Headlines

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हास्तरीय समिती:अटींचा बसणार फटका; पात्र लाभार्थी, अपात्र शेतकऱ्यांची यादी होणार जाहीर‎

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक‎अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती‎योजने’अंतर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांच्या‎अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा‎महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमुक्तीची प्रक्रिया‎पारदर्शक, वेगवान आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ‎पोहोचण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आली‎आहे. पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी जवळपास‎तयार झाली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या दोन‎कर्जमाफी योजनांमध्ये ८१ हजार शेतकरी वंचित राहिले‎होते. त्यामुळे आता नवीन योजनेतील अटी, निकषांचा‎फटका किती शेतकऱ्यांना…

Read More

यूपीमधील 4 प्रवाशांचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू:मध्य प्रदेशमध्ये मोबाइल फुटल्याच्या अफवेने खाली उतरले, दुसऱ्या ट्रेनखाली आले

मध्य प्रदेशातील मुरैना येथे झालेल्या रेल्वे अपघातात उत्तर प्रदेशातील 4 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-मुलाचाही समावेश आहे. मोबाईल स्फोटामुळे आग लागल्याच्या अफवेनंतर उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमधून काही प्रवासी घाबरून खाली उतरले. याच दरम्यान 4 प्रवासी दुसऱ्या ट्रेनच्या धडकेत आले. या अपघातात मेरठ येथील रहिवासी कंचन सिंह (25) पत्नी मोहित सिंह, आग्रा येथील रुनकता येथील रहिवासी शकुंतला…

Read More

लग्नसराई संपली; एसटीची तात्पुरती भाडेवाढ रद्द करण्याची मागणी:वाढ कायम ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

वाशिम | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लग्नसराईच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लागू केलेली तात्पुरती भाडेवाढ तसेच ‘स्वच्छता अधिभारा’च्या नावाखाली आकारण्यात येणारे अतिरिक्त दोन रुपये तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. काही महिन्यांपूर्वी लग्नसराईच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एसटी महामंडळाने तिकिटांच्या दरात वाढ केली होती. तसेच प्रत्येक तिकिटामागे…

Read More

पावसाळ्यात समुद्रात जाणारा 46 % कचरा नदीच्या उगमस्थानीच अडवणार

देशातील एकूण वार्षिक सागरी कचऱ्यापैकी तब्बल ४६% कचरा हा केवळ पावसाळ्यात नद्यांद्वारे समुद्रात प्रवेश करतो. यामध्ये एकट्या गंगा नदीतून दरवर्षी १ लाख २० हजार टन प्लॅस्टिक समुद्रात सोडले जाते. या गंभीर पार्श्वभूमीवर, किनारपट्टीवरील कोरल रीफ (प्रवाळ शैलभित्ती) आणि माशांच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आता एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. शास्त्रज्ञांनी “डबल-कंपार्टमेंट एंट्रॅपमेंट डिव्हाइस” हे आधुनिक…

Read More

बालविवाहाची अनिष्ट प्रथा करंदीतून कायमची हद्दपार:गाव बालविवाहमुक्त करण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार, आता प्रत्येक मुलगी शिकणार

जिथे काही वर्षांपूर्वी विवाहाच्या अक्षदा पडताना वयाचा विचार दुय्यम असायचा, त्याच पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक करंदी गावाने बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेला हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. आमच्या गावात आता एकही बालविवाह होणार नाही, उलट प्रत्येक मुलीच्या हाती शिक्षणाची पाटी असेल,’ असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ‘स्नेहालय’ संस्थेच्या ‘उडान’ प्रकल्पाच्या सोबतीने गावाने प्रत्यक्ष कृती आराखडा…

Read More

इंदिरा गांधींनी भाजपवर बंदी घातली असती -गेहलोत:राजकीय पक्ष असून धर्माचे राजकारण करतात; राठोड म्हणाले- पक्षनेतृत्वाला खूश करण्याचा प्रयत्न

जयपूरमध्ये, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर धर्माचे राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, हे लोक धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत. त्यांची विचारसरणी आहे की हिंदूंना हिंदुत्वाच्या नावाखाली भडकवा आणि राज्य करा. आज इंदिरा गांधींसारख्या नेत्या पंतप्रधान असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घातली असती. जयपूरमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद वेलफेअर सोसायटी राजस्थानतर्फे रविवारी आयोजित ‘नवाब…

Read More

सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या उपशाला आजपासून ब्रेक:ऑगस्ट अखेरपर्यंत सिंचन योजनांची वीज तोडणार

एल निनो इफेक्टमुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर जूनमध्ये धडक देणाऱ्या मान्सूनच्या पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुळा धरणातून सुरू असलेले कालव्याद्वारे सिंचनाचे आवर्तन तत्काळ थांबवण्यात आले. आता धरणावरील उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा सोमवारपासून (१५ जून) खंडित करण्यात येणार आहे. धरणावर सुमारे १ हजार शेतकऱ्यांच्या…

Read More

नेवासा- देवगड मार्गावर असलेल्या जंगलात वैद्यकीय कचऱ्याचा खच

नेवासे-देवगड मार्गावरील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या सिरिंज, इंजेक्शनच्या सुया, औषधांच्या रिकाम्या व फुटलेल्या बाटल्या तसेच वैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य यांचा अक्षरशः खच रस्त्यालगत वनविभागात आढळून आला आहे. रुग्णालये व दवाखान्यांमधून निर्माण होणारा वैद्यकीय जैविक कचरा हा अत्यंत धोकादायक मानला जातो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने…

Read More

विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावा

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे‎उमेदवार नंदकिशोर महाजन यांना‎उमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिली‎याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट‎चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल‎करण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजी‎टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी‎दिल्लीवरून उमेदवारी जाहीर झाल्याचे‎स्पष्ट केले होते; मात्र रविवारी‎महायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री‎तथा खासदार रक्षा खडसे यांनी‎उमेदवार दिल्लीचा नव्हे तर मंत्री गिरीश‎महाजनांनी दिल्याचा दावा केल्याने‎खळबळ उडाली; मात्र महाजनांनी‎खडसेंचा हा दावा खोडून काढत…

Read More

TMC चे २० खासदार NCPI मध्ये:मोदींच्या नेतृत्वात काम करणार; महुआ म्हणाल्या – सुदीप गद्दार, आजाराचे कारण देत दिल्लीला गेले

टीएमसीच्या २८ पैकी २० लोकसभा खासदारांनी रविवारी त्रिपुराच्या नॅशनलिस्ट सिटिजन्स पार्टी (एनसीपीआय) मध्ये विलीनीकरणाची घोषणा केली. खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी रविवारी संध्याकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र सोपवल्यानंतर याची घोषणा केली. त्या म्हणाल्या- आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सोबत काम करू. तर, बंडखोर खासदार सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांनी सांगितले की, त्यांचा…

Read More