रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 बांगलादेशी महिला पळाल्या:केअरटेकर महिलेला मारहाण करून हातपाय बांधून पलायन, 20 दिवसांनीही शोध नाही
पुण्यातील मोहम्मदवाडी येथील ससाणे वस्तीमधील रेस्क्यू फाउंडेशनमधून १२ बांगलादेशी महिला पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ मार्च रोजी पहाटे ही घटना घडली असून, केअरटेकर महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत या महिलांनी पलायन केले. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल २० दिवस दडपून ठेवण्यात आला होता. पळून गेलेल्या १२ महिलांपैकी दोघींना त्याच दिवशी सय्यदनगर…