Headlines

पाकिस्तानात 400 ला बियाणे, भारतात 2000 ला विक्री:शेतकरी नेते जावंधियांचे मोदींना पत्र, बियाण्यांच्या किमतीतील तफावतीवर प्रश्न

भारतातील कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानात जिथे अधिक प्रगत कापूस बियाणे सुमारे 400 प्रति किलो दराने उपलब्ध आहे, तिथे भारतीय शेतकऱ्यांना त्याच तंत्रज्ञानातील कमी पर्यायासाठी 2000 प्रति किलो मोजावे लागत आहेत. या अन्यायावर शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाज उठवला आहे….

Read More

राज बब्बर@74; रेपचा सीन पाहून रडली होती आई:मुस्लिम पत्नीने धर्म बदलण्यास नकार दिला, शाहरुखने विचारले- खरंच चुंबन घेता का?

महाभारत बनवणारे बी.आर. चोप्रा या शोपूर्वी एक चित्रपट बनवत होते. नाव होतं ‘इंसाफ का तराजू’. चित्रपटात खलनायक रमेश गुप्ता बनण्यासाठी कोणताही मोठा अभिनेता तयार नव्हता, ज्याला झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या पात्रांवर बलात्कार करताना दाखवायचे होते. प्रत्येक अभिनेत्याला भीती होती की ही भूमिका त्याची प्रतिमा खराब करेल. तेव्हा एका नवोदित अभिनेत्याने या भूमिकेसाठी होकार…

Read More

महाराष्ट्रात राबवणार 'सिंगापूर मॉडेल':रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या शाखा 50 ठिकाणी होणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आगामी वर्षापर्यंत ५० ठिकाणी शाखा सुरू कराव्यात. तसेच या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी मिळेल अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची तयारी सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर तयार करून घ्यावी असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती रतन टाटा महाराष्ट्र…

Read More

थकबाकीदार ग्राहकांकडून अनधिकृत वीज वापर:महावितरणने छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल केला

महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या पाच ग्राहकांवर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे स्टेशन आणि पदमपुरा भागातील या ग्राहकांकडून मीटर काढल्यानंतरही थेट वीज वापर सुरू होता. महावितरणच्या रेल्वे स्टेशन शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. कनिष्ठ अभियंता रवींद्र वाघ, प्रधान तंत्रज्ञ राजेंद्र बागुल, वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल उबाळे, परमेश्वर नावटके, विद्युत सहायक…

Read More

शिवसेना @ 60:भुजबळ, राणे, शिंदेंपासून ते 6 खासदारांच्या बंडापर्यंत…साठाव्या वर्धापन दिनी वाचा वाघाची डरकाळी फोडणाऱ्या दोन्ही शिवसेनेचे 'बॅलन्स शीट'!

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर आपला अमीट ठसा उमटवणारी शिवसेना आज आपल्या स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मात्र, याच ऐतिहासिक दिवशी शिवसेना ठाकरे गटाला (उबाठा) आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर यश आले असून, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी बंडाचे…

Read More

विधान परिषदेत घोडेबाजार होणार:डॉ. नितीन राऊत यांच्याकडून भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह विदर्भातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत राज्याचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांनी लोंढे यांच्या विजयाचा दावा करताना, भाजपचे नगरसेवक फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. डॉ. नितीन राऊत यांनी निवडणुकीतील राजकीय गणितांवर बोलताना म्हटले की,…

Read More

सिंधुदुर्गात 3 शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू:दोघेजण थोडक्यात बचावले, वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणातील घटना

राज्यात उन्हाळ्याच्या कडाक्यापासून सुटका मिळवण्यासाठी तरुण जलाशय, विहिरी आणि तलावांवर पोहण्यासाठी गर्दी करत असताना, हा आनंद अनेकदा जीवावर बेतत असल्याच्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील करुळ धरणात घडली असून, तिथे तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने दोघे जण बचावले असल्याची माहिती आहे….

Read More

नवरदेवाचा बूट लपवला म्हणून पोटात खुपसला खंजीर!:2 जण गंभीर जखमी, चौघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

हिंगोली तालु्क्यातील कळमकोंडा येथे विवाह सोहळ्यात नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारसाठी शासकिय रुग्णालया दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 28 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे दोन दिवसांपूर्वी…

Read More

आई-वडिलांना विसरू नका, ते परत मिळत नाहीत- भुसारे:कन्नड तालुक्यातील शेलगाव पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन‎

जगात सर्व काही मिळेल, पण आई-वडील परत मिळणार नाहीत. ज्या आई-वडिलांनी हाताचा पाळणा केला, त्या आई-वडिलांना कधीच विसरू नका, असे प्रतिपादन ह.भ.प. रेणुका भुसारे यांनी केले. कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील सोसायटीचे माजी संचालक दौलत सांडू शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी (२६ मे) कार्यक्रम झाला. कीर्तनरूपी सेवेतून रेणुका भुसारे बोलत होत्या. शेलगावचे सरपंच विलास मनगटे,…

Read More

रुग्णांची आर्थिक लुट झाल्यास गंभीर परिणाम:शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय सेंटर चालकास जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमआरआय विभागात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सेंटर चालकाला चांगलेच फटकारले. रुग्णांची लुट झाल्यास गंभीर परिणाम होतील असा सज्जड दम त्यांनी दिला. त्यानंतर सेंटर चालकाच्या वरिष्ठांनी माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला. हिंगोली येथील रहिवासी वसंत यांनी त्यांची…

Read More