Headlines

अकोल्याच्या दुर्गम भागात मुक्कामी एसटी पुन्हा धावली:15 जुनपासून राजूर ते रतनवाडी, सांम्रद, घाटघर ते शेंडी व परत राजूर ही बस धावणार‎

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, पर्यटकांची पंढरी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अकोले आदिवासी तालुक्यातील दुर्गम रतनवाडी आणि साम्रद गावांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. तांत्रिक कारणांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुक्कामी एसटी बस सेवा १८ मेपा . माजी मंत्री तथा आदिवासी मधुकरराव पिचड यांनी या भागातील पर्यटन आणि जनसेवेसाठी ही मुक्कामी बस सेवा सुरू केली होती. मात्र,…

Read More

शिर्डीत अत्याधुनिक तोफगोळा प्रकल्पाचे लोकार्पण:भारत लवकरच जगातील मोठा संरक्षण निर्यातदार देश बनणार- राजनाथ सिंह

देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडून जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असून, भारत लवकरच जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देश बनेल, असा ठाम विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या ‘निबे समूहा’च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र व तोफगोळा (आर्टिलरी शेल) उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रोत्साहनपर धोरणांमुळे संरक्षण उत्पादनात…

Read More

चंद्रपुरातील ब्रह्मपुरी सलग दुसऱ्या दिवशी सर्वात उष्ण, 47.1°C:जगातील 50 उष्ण शहरांमध्ये भारतातील 37; 7 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

भारताचा अर्ध्याहून अधिक भाग तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटेने तापत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र आणि ओडिशाच्या अनेक भागांमध्ये तापमान अजूनही 45°C च्या वर जात आहे. महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. येथे 47.1°C तापमानाची नोंद झाली. खाजगी एजन्सी AQI नुसार, शनिवारी जगातील 50 सर्वात उष्ण…

Read More

राजमाता जिजाऊ नदीघाटाचा मार्ग मोकळा; अतिक्रमण हटवले जाणार:विकास परियोजनेंतर्गत गोदावरी नदीकाठाचे होणार सुशोभीकरण‎

पैठण शहरातील गोदावरी नदीकाठाचा विकास साधण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘राजमाता जिजाऊ नदीघाट विकास परियोजना’ अंतर्गत घाट बांधकामाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई येत्या सोमवा . राजमाता जिजाऊ घाटास मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाची तत्त्वतः मान्यता मिळाली होती. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये जिल्हाधिकारी स्तरावरून प्रशासकीय मान्यता देण्यात आली….

Read More

जायकवाडीत ‘शिलवर’ मासा आढळला:15 किलो वजन, तब्बल वर्षभरानंतर आढळला दुर्मिळ मासा‎‎

जायकवाडी धरणातील गोड पाण्यात आढळणारा आणि अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा ‘शिलवर’ हा गावरान मासा एका वर्षानंतर मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला आहे. स्थानिक मच्छीमार सखाराम सुखदेव यांच्या जाळ्यात हा अजस्त्र मासा अडकला असून, त्याचे वजन तब्बल १५ किलो भरले आहे. हा दुर्मिळ मासा व्यापारी रवी पल्हारे यांना मिळाला असून, स्थानिक बाजारपेठेत या माशाला मागणी आहे. गोड पाण्यात…

Read More

मंजरपूर शिवारामधील खून प्रकरणामध्ये 5 जण अटकेत:डोळ्यात मिरची पावडर टाकून सख्खा चुलत भावानेच चाकूने भोसकले‎

मंजरपूर शिवारात जुन्या वहिवाट ‎‎रस्त्यावरून दोन सख्ख्या चुलत ‎‎भावांमध्ये शुक्रवारी वाद उफाळून‎आला. या वादाचे रूपांतर तुंबळ ‎‎हाणामारीत झाले आणि एकाचा‎चाकूने भोसकून खून करण्यात‎आला. या प्रकरणी शिल्लेगाव‎ठाण्यात सात जणांवर खुनाचा गुन्हा ‎‎दाखल असून, पाच आरोपींना‎अटक केल्याची माहिती वरिष्ठ‎निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली.‎ सतीश बोल्डे यांच्या तक्रारीनुसार‎रघुनाथ बोल्डे, सागर बोल्डे,‎शोभाबाई बोल्डे, दौलत बोल्डे,‎योगेश बोल्डे, सेजल कामठे, आरती‎जाधव…

Read More

देशातील मोठ्या शहरांमध्ये 25-60% पर्यंत पाण्याची नासाडी:मुंबईत भोपाळ-इंदूरच्या गरजेपेक्षा जास्त पाणी वाया; इंदूरमध्ये 65% पाणी गळती

देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांमध्ये 25-60% पर्यंत पाणी वाया जात आहे. एकतर पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मोठे लीकेज आहेत किंवा पाईपलाईनमध्ये अवैध कनेक्शन जोडले गेले आहेत. परिस्थिती अशी आहे की मुंबईला दररोज सुमारे 3,850 एमएलडी (दशलक्ष लिटर दररोज) पाणी पुरवले जाते. यापैकी सुमारे 30% लीकेज मानले जाते. दररोज सुमारे 1000 एमएलडी पाणी पाईपलाईन लीकेज आणि इतर…

Read More

पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी स्वच्छ करा:मनमाडला नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना‎

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदीनाले, गटारी आणि सार्वजनिक परिसरांची तातडीने स्वच्छता करावी, अशा सूचना नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२०२६ अंतर्गत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची तातडीची बैठक नगराध्यक्षांच्या दालनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव भामरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील प्रमुख व सुपरवायझर यांना…

Read More

कन्नडच्या रुग्णालयात दररोजची ओपीडी 500 अन् खाटा फक्त 50:उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव 7 वर्षांपासून धूळखात‎

शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचा असलेला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव ७ वर्षांपासून शासनदरबारी धुळखात पडला आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रस्ताव प्रलंबित असून, कन्नडकरांना अद्ययावत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. रुग्णालयात रोजची रुग्णसंख्या ५०० आहे. खाटा केवळ ५० आहेत. त्यामुळे अनेकांना उपचारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागत आहे. कन्नड रुग्णालय सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर…

Read More

पिकांचे नुकसान:लासूर, पाचोड, शिऊरला अवकाळीचा तडाखा‎, देवळीमध्ये वीज पडून बैल ठार, शिऊर येथे शेडनेट कोसळले, वीजपुरवठा खंडित‎

लासूर स्टेशन, सावंगी, देवळीसह परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र लागण्यापूर्वीच आलेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा, तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतशिवारातील अनेक झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. परिणामी, संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित होता. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर…

Read More