Headlines

एअर इंडियाने 6 आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान उड्डाणे रद्द केली:23 मार्गांवर कपात, जून ते ऑगस्टचे वेळापत्रक जाहीर; इंधन महाग झाल्याने निर्णय

एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरलाइनने बुधवारी सांगितले की, जून ते ऑगस्ट या कालावधीत 6 आंतरराष्ट्रीय मार्ग रद्द केले आहेत. यात दिल्ली-शिकागो आणि मुंबई-न्यूयॉर्क यांसारख्या व्यस्त मार्गांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, 23 आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमानांची संख्या कमी केली आहे. टाटा समूहाच्या एअरलाइन कंपनीने सांगितले की, काही देशांवरून उड्डाणांवर असलेल्या निर्बंधांमुळे आणि…

Read More

नीलम गोऱ्हेंनी पुण्यातील ग्रामदैवतांचे घेतले दर्शन:भ्रष्टाचारमुक्तीसाठी केली प्रार्थना, विधानपरिषदेवर सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड

शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यपदी सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर त्यांनी रविवारी पुण्यातील ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी प्रार्थना केल्याचे सांगितले. त्यांनी श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्री दत्त मंदिरात विधिवत पूजा व आरती…

Read More

माऊली अन् तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता:संभाजी भिडेंच्या विधानावर शरद पवार गटाचा संताप; वारकऱ्यांतील कथित घुसखोरांवर भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधातील आपल्या मोहिमेंतर्गत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता या जुन्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. मनू हा संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्याहून श्रेष्ठ होता, असे विधान केल्यानंतरही आम्ही गप्प बसायचे का? असा सवाल या पक्षाने…

Read More

12 मेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग; कोणाला मिळणार तिकीट?:कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी? पहा संपूर्ण यादी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे मोठी हालचाल सुरू झाली आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या सर्वच पक्षांकडून उमेदवारीसाठी नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी…

Read More

मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम:पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत; रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी मागितली वर्षाची मुदत

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते…

Read More

शॉर्टसर्किटने पिंपळदरीतील ‎रोहित्र जळाले, अनर्थ टळला‎:युवकांची तत्परता; झाडाच्या फांद्या, मातीची ढेकळे मारल्याने आगीवर नियंत्रण

पिंपळदरी गावालगतच्या परिसरात महावितरणच्या एका विद्युत डीपीला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी (११ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता घडली. काही धाडसी युवकांनी प्रसंगावधान राखून वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र डीपी जळून खाक झाली. गावाला वीजपुरवठा या डीपीवरून होत होता. सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास डीपीवरील तारांचे घर्षण झाले. मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या….

Read More

नाशिकमध्ये शेतकऱ्यांना मारहाण:जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, ही मस्ती महागात पडणार; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या बाह्य परिक्रमा मार्गासाठी (रिंग रोड) सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले आहे. मातोरी आणि मुंगसरे परिसरात जमीन मोजणीदरम्यान अधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना, तसेच महिलांना घरात घुसून मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, शिवसेना उद्धव…

Read More

नागपुरात नव्या बांधकामांना पार्किंग अनिवार्य:वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा, अतिक्रमणांवरही कारवाईचे आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यानुसार, शहरातील प्रत्येक नवीन बांधकामामध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा ठेवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सचिवालयात झालेल्या एका आढावा बैठकीत शहरातील विविध विकास प्रकल्पांवर चर्चा करताना हे निर्देश देण्यात आले. नवीन उभारण्यात येणाऱ्या भाजी…

Read More

सीईओ सत्यम गांधींचा मेळघाटात पहिला दौरा:पाणीपुरवठा, मनरेगा कामांची पाहणी; अधिकाऱ्यांना कठोर सूचना

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपला पहिला दौरा मेळघाट परिसरात केला. या दौऱ्यात त्यांनी पाणीपुरवठा आणि मनरेगाच्या कामांबाबत कठोर भूमिका घेत, कामचुकार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सीईओ गांधी यांनी मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमधील काही गावांना भेटी दिल्या. त्यांनी ग्रामस्थ तसेच स्थानिक अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जलजीवन मिशन, पाणीटंचाई निवारण,…

Read More

Ran Samvad 2026: Sindoor lessons drive Army’s push for multi-domain war-fighting, Army Chief says

Army Chief at Ran Samwad 2026 in Bengaluru BENGALURU: Lessons from Operation Sindoor, particularly the battle against disinformation, are now shaping how the Indian Army prepares for future wars, Chief of Army Staff General Upendra Dwivedi said on Thursday, framing them as central to the shift towards multi-domain operations (MDO).Speaking at Ran Samvad 2026 in…

Read More