आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकच निर्णय:रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनला पनवेल तालुक्यात 15 जमीन देण्याचा निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महसूल व वन विभागाशी संबंधित केवळ एकच निर्णय घेण्यात आला. त्यात अॅमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला रायगडच्या पनवेल तालुक्यातील भाताण येथील तब्बल 15 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन ही 1986 साली स्थापन झालेली भारतातील एक प्रमुख ना-नफा संस्था आहे. जगप्रसिद्ध…