Headlines

रेस्क्यू फाउंडेशनमधून 12 बांगलादेशी महिला पळाल्या:केअरटेकर महिलेला मारहाण करून हातपाय बांधून पलायन, 20 दिवसांनीही शोध नाही

पुण्यातील मोहम्मदवाडी येथील ससाणे वस्तीमधील रेस्क्यू फाउंडेशनमधून १२ बांगलादेशी महिला पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ मार्च रोजी पहाटे ही घटना घडली असून, केअरटेकर महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत या महिलांनी पलायन केले. विशेष म्हणजे, हा प्रकार तब्बल २० दिवस दडपून ठेवण्यात आला होता. पळून गेलेल्या १२ महिलांपैकी दोघींना त्याच दिवशी सय्यदनगर…

Read More

अकोट वन्यजीव विभागात 23 वाघ, 8 बिबट्यांचे दर्शन:बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 58 वन्यप्रेमींनी मचाणीवर बसून घेतला आनंद

८१ हजार १९२ हेक्टरवर पसरलेल्या आणि वनश्रीमंत असलेल्या अकोट वन्यजीव विभागातील पाच परिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत धारगड परिक्षेत्रात सर्वाधिक वाघ, तर सोनाळा परिक्षेत्रात बिबट्यांचे निसर्गप्रेमींना दर्शन झाले असल्याची माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षकांनी सोमवारी दिली. बुद्ध पौर्णिमेला शुभ्र प्रकाशात “निसर्ग अनुभव’ कार्यक्रम पार पडला होता. यामध्ये राज्यासह परराज्यातून ५८ पर्यटकांनी सहभाग…

Read More

राम माधव म्हणाले- भारताने अमेरिकेसाठी काय नाही केले:टॅरिफ सहन केला, रशिया-इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले; नंतर माफी मागितली, म्हटले- चुकीची तथ्ये दिली

भाजप नेते आणि RSS नेते राम माधव यांच्या अमेरिका आणि भारताच्या संबंधांवरील विधानावरून वाद निर्माण झाला आहे. माधव यांनी वॉशिंग्टनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, भारताने अमेरिकेसोबत चांगले संबंध राखण्यासाठी काय नाही केले. ते म्हणाले, ‘भारताने इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले, रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सहमती दर्शवली आणि अमेरिकेच्या शुल्काचा (टॅरिफ) देखील विरोध केला नाही….

Read More

विदर्भाला उष्णतेचा प्रचंड तडाखा:अमरावती-वर्ध्यात पारा 46 अंशाच्या पार; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

राज्यातील हवामानात सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असतानाच, विदर्भासह बहुतांश महाराष्ट्रात उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४६ अंशाच्या पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघाले आहेत. दरम्यान, या तीव्र उष्णतेच्या लाटेतच संपूर्ण देशासाठी आणि बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे….

Read More

कॉर्पोरेट जिहाद:आरोपींचे राष्ट्रीयत्व रद्द करा अन् फाशी द्या, घरावर बुलडोझर चालवा, नमाज सक्ती हिंदुस्तानात चालणार नाही- देवयानी फरांदे

नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असून तपासाचा आवाका वाढत आहे. यावर बोलताना भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मोठी मागणी केली आहे. धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे, असे भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे यांनी नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी म्हटले आहे. देवयानी फरांदे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने हिंदूच्या मुलींना…

Read More

सोलापुरात समर्थ सहकारी बँकेची नोंदणी वाचवण्याचा आटापिटा:आरबीआयचे निर्बंध कायम तरीही सहकार घेणार ‘समर्थ’ निवडणूक

आर्थिक घरघर लागलेल्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध कायम असतानाही गेल्या आठ महिन्यांत सहकार विभागाने संचालक मंडळावर कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट बँकेची नोंदणी वाचवण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बँकेला प्रारूप मतदार याद्या सादर करण्याचे पत्र दिले. पुढे जाऊन निवडणुकीसाठी रिझर्व्ह बँकेची परवानगीही मिळवली. एनपीएचे प्रमाण वाढल्याने रिझर्व्ह बँकेने 8 ऑक्टोबर…

Read More

करमाळ्यातील सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात 25 जोडपी विवाह बंधनात:श्रीराम प्रतिष्ठानतर्फे आयोजन, हजारो वऱ्हाडी मंडळीचा सहभाग‎

करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाह बंधात अडकली. सनई चौघाड्याच्या गजरात झालेल्या या सोहळ्यास हजारो वऱ्हाडी मंडळीने सहभाग घेतला. वधू वरांना आर्शिवाद देण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्याने करमाळा तालुक्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे….

Read More

बंगालमध्ये ममता दीदींची 'मुघलशाही' संपणार! त्या घरी जाणार- चंद्रेशखर बावनकुळे:देवस्थान इनामी जमिनींचा प्रश्न सुटणार, सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत

पश्चिम बंगालमध्ये यंदा विक्रमी मतदान झाले असून हे मतदान ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील जनक्षोभ दर्शवते. मुघलशाही पद्धतीने काम करणाऱ्या ममता बॅनर्जी आता घरी जाणार हे निश्चित आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि देवस्थान जमिनींच्या कायद्याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली….

Read More

प्रामाणिकपणे रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यांची आज गरज -पारगावकर:जनकल्याण रक्तकेंद्रातर्फे ६० हून अधिक शिबीर संयोजकांचा गौरव‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर “विज्ञानाने आज प्रगती करून कृत्रिम हृदय तयार केले असले, तरी ते चालवणारे रक्त अद्याप विज्ञान प्रयोगशाळेत बनवू शकलेले नाही. रक्ताची गरज केवळ आणि केवळ मानवी रक्तदानातूनच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कर्तव्याच्या भावनेने रक्तदान करणाऱ्यांइतकीच, प्रामाणिकपणे रक्त संकलन आणि पुरवठा करणाऱ्या रक्तपेढ्यांची आज समाजाला गरज आहे. जनकल्याण रक्तपेढी हे सेवाकार्य सक्षमपणे करत आहे,”…

Read More

खुलताबाद तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहाने यांची फेरनिवड:सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही निवड कायम

प्रतिनिधी | खुलताबाद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या खुलताबाद तालुका नूतन कार्यकारिणी निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष राजू लहाने यांच्यावर पुन्हा विश्वास दर्शवत त्यांची अध्यक्षपदी तसेच सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही कायम निवड करून संघटनेच्या सातत्यपूर्ण नेतृत्वाला बळ देण्यात आले. या बैठकीस जिल्हा निरीक्षक अंकुश जाधव व हारून शेख यांची…

Read More