विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत पेच:शिवसेनेचा 7 जागांवर ठाम दावा, भाजपकडून केवळ 3 ते 4 जागा सोडण्याची तयारी
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपाचा मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या निवडणुकीत तब्बल 7 जागांवर आपला ठाम दावा सांगितला आहे. ज्यामध्ये आधीच्या 5 जागा आणि नव्याने वाढलेल्या ताकदीच्या आधारावर अतिरिक्त 2 जागा, अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव त्यांनी…