मुख्यमंत्री फडणवीस: भारत 'विश्वगुरू' बनेल:आध्यात्मिक महासत्ता होण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनातून
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याचे स्वप्न केवळ आर्थिक किंवा लष्करी सामर्थ्यावर आधारित नाही, तर ते आपल्या समृद्ध आध्यात्मिक वारशात रुजलेले आहे. भारताला आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रशस्त होत आहे, असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग…