Headlines

जिल्हा परिषदेच्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण:बदली झालेल्या शिक्षकांना जनगणना काम पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ४५ पैकी ४४ अतिरिक्त विषय शिक्षकांचे यशस्वीपणे समायोजन केले आहे. या शिक्षकांना बदली होऊनही देशासाठी महत्त्वाचे असलेले जनगणना कार्य पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही समायोजन प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. या प्रक्रियेत एकूण…

Read More

डॉ. अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान:नितीन गडकरी म्हणाले, जगाला वाचवण्यासाठी शाश्वत मूल्यांची गरज

पुणे: वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ उद्योगपती आणि फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया यांना २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना गडकरी यांनी, विचार भिन्नता ही समस्या नसून विचारशून्यता ही खरी समस्या असल्याचे मत व्यक्त…

Read More

अकोल्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार:पाच दिवसानंतर गुन्हा दाखल; आरोपी नात्यातील अल्पवयीन मुलगा

अकोला शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने प्रसारमाध्यमांसमोर करताच पोलिसांनी अखेर पाच दिवसांनी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास संबंधित आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. अकोला शहरातील चिमुकलीवर तिच्याच जवळच्या नात्यातील १४ वर्षीय मुलाने घरात कुणी नसताना…

Read More

खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात:मुंबई-पुणे महामार्गावरील घटना, गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची दिली माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला असून गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माहिती दिली की, आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन…

Read More

निदा खान आणि आईची समोरासमोर दीड तास चौकशी:MIM नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर नोटीस; आश्रय दिल्याचा आरोप

नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पोलिसांनी अखेर छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत. या तपासात एक खळबळजनक बाब समोर आली असून, निदा खानला लपण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. आता पोलिसांनी निदा खानसह तिची आई आणि नातेवाईकांची कसून चौकशी केल्याचे समोर आले आहे….

Read More

लंडनला निघालेल्या गुजराती कुटुंबाला परदेशात ओलीस ठेवले:मुलाचा रक्ताने माखलेला फोटो पाठवून 1 कोटींची मागणी

एजंटच्या भरवशावर परदेशात गेलेले आणखी एक गुजराती कुटुंब परदेशात अडकले आहे आणि एजंटकडून खंडणीची मागणी करण्यात आली आहे. अहमदाबादच्या गोमतीपूर परिसरात राहणारे एक जोडपे त्यांच्या दोन मुलांसह लंडनला जाण्यासाठी निघाले होते, पण दुबईतून ते बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. दुसरीकडे, एजंटकडून कुटुंबीयांना फोन करून एका मुलाचा रक्ताने माखलेला फोटो पाठवून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली…

Read More

निदा खान प्रकरणी आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची शिवसेनेची मागणी:नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीला मदत केल्याचा आरोप

नाशिक येथील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतरण प्रकरणी मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने (शिंदे गट) पोलीस आयुक्तांकडे केली आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान सुमारे ४० दिवस फरार होती….

Read More

राज्यात कुठे कडाक्याचे ऊन तर कुठे अवकाळीचा फटका:रायगडमध्ये वीज पडून बालकाचा मृत्यू; पुणे-बंगळुरू महामार्गाला नदीचे स्वरूप

राज्यात सध्या हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत असून एका बाजूला तीव्र उष्णतेमुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसरीकडे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील उंब्रज परिसरात नदीचे स्वरूप मिळाले आहे. या अवेळी आलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून बागांचे मोठे नुकसान झाले आहे; दरम्यान, रायगड…

Read More

दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा:इंटेलिजन्सने म्हटले- गोळीबार आणि आत्मघाती हल्ला देखील होऊ शकतो, भाजप मुख्यालय-सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली

इंटेलिजन्स एजन्सींनी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयने सूत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे. एजन्सीनुसार, भाजप मुख्यालय आणि आसपासच्या सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एजन्सींना संशय आहे की, दीनदयाल उपाध्याय (DDU) मार्गावरील कार्यालयांना आत्मघाती हल्ले, कार बॉम्बस्फोट, गोळीबार किंवा आयईडीद्वारे लक्ष्य केले जाऊ शकते. कोणताही धोका टाळण्यासाठी सुरक्षा दलांनी पाळत…

Read More

युवकांनी 'विकसित भारत 2047' चे शिल्पकार बनावे- केंद्रीय मंत्री सिंधिया:डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात 18,720 स्नातकांना पदवी

केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी युवकांना ‘विकसित भारत २०४७’ चे शिल्पकार बनण्याचे आवाहन केले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (डीपीयू) १७ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यात ९ विद्याशाखांमधील एकूण १८,७२० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. सिंधिया म्हणाले की, ‘विकसित भारत २०४७’ च्या…

Read More