Headlines

जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी‎

बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या वनसंपदेचा अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत जवळगाव येथील नागेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा, वन व महसूल विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे….

Read More

होरनाडू कन्नड संघाचा 10 वा मेळावा: भाषा मन जिंकते:कन्नड भाषेला इतिहास आणि महत्त्व आहे, मेळाव्यात मान्यवरांचे उमटले सूर‎

कन्नड भाषेला इतिहास व महत्त्व आहे. आजही कन्नड संस्कृती दिसून येतो. मराठी राज्यात कन्नड शाळा आहेत. त्यामुळे ही भाषा समृध्द आहे, असे मत किरटेश्वर मठाचे स्वामीनाथ महास्वामी यांनी व्यक्त केले. भाषा हे मन जिंकण्याचे साधन आहे. कन्नड बोलल्याने आपलेसे वाटते. त्यामुळे घरात कन्नड बोलले पाहिजे, असे मत माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी व्यक्त केले. कर्नाटक…

Read More

मराठी विद्यार्थ्यांनी घडवले बंगाली संस्कृतीचे दर्शन:सोलापूरच्या संघाची मुंबईमध्ये छाप, विद्यार्थ्यांनी सादर केले ‘गिरी सून लो खोबोर’ हे दुर्गा पूजेचे गीत

मुंबई येथील महाराष्ट्र लोकभवन येथे केंद्र शासनाच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. २०) पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत, लोकनृत्य आणि कथ्थकच्या माध्यमातून उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केले. या सादरीकरणाबद्दल राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सोलापूर विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांचे कौतुक…

Read More

विधान परिषद निवडणूक निकाल:6 जागांवर आधीच गुलाल, उर्वरित जागांचा फैसला आज, नाशिक, संभाजीनगरकडे राज्याचे लक्ष

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे लागले असून, या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अमरावती मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षाने आपल्या सदस्यांना…

Read More

विधान परिषद निवडणूक:आज सकाळी दहाला निकाल

विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतांच्या मोजणीला सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. केवळ ६१४ मतांची मोजणी असल्याने अवघ्या दोन तासांतच त्याची प्रक्रिया संपेल. सकाळी दहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नियोजन भवनात होणाऱ्या या मतमोजणीसाठी महसूल व पोलिस प्रशासनाची टीम सज्ज झाली आहे. संपूर्ण मतमोजणी केवळ दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे….

Read More

52 वर्षीय महिलेचा विनयभंग:एका महिलेसह तिघांवर गुन्हा

मुलीबरोबर बोलण्याच्या व फोटो काढण्याच्या कारणावरून ५२ वर्षीय महिलेस अश्लील बोलून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी तिघांवर सलगर वस्ती पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जितेश शशिकांत जाधव, सनी जाधव व अनिता जाधव (सर्व रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक- ३) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी महिला…

Read More

ताणतणाव घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करावे:बबनराव धावणे यांचे आवाहन, इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी केला आसनांचा सराव

भारताने योग अभ्यासाच्या रूपाने जगाला एक अनमोल देणगी दिली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्थैर्यासाठी नियमित मेडिटेशन (ध्यान) करावे, असे आवाहन माजी क्रीडाशिक्षक बबनराव धावणे यांनी केले….

Read More

अहिल्यानगरमध्ये 2 हजारांवर नागरिकांच्या उपस्थितीत शहरात योग दिन साजरा:सावेडी येथील जॉगिंग पार्कमध्ये रंगला योगमय सोहळा

जिल्हा प्रशासन, मनपा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, विविध योग संस्था आणि एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी सावेडी येथील जॉगिंग पार्कच्या मैदानावर हा योगमय सोहळा पार पडला. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते व महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचे उद्घाटन…

Read More

अकोले आगार राज्यात प्रथम; पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट कायम:"जेथे उत्पन्न, तेथेच बस'' धोरणाने आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात‎

आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील एसटी आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘क’ वर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, या प्रथम पारितोषिकाच्या आनंदावर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील दळणवळणाच्या विदारक वास्तवाने विरजण पाडले आहे. “जेथे उत्पन्न, तेथेच बससेवा’ हे ब्रीद घेऊन अकोले आगाराचा कारभार सुरू असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे हाल गेल्या अनेक महिन्यांपासून…

Read More

मुळा धरणावरील विद्युत मोटारी दिवसाआड दोन तास सुरू राहणार:पिण्याचे पाणी व जनावरांच्या गरजा भागवण्यासाठी प्रशासनाची परवानगी‎

राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील पाणीसाठा खालावल्याने आणि पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने धरण प्रशासनाने धरणावरील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आमदार अक्षय कर्डिले यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा…

Read More