Headlines

राष्ट्रवादीत ‘पार्थ’ पर्व, तटकरे,पटेल, भुजबळांना ‘स्थान’ नाही:तरीही तटकरे प्रदेशाध्यक्ष तर प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष!

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षात नव्या- जुन्या पिढीतील संघर्ष तीव्र झाला आहे. खासदार पार्थ पवार यांच्या पुढाकाराने निवडणूक आयोगाला सादर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या मातब्बरांच . दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयावर खासदार पार्थ समर्थकांनी पूर्ण नियंत्रण मिळवल्याने नाराज ज्येष्ठ नेत्यांनी थेट शरद पवारांकडे धाव घेत ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून मध्यस्थीची…

Read More

ग्रामपंचायतींनी पालखी मार्गावरील बॅनर्ससह होर्डिंग्ज तत्काळ हटवावेत:गटविकास अधिकारी जाधव यांचे भंडीशेगाव व वाखरी ग्रामपंचायतींना पत्र‎

आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पालखी सोहळ्यांचे आगमन होत आहे. या काळात कायदा, सुव्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणचे बॅनर्स, फ्लेक्स व होर्डिंग . पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी १ जुलै रोजी दिलेल्या पत्रान्वये पंचायत समितीने ही कडक पावले उचलली आहेत. या…

Read More

फुलेवाड्यातील पूजेवरून वाद:खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा, शरद पवार गटाची मागणी; पुरातत्व विभागाला पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महात्मा फुले यांच्या वाड्यात विनापरवानगी वटपौर्णिमा साजरी केल्याप्रकरणी ही मागणी करण्यात आली आहे. तसेच, शनिवारवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती तसेच संविधान दिन यांसारखे कार्यक्रम करण्यास परवानगी देण्याची…

Read More

‘अंबाडी’त केवळ 11 टक्के साठा; कन्नडला ग्रॅव्हिटीने पाणी येणे बंद:पंप खरेदी करणार, एक्सप्रेस फीडर कार्यान्वित‎

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांवर पोहचला असून, शहराला १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ग्रॅव्हिटीने येणारे पाणी बंद झाले असून, मंगळवारी नगराध्यक्षा फरीन बेगम, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, नगरसेवक अब्दुल जावेद यांनी धरणास भेट देत पंप हाऊससह वितरण प्रणालीची माहिती घेतली. पाणी वितरणात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे…

Read More

वाजले टाळ-मृदंग, दुमदुमली राहुरी नगरी:निवृत्तीनाथांची पालखी चालली पंढरपुरी!, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि फुलांच्या उधळणीने वारकऱ्यांचे स्वागत‎

. आषाढी एकादशीचे वेध लागले की संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीत रंगून जातो. “नाव ओठी, तुझे रूप ध्यानी…” या भक्तिभावाने भारावलेले हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे राहुरीत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण, टाळ-मृदंगाचा…

Read More

एक वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 98 रुग्णांना वैद्यकीय मदत:संगमनेरातील रुग्णांना 1 कोटींचे अर्थसहाय्य- आ. खताळ‎

संगमनेर मतदारसंघातील सर्वसामान्य, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीचा मोठा दिलासा मिळवून देण्यात आमदार अमोल खताळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून मागील एका वर्षात ९८ रुग्णांना १ कोटींच्या आसपास वैद्यकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गंभीर रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:प्रश्न पक्षांतराचा निर्णय का?, निष्ठा आहे पण लाेकांची कामे करता येत नसतील तर काय उपयाेग?- ओमराजे

समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही, अशा शब्दांत उद्धवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याबाबत आपली परखड भूमिका मांडली. उद्धवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओमराजे यांनी…

Read More

पाश्चात्त्य संस्कृतीच्या किडीपासून आपली कुटुंब व्यवस्था वाचवा:भैय्याजी जोशी यांचे आवाहन, जातीयवादाच्या वृक्षाची बीजे नष्ट करा‎

भारताची कुटुंब व्यवस्था ही संपूर्ण जगात अद्वितीय आहे. येणाऱ्या पिढीत संस्कारांचे बीजारोपण याच व्यवस्थेतून होते. मात्र, आज आपल्या या आदर्श कुटुंब व्यवस्थेला पाश्चात्त्य संस्कृतीची कीड लागली आहे. ही विकृती जर आपण वेळीच दूर केली नाही, तर आपली कुटुंब व्यवस्था ढासळेल. त्यामुळे हे सांस्कृतिक षड्यंत्र ओळखून समाजाने वेळीच जागे व्हावे,असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह…

Read More

कुरुक्षेत्रच्या विद्यार्थ्याचा कॅनडात मृत्यू:रात्री झोपला पण सकाळी उठला नाही, दोन वर्षांपूर्वी स्टडी व्हिसावर गेला होता, शिक्षण घेत होता

कुरुक्षेत्र जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा कॅनडात मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली. कुटुंबाने सरकारकडे मुलाचा मृतदेह परत आणण्याची विनंती केली आहे. युवक सुमारे 2 वर्षांपूर्वी स्टडी व्हिसावर कॅनडाला गेला होता. जिथे सकाळी त्याचा मृतदेह खोलीतून सापडला. मृत विद्यार्थ्याची ओळख लाडवा येथील गजलना गावातील वीरेन रंगा अशी झाली आहे. वीरेन मार्च 2024 मध्ये कॅनडाला…

Read More

Nihangs warn…if action is not taken in 2 days, they will march towards Uttarakhand, Nihangs will camp in Paunta Sahib for two days

Marathi News National Nihangs Warn…if Action Is Not Taken In 2 Days, They Will March Towards Uttarakhand, Nihangs Will Camp In Paunta Sahib For Two Days मनमीत | डेहराडून7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये निहंग शीख आणि प्रशासन यांच्यात सुरू असलेला वाद तूर्तास टळला आहे. शुक्रवार सकाळी उत्तराखंड सरकारच्या अधिकाऱ्यांची आणि निहंग शीख प्रतिनिधींची हिमाचलमधील पाउंटा…

Read More