Headlines

जागेच्या वादातून कामगाराला मारहाण:नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा, खराडी पोलिसांकडून तपास सुरू

पुणे नगर रस्त्यावरील खराडी येथे जागेच्या वादातून एका कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कामगाराचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला. खराडी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अल्ताफ अहमद शेख (वय २६, रा. खराडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजपा नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे, पंकज संजय पाटोळे,…

Read More

NSA डोवाल म्हणाले- युद्धाचा उद्देश शत्रूचे मनोधैर्य खच्ची करणे:देशाची सुरक्षा फक्त लष्कराच्या ताकदीने ठरत नाही, जनतेची इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मंगळवारी सांगितले की, देशाची सुरक्षा केवळ त्याच्या लष्करी सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर जनतेची इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची असते. देशाची ताकद मोजताना लोकांच्या मनोबलाकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी चूक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या (RRU) पाचव्या दीक्षांत समारंभात बोलताना डोवाल म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा हा…

Read More

युद्ध संपले, गॅस टंचाई दूर अन् आता पोहोचले शासकीय रॉकेल:स्टोव्ह, ना घरात ना बाजारात, साधी पिनही मिळेना, रॉकेलचे करायचे काय? नागरिकांसमोर प्रश्न‎

युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या गॅस टंचाईच्या धास्तीने रेशनकार्डधारकांना रॉकेल देण्याचा राज्य सरकारचा निर्णय १६ मार्चला जाहीर झाला. मंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणेने हालचाली सुरू केल्या, पण शासकीय लालफितीचा कारभार भेदून या रॉकेलच् . १६ मार्च २०२६ ला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रॉकेल देण्याचा निर्णय जाहीर केला. २० मार्चला आदेश धडकले. पुण्याच्या लोणी…

Read More

नवरी एक, नवरदेव अनेक:आठ लग्नांनंतर नवव्या वेळी पर्दाफाश; लाखो लुटणाऱ्या बनावट नवरीला बेड्या, बोगस टोळीचा भंडाफोड

बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून बोगस विवाह लावणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका तरुणीने आधीच अनेक वेळा लग्न करून नवऱ्या मुलांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, आठ लग्नं करूनही ही फसवणूक सुरूच ठेवत नवव्या लग्नावेळी तिचे बिंग फुटले आणि अखेर पोलिसांनी नवरीसह एजंटाला अटक…

Read More

विदर्भात आज पावसाचा इशारा:पुढील आठवड्यात राज्यभर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला असला, तरी गेल्या काही दिवसांतील धुव्वाधार पावसाने सर्व कसर भरून काढली आहे. सध्यातरी राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. मात्र, असे असले तरी भारतीय हवामान विभागाने आज विदर्भासाठी पावसाचा महत्त्वाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून मुंबईकरांसह…

Read More

TMC West Bengal President Chandrima Bhattacharya Resigns; Mamata Banerjees Statement

Marathi News National TMC West Bengal President Chandrima Bhattacharya Resigns; Mamata Banerjees Statement कोलकाता6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी नियुक्तीच्या अवघ्या एका महिन्यानंतर शनिवारी पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाची इतर सर्व पदेही सोडली आहेत. त्या बंडखोर गटात सामील होण्याच्या अटकळींना वेग आला आहे. चंद्रिमा यांनी…

Read More

टेकडी गणपतीला 750 किलो चांदीचे सिंहासन:बुधवारी संकष्टी चतुर्थीला होणार लोकार्पण

नागपूर येथील श्री गणेश मंदिर टेकडी, जे विदर्भाचे आराध्य दैवत आहे, त्याच्या धार्मिक वैभवात एका नव्या सिंहासनाच्या लोकार्पणाने भर पडणार आहे. ७५० किलो चांदी आणि अर्धा किलो सोन्याने बनवलेल्या या भव्य सिंहासनाचे लोकार्पण बुधवारी, ३ जून २०२६ रोजी संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. या सोहळ्यानंतर श्री गणेश भगवान रिद्धी-सिद्धीसह या नव्या सिंहासनावर विराजमान होतील….

Read More

महागाईविरोधात भारतीय‎कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन‎:जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने बजेट कोलमडले‎

प्रतिनिधी | अमरावती गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी १ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महागाई विरोधात आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलनानंतर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. ते जिल्हाधिकारी अमरावती यांनी स्वीकारले. यावेळी बोलताना पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, केंद्र व राज्य…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये बदल्यानंतर आता विभाग बदलीच्या हालचाली:सीईओ विवेक गायकवाड यांचा निर्णय

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या नंतर आता विभाग बदलीच्या हालचाली सुरू झाले असून याबाबत तातडीने आवश्यक माहिती सादर करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या आहे. पुढील आठवड्यामध्ये विभाग बदली होणार असल्याची चित्र आहे. हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांमधून कर्मचाऱ्यांच्या मागील महिन्यात बदल्या करण्यात आल्या. त्यासाठी बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या…

Read More

विधानपरिषद निवडणूक 2026:अनेक ठिकाणी बंड शमवण्यात महायुतीला यश; मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंना मोठे यश, ठाण्यातील निवडणूक बिनविरोध

विधानपरिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर, रायगड, पुणे आणि परभणीतील बंडखोरी शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी चक्रे फिरवत अनेकांचे बंड थंड केले. तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेने ठाण्यातील निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या सनेने गुलाल उधाळला आहे. या संदर्भातील लाईव्ह अपडेट्स…

Read More