद टिकाराम कोवे (वय २३, रा….

Read More

मोदींचा काटकसरीचा सल्ला अन् साताऱ्यात उधळपट्टी!:टीकेची झोड उठताच सरकारचा 'यू-टर्न'; 400 एसटी बसेसचे नियोजन रद्द

साताऱ्यात शुक्रवारी होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी हेलिपॅड, लाभार्थ्यांसाठी 400 एसटी बसेस, हजारो फूड पॅकेट्स आणि पंखे, कुलरसाठी लाखोंची उधळपट्टी सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने तातडीने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच लाभार्थ्यांची संख्या कमी केली असल्याचे स्पष्टीकरण मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

यवतमाळ‎मध्ये अनैतिक संबंधाच्या ‎संशयातून डोके चिरडले:मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या

अकोला जिल्ह्यातील बोरीगाव मंजू पोलिस‎ ठाण्यात हद्दीत घडलेल्या एका थरारक‎ आणि क्रूर हत्याकांडचा छडा लावण्यात ‎यवतमाळातील अवधुतवाडी पोलिसांना यश ‎आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 19 वर्षीय तरुणाची दगडाने चेहरा ठेचून‎ निर्घृण हत्या करण्यात आली होती.‎ पोलिसांनी अत्यंत गुप्तता आणि कौशल्याने ‎तपास चक्र फिरवून या प्रकरणातील मुख्य ‎आरोपीला यवतमाळ येथून बेड्या ठोकल्या‎ आहे. या धक्कादायक घटनेमुळे…

Read More

उष्णतेच्या लाटेमुळे विद्यापीठ परीक्षांच्या वेळेत बदलाची मागणी:सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी कुलगुरूंना केले पत्रव्यवहार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळेत बदल करण्याची मागणी सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी केली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी विद्यापीठाला पत्रव्यवहार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतीय हवामान विभागाने २५ एप्रिल ते १२ मे दरम्यान तापमान ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा…

Read More

पालघर जिल्हा मलेरियामुक्त करणार:विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्याची मोहीम, आरोग्य आणि हिवताप विभाग ‘ॲक्शन मोड’वर

पालघरः पालघर जिल्ह्यात मलेरिया रुग्णांचे प्रमाण कमी होत असले, तरी अजूनही मलेरियाला हद्दपार करण्याचे आव्हान आरोग्य विभाग तसेच हिवताप विभागासमोर आहे. हे आव्हान या दोन्ही विभागांनी आता स्वीकारले असून मलेरिया हद्दपार करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्यात येणार आहे. जगभर २५ एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा करण्यात…

Read More

संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात सावे यांच्यासह 5 आमदार उतरणार:बँकेच्या माध्यमातून 1 लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क, सहकाराचे राजकारण

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक यावर्षी रंगतदार होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 138 शाखांच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि एक लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क होतो. यापूर्वी मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढवलेल्या भाजपने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा, विधानसभेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून हक्काची ‘व्होट बँक’ मिळते….

Read More

विदर्भाच्या राजकारणात मोठी खळबळ:विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सुरुंग?; 60 हून अधिक काँग्रेस नगरसेवक 'नॉट रिचेबल'

महाराष्ट्रात १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गणित अद्याप सुटलेले नसतानाच, पूर्व विदर्भात अत्यंत खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. अधिकृत उमेदवारांची नावे निश्चित होण्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची पळवापळवी सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि महत्त्वाच्या…

Read More

कृषी यंत्रे, औजार योजनेत ‘एआय’ किटचा समावेश करा:बळीराजाची तंत्रासाठी साद, एआयमुळे होईल शेती अधिक कार्यक्षम आणि उत्पादनात वाढ‎

. शासन व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपयोगी यंत्रे व औजारांच्या अनुदानित योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली विविध यंत्रसामग्री अनुदानावर किंवा कमी दरात दिली जातात.मात्र, बदलत्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित किटचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळिंब, ऊस व…

Read More

11 people died in a boiler explosion at a Vedanta company in Chhattisgarh, 500 degree boiling steam fell on the workers

Marathi News National 11 People Died In A Boiler Explosion At A Vedanta Company In Chhattisgarh, 500 Degree Boiling Steam Fell On The Workers जांजगीरकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील सिंघीतराई येथील वेदांत पॉवर प्लँटमध्ये मंगळवारी ६०० मेगावॅट युनिट-१ मध्ये बॉयलरचा बॉटम रिंग हेडर फुटला. यामुळे २६ मजुरांवर ५०० अंश सेल्सियसची उकळती वाफ पडली….

Read More

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन वर्षांपासून शेतात वीज खांब पडलेले:महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा, अपघाताची भीती

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गावात शेतकरी प्रशांत शामराव वानखडे यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून वीजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा येत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. वानखडे यांनी यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा त्यांचा…

Read More