वंचित घटकांत योजना पोहोचविण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी:कन्नडला महाराजस्व अभियानाचा उत्साहात समारोप
शासनाच्या योजना दुर्गम भागात आणि वंचित घटकात पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून जनजागृती करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी शुक्रवारी महाराजस्व अभियानाच्या समारोप प्रसंगी केले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इनडोअर सभागृहात आजपर्यंत दहा मंडळात झालेल्या महाराजस्व अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी गोरड म्हणाले, शासनाने…