Headlines

रणबीर कपूरने आदित्य रॉयसोबत फोटो काढला नाही:म्हटले- आदित्य जास्त देखणा आहे; मुंबईत दोघे एकत्र दिसले

बॉलिवूड अभिनेते रणबीर कपूर आणि आदित्य रॉय कपूर नुकतेच मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र दिसले. यावेळी दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळाली. पॅपाराझीसमोर रणबीरने मस्करीत आदित्यसोबत फोटो काढण्यास नकार दिला. मुंबईतील एका रस्त्यावर जेव्हा दोन्ही अभिनेते पॅपाराझींना पोज देत होते, तेव्हा एका फोटोग्राफरने त्यांना एकत्र फ्रेममध्ये येण्याची विनंती केली. यावर रणबीरने लगेच मस्करीत म्हटले, “नाही, याच्यासोबत नाही,…

Read More

मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी:म्हणाले – 'हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार', 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा…

Read More

वर्ध्यात रविवारी तापमान 46.6 पार:दुपारच्या वेळी रस्ते ओस, जनजीवन विस्कळीत; उद्योगांमधील प्रदूषण तापमानावाढीला कारणीभूत

वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून तापमानाने ४६.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच मे महिन्याची चाहूल लागल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील दोन तीन कंपन्यांमुळे व त्यांच्या वाढत्या प्रदूषणाने तापमानात वाढ होत असून, कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्ते…

Read More

Trade to Double in 5 Years; 5,000 Indians Get Work Visas Annually

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या (सोमवार, 27 एप्रिल) मुक्त व्यापार करार (FTA) स्वाक्षरी होईल. दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक्ले उपस्थित राहतील. या कराराचा मुख्य उद्देश पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवणे आहे….

Read More

मोदी म्हणाले- टीएमसीचा अहंकार तुटला, भाजपचा विजय निश्चित:ममता सरकारच्या राजवटीत 'माँ-माटी, मानुष'चा सन्मान नाही, छोटे नेते स्वतःला सरकार समजतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव आणि हुगळी येथील हरिपाल येथे रॅली घेतली. त्यांनी बनगावमध्ये म्हटले, ‘पहिल्या टप्प्यातील मतदानात टीएमसीचा अहंकार मोडला आहे. दुसऱ्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित होताना दिसत आहे. पंतप्रधानांनी आरोप केला की, टीएमसीच्या राजवटीत छोटे नेते आणि गुंड स्वतःला सरकार समजू लागले आहेत. ते म्हणाले, ‘15…

Read More

धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती:छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू…

Read More

रिक्षा-टॅक्सी चालकांना 'मराठी भाषा येणे' अनिवार्य:2 मे पासून अंमलबजावणीचे संकेत; निर्णयाविरोधात उद्या गोरेगावात चालकांचा एल्गार

राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना आता ‘व्यवहारिक मराठी’ येणे अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. मात्र, २ मे २०२६ पासून मराठी लिहिता-वाचता न येणाऱ्या चालकांचे परवाने थेट रद्द करण्याचा इशारा दिल्याने रिक्षा-टॅक्सी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा निर्णय ‘अन्यायकारक’ आणि ‘बेकायदेशीर’ असल्याचा आरोप करत संघटनांनी उद्या, २७ एप्रिल रोजी…

Read More

कैलाश खेर यांचा कार्यक्रमात गाण्यास नकार:म्हणाले- कलाकाराला जोकर बनवू नका; सचिन तेंडुलकरला कधी म्हणाल का षटकार मारून दाखवा?

गायक कैलाश खेर यांनी नुकतेच दिल्लीतील एका कार्यक्रमात ऑन-डिमांड गाणे गाण्याची विनंती नाकारली. ते म्हणाले की, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गायकांना जाता-येता दोन ओळी ऐकवण्याचा आग्रह करणे कलाकाराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतो. गायकांच्या मते, कलाकारांना मनोरंजनाचे साधन किंवा ‘जोकर’ समजू नये. दिल्लीतील कार्यक्रमात गायक संतापले कैलाश खेर 25 एप्रिल रोजी दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये ‘सिक्स सिग्मा लीडरशिप समिट’च्या सातव्या…

Read More

समृद्धी महामार्गावर स्कॉर्पियोचा भीषण अपघात:टायर फुटल्याने गाडी पलटली; गुजरातचे 5 प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाशिम जिल्ह्यांतर्गत कारंजाजवळ चॅनेल क्रमांक १६७ वर एका स्कार्पिओ गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील पाच प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे सर्व प्रवासी गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या तापी-वापी भागातील…

Read More

महाराष्ट्रावर सूर्य कोपला!:परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू, अकोल्यात पारा 46 वर जाण्याचा इशारा; अनेक शहरांत रस्ते सामसूम

महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. विदर्भ व मराठवाड्यासह अनेक शहरांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचे दिसून येत आहे. परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा बळी गेला आहे. तर अकोल्यात पारा तब्बल 46 अंशांवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी…

Read More