जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी
बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या वनसंपदेचा अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत जवळगाव येथील नागेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा, वन व महसूल विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे….