Headlines

आर्ट ऑफ लिव्हिंगचा 45 वा स्थापना दिवस, पंतप्रधान उपस्थित राहणार:10 मे रोजी बंगळुरूमध्ये कार्यक्रम; 182 देशांतील लोक सहभागी होतील

बंगळुरू येथे 10 मे रोजी ‘आर्ट ऑफ लिविंग’चा 45 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला जाईल. पंतप्रधान मोदी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असतील. ते कार्यक्रमाला संबोधितही करतील. पंतप्रधान आर्ट ऑफ लिविंगच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात एका नवीन ‘ध्यान मंदिरा’चेही उद्घाटन करतील. यासोबतच ते मानसिक आरोग्य, ग्रामीण विकास, निसर्ग संवर्धनाशी संबंधित योजनाही सुरू करतील. हा कार्यक्रम श्री श्री रविशंकर…

Read More

शेंदुरजनाघाटमध्ये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई:60 लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जणांना घेतले ताब्यात

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू व्यवसायाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. शेंदुरजनाघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अवैध रेतीची वाहतूक करणारे दोन हायवा ट्रक जप्त केले. या कारवाईत सुमारे ६० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश ग्रामीणचे…

Read More

पतीला फसवण्याची धमकी देत पत्नीकडे 10 लाख मागितले:एआय फोटो वापरून खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो तयार करत पतीला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका महिलेकडून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली असून, महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एक महिला, एक अनोळखी व्यक्ती आणि एक…

Read More

अमरावतीत रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण दोन्ही प्रभावित:जीएमसी-इर्विन रुग्णालयांच्या हस्तांतरणामुळे निर्माण झाला पेच

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) यांच्यातील हस्तांतरणाच्या वादामुळे रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण दोन्ही प्रभावित झाले आहे. जीएमसीच्या शिकाऊ डॉक्टरांना अभ्यासासाठी रुग्ण मिळत नाहीत, तर इर्विन रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. हा तांत्रिक पेच वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांपर्यंत पोहोचला असून, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. अमरावतीमध्ये…

Read More

मेळघाटातील कढावमध्ये पाणीटंचाई, सीईओंचे टँकर पुरवठ्याचे आदेश:टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता 9 वर पोहोचली

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कढाव येथे पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मेळघाटातील टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. कढाव गावात पाण्याचा कोणताही स्थानिक स्रोत उपलब्ध नाही. यापूर्वीच चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू…

Read More

सार्वजनिक बांधकाम मंडळाचे 1032 कोटी थकीत:कंत्राटदार आर्थिक कोंडीत, कामांची गती मंदावली

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकासकामांची तब्बल १०३२ कोटी रुपयांची देयके गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. यामुळे संबंधित कंत्राटदार मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले असून, ही कोंडी त्वरित दूर करावी, अशी मागणी अमरावती डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र गुल्हाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही देणी १ एप्रिल २०२६ पर्यंतची असून त्यात आणखी वाढ…

Read More

दापोली रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष मुक्त:न्यायालयाच्या निकालावर किरीट सोमय्यांनी बाळगले मौन, प्रतिक्रिया देणे टाळले

दापोलीतील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांना खेड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या जमीन हडप आणि सीआरझेड नियमांच्या उल्लंघनाच्या गंभीर आरोपांनंतर, न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गेल्या अनेक…

Read More

दुष्काळी कामांच्या अनियमिततेवर अनिल देसाई यांचा हल्लाबोल:विभागीय आयुक्तांनी दाद न घेतल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

माण–खटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि विकासकामांतील कथित अनियमिततेच्या आरोपावरून राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद प्रशासनावर थेट हल्लाबोल करत गंभीर आरोपांची सरबत्ती केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या प्रशासकीय मानसिकतेवर देसाई यांनी कठोर टीका करत त्यांची तक्रार विभागीय आयुक्त…

Read More

नवापूर बर्ड फ्लू अपडेट:सहाव्या दिवशीही 'कलिंग' जोरात; अडीच लाखांहून अधिक पक्षी, तर 9 लाख 27 हजार अंडी नष्ट

नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पशुसंवर्धन विभागाकडून युद्धपातळीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सहाव्या दिवशी ‘अमलीवाला पोल्ट्री फार्म’मधील 23,707 कुक्कुटपक्षी, 1 लाख 20 हजार अंडी आणि 46 टन पशुखाद्य नष्ट करण्यात आले. 30 एप्रिल रोजी बर्ड फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 2 लाख 47 हजार 174 पक्षी नष्ट केले. ​पशुसंवर्धन…

Read More

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!:तूर आणि हरभरा खरेदीला केंद्राची मुदतवाढ, पणनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत आणखी 58 हजार 632 मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण…

Read More