![]()
शरीराच्या आजारांमागे मनाचाही एक अदृश्य हात असतो. हे आतावैद्यकीय शास्त्रसुद्धा मान्य करते. वैद्यकीय शास्त्राला मन प्रत्यक्षपकडता येत नसले, तरी त्याचे परिणाम नक्कीच शोधता येतात. कारणमन हा शरीराचा भौतिक अवयव नसून ती एक अवस्था आहे आणि तीआपणच निर्माण केली आहे. या बाबतीत मन खूप चतुर आणिवेगवान असते. त्याच्यासमोर शरीर कमजोर पडते. मन आपल्या इच्छापूर्ण करण्यासाठी शरीराचा बळी देते. कधीकधी आपल्याला वाटतेकी, आपल्या शरीराकडून असा चुकीचा प्रकार घडू नये, तरीही तोआपल्याकडून घडतो. आत ‘मन” नावाचा असा घटक आहे. तोआपली इच्छा नसतानाही चुकीची कामे करून घेतो. अध्यात्म सांगतेकीमन शांत आणि नियंत्रणात असेल तर शरीर आपोआप निरोगीबनते. म्हणूनच आता ‘मानसिक स्वास्थ्या”वर जास्त काम करण्याचीवेळ आली आहे, कारण ‘शारीरिक स्वास्थ्य” त्यावरच अवलंबूनअसते. मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी २४ तासांतून काही वेळयोगासनांसाठी आणि ध्यानासाठी दिला पाहिजे. शरीर निरोगी ठेवायचेअसेल तर मनावर राज्य करा, आणि मनावर राज्य करायचे असेल तरध्यान करा.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मन नियंत्रणात असेल तर शरीरही निरोगी राहील