Headlines

वाढदिवस 18 दिवसावर असताना चिमुकल्याचा दुर्दैवी अंत:विजेच्या धक्क्याने झाला मृत्यू, कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले

येत्या 24 जून रोजी त्याचा वाढदिवस होता मात्र 18 दिवस आधीच त्याच्या घरात मृत्यूने मातम निर्माण केला आहे ही घटना आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधील हमीदिया कॉलनी मलंग बाबा बिल्डिंग परिसरातील खेळण्यासाठी घराबाहेर गेलेला चिमुकला घरी परतलाच नाही त्याचा शोध घेतला असता रात्री उशिरा विजेच्या खांबालगत त्याचा मृतदेह आढळून आला विजेच्या…

Read More

मध्यरात्री इम्तियाज अली यांचे अपहरण झाले होते:कॉलेजच्या दिवसांबद्दल दिग्दर्शकाचा खुलासा; म्हणाले- पोस्टर काढल्यामुळे टोळीने केले होते अपहरण

चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांतील एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. समदिश भाटिया यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, दिल्लीत शिक्षण घेत असताना वसतिगृहाच्या भिंतीवरून एक राजकीय पोस्टर काढण्यावरून त्यांचा स्थानिक टोळीशी वाद झाला होता. यानंतर टोळीतील लोकांनी मध्यरात्री त्यांना वसतिगृहातून पळवून नेले होते. मात्र, नंतर एका अनपेक्षित घटनेनंतर ते सुखरूप बाहेर पडण्यात…

Read More

सगळेच पाकिस्तानी, मग भारतीय फक्त भाजपवालेच का?:'CJP'च्या अभिजीत दिपकेचा सवाल, पुढील वाटचालीवरही केले भाष्य

अभिजीत दिपके पंतप्रधानांवर काही बोलत नाही, असा आरोप केला जात आहे. यावर प्रश्न विचारला असता दिपके म्हणाला, पंतप्रधानांनी राजीनामा घेतला पाहिजे, हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. जर शिक्षा मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नसेल तर यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक थांबवू शकत नाहीत का? असा सवाल…

Read More

तटकरे विरुद्ध रोहित पवार वाद पेटला!:वर्षा बंगल्याचे उंबरठे कोणी झिजवले, सगळी माहिती माझ्याकडे; सुनील तटकरेंचा थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय शीतयुद्ध आता पूर्णपणे चव्हाट्यावर आले आहे. अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचऱ्या आणि परखड शब्दांत…

Read More

दिल्लीतील प्राध्यापकाची हत्या करण्यासाठी 1400 किमी दूरून आले जोडपे:मालमत्ता हडप करू इच्छित होते, पोलिसांनी बंगालमधून अटक केली

दिल्ली पोलिसांनी दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिका देवोस्मिता पॉल यांच्या हत्येचा तपास तीन दिवसांत पूर्ण केला आहे. पोलिसांनी पश्चिम बंगालमधील बर्धमान येथील एका जोडप्याला अटक केली आहे. पोलिसांनुसार, मालमत्तेच्या वादामुळे दोन्ही आरोपी सुमारे 1400 किमी दूर पश्चिम बंगालमधून दिल्लीत आले होते. पॉल यांच्याकडे पश्चिम बंगालमध्ये एक मालमत्ता होती, जी त्यांना आजोबांच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने मिळाली होती….

Read More

हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाला कारवाईसाठी लय सापडेना:56 हजारांचा गुटखा पकडून पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न, कार्यालयाच्या कारवाईने अनेकांच्या भुवया उंचावल्या

हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून बेफामपणे गुटखा विक्री होत असतांना अन्न औषध प्रशासनाकडून मात्र झोपेचे सोंग घेतले जात होते. हिंगोली येऊन भेटीची औपचारीकता दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांना कारवाईची लय सापडलीच नाही. त्यानंतर आता सचिव तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वसमत येथे छापा टाकून ५६ हजाराचा गुटखा पकडत स्वतःची पाठ थोपवून घेण्याचा प्रयत्न केला ओह. तर दुसरीकडे…

Read More

सोलापुरात नात्याला काळिमा:काकाकडून 5 वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा केला होता बनाव

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काकानेच आपल्या अवघ्या 5 वर्षांच्या सख्ख्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. समर्थ यल्लाप्पा कास्तार असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. या क्रूर कृत्याप्रकरणी संशयित आरोपी काका अंकुश परसप्पा कास्तार याच्या विरोधात मंद्रूप पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात…

Read More

बळीराजाची चिंता वाढली:15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी, घाईघाईने पेरणी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यातील बळीराजा ज्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबत आता एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आली आहे. परिणामी, आगामी आठवडाभरात राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता अत्यंत कमी…

Read More

दिल्लीत आंदोलनानंतर आपल्या घरी पोहोचले अभिजीत दीपके:म्हणाले- सरकारने ट्रेलर पाहिला कॉकरोच काय करू शकतात, पण गोष्ट संपली नाही

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी सांगितले की, परीक्षांमधील गोंधळावरून त्यांचे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत. दीपके यांनी सांगितले की, शनिवारी नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले आंदोलन यशस्वी ठरले. यात सुमारे 7,000 लोकांनी भाग घेतला. आता हे आंदोलन देशभरात पसरवले जाईल. दीपके यांनी असेही…

Read More

देशात ड्रग्जविरोधी मोहीम सुरू, पाळेमुळे खणून काढणार:अल निनोमुळे यंदा राज्यात कमी पावसाची शक्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“राज्यात आणि देशात सध्या अंमली पदार्थांविरोधात ‘नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज’ ही मोहीम तीव्र गतीने राबवली जात आहे. विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चोख माहिती गोळा करून मोठ्या कारवाया केल्या जात असून, कुठल्याही परिस्थितीत ड्रग्जच्या काळ्या जाळ्याची पाळेमुळे खणून काढली जातील,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आगामी काळातही या कारवाया सातत्याने सुरूच राहतील, असा…

Read More