![]()
गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरक्षिततेची जोड देण्यासाठी सातारा शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी सायंकाळी सातारा शहरातील मोती चौक परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून गणेशोत्सवातील सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह पोलिस व प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या काळात मोती चौक परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यातच गणेश मंडळांच्या मिरवणुका, वाहनांची वाढती संख्या आणि बाजारपेठेतील गर्दी यामुळे वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत पाहणीदरम्यान चर्चा करण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर गर्दी वाढणारी ठिकाणे, वाहतूक कोंडीची संभाव्य ठिकाणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील भागांची माहिती घेण्यात आली. पोलिस बंदोबस्ताचे योग्य नियोजन, वाहतुकीचे नियमन आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी पोलिस, प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतानाच भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सज्ज राहण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागांची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे.
Source link
गणेशोत्सवात सातारयात ‘खाकी’ची नजर:पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून पाहणी; गर्दी, वाहतूक आणि सुरक्षेच्या नियोजनाचा आढावा